शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

काम चालू; गल्ला बंद.. घरपोच सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:48 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पोवई नाक्यावर सुरू असलेले ग्रेड सेपरेटरचे काम तसेच वाहतूक व्यवस्थेत केलेल्या बदलाचा लहान-मोठ्या सुमारे चारशे व्यावसायिकांना फटका बसला आहे. ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरवल्याने किरकोळ विक्रेत्यांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. असे असले तरी काही व्यावसायिकांनी या समस्येवर तोडगा शोधून काढला आहे. ग्राहकांना हव्या असणाऱ्या ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पोवई नाक्यावर सुरू असलेले ग्रेड सेपरेटरचे काम तसेच वाहतूक व्यवस्थेत केलेल्या बदलाचा लहान-मोठ्या सुमारे चारशे व्यावसायिकांना फटका बसला आहे. ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरवल्याने किरकोळ विक्रेत्यांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. असे असले तरी काही व्यावसायिकांनी या समस्येवर तोडगा शोधून काढला आहे. ग्राहकांना हव्या असणाऱ्या वस्तूंची मोबाईल सेवेद्वारे थेट घरपोच सेवा दिली जात आहे.वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोवई नाक्यावर गेल्या महिनाभरापासून ग्रेड सेपरेटरचे काम सुरू करण्यात आले आहे. कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होताच पोवईनाक्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. ही कोंडी टाळण्यासाठी काही दिवसांपूर्वी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला. याचा फटका फळ विक्रेते, टपरीधारकांसह व्यापाºयांना बसला आहे.खरेदीसाठी ग्राहकच येत नसल्याने रस्त्याकडेला बसून चप्पल शिवणारे, चावी बनविणारे तसेच फळविक्री करणारे विक्रेते हतबल झाले आहेत. कपडे व्यावसायिंक, हॉटेल चालक तसेच इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाºयांनाही याच परिस्थितीतून जावे लागत आहे. नाक्यावरील जवळपास चारशे व्यावसायिकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.एकीकडे ग्राहकांविना काही व्यावसायिक हतबल झाले असताना दुसरीकडे मात्र काहींनी या समस्येवर तोडगा शोधून काढला आहे.ग्राहकांना हव्या असणाºया वस्तूंची थेट घरपोच सेवा दिली जात आहे. यासाठी संबंधित व्यावसायिकांनी मोबाईल सेवा सुरू केली असून, ग्राहकांचा फोन येताच मागणीनुसार वस्तू पुरविल्या जात आहे. यामुळे ग्राहकांमधूनही व्यावसायिकांच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.पन्नासवरून दहा डझनावर...मुन्ना मुलाणी हे गेल्या पंचवीस वर्षांपासून पोवई नाक्यावर फळविक्रीचा व्यवसाय करीत आहेत. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे रस्ते बंद झाल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविली आहे. पूर्वी ५० डझन केळींची विक्री व्हायची आता दिवसभरात दहा डझनही केळी विकली जात नाहीत. आता स्थलांतर करायचं म्हटलं तर जायचं कुठं? हाच मोठा प्रश्न आहे. दिवसभरात भांडवलाचा खर्चही सुटत नाही.