शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

काम चालू; गल्ला बंद.. घरपोच सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:48 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पोवई नाक्यावर सुरू असलेले ग्रेड सेपरेटरचे काम तसेच वाहतूक व्यवस्थेत केलेल्या बदलाचा लहान-मोठ्या सुमारे चारशे व्यावसायिकांना फटका बसला आहे. ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरवल्याने किरकोळ विक्रेत्यांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. असे असले तरी काही व्यावसायिकांनी या समस्येवर तोडगा शोधून काढला आहे. ग्राहकांना हव्या असणाऱ्या ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पोवई नाक्यावर सुरू असलेले ग्रेड सेपरेटरचे काम तसेच वाहतूक व्यवस्थेत केलेल्या बदलाचा लहान-मोठ्या सुमारे चारशे व्यावसायिकांना फटका बसला आहे. ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरवल्याने किरकोळ विक्रेत्यांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. असे असले तरी काही व्यावसायिकांनी या समस्येवर तोडगा शोधून काढला आहे. ग्राहकांना हव्या असणाऱ्या वस्तूंची मोबाईल सेवेद्वारे थेट घरपोच सेवा दिली जात आहे.वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोवई नाक्यावर गेल्या महिनाभरापासून ग्रेड सेपरेटरचे काम सुरू करण्यात आले आहे. कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होताच पोवईनाक्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. ही कोंडी टाळण्यासाठी काही दिवसांपूर्वी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला. याचा फटका फळ विक्रेते, टपरीधारकांसह व्यापाºयांना बसला आहे.खरेदीसाठी ग्राहकच येत नसल्याने रस्त्याकडेला बसून चप्पल शिवणारे, चावी बनविणारे तसेच फळविक्री करणारे विक्रेते हतबल झाले आहेत. कपडे व्यावसायिंक, हॉटेल चालक तसेच इलेक्ट्रिक साहित्याची विक्री करणाºयांनाही याच परिस्थितीतून जावे लागत आहे. नाक्यावरील जवळपास चारशे व्यावसायिकांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.एकीकडे ग्राहकांविना काही व्यावसायिक हतबल झाले असताना दुसरीकडे मात्र काहींनी या समस्येवर तोडगा शोधून काढला आहे.ग्राहकांना हव्या असणाºया वस्तूंची थेट घरपोच सेवा दिली जात आहे. यासाठी संबंधित व्यावसायिकांनी मोबाईल सेवा सुरू केली असून, ग्राहकांचा फोन येताच मागणीनुसार वस्तू पुरविल्या जात आहे. यामुळे ग्राहकांमधूनही व्यावसायिकांच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.पन्नासवरून दहा डझनावर...मुन्ना मुलाणी हे गेल्या पंचवीस वर्षांपासून पोवई नाक्यावर फळविक्रीचा व्यवसाय करीत आहेत. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे रस्ते बंद झाल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविली आहे. पूर्वी ५० डझन केळींची विक्री व्हायची आता दिवसभरात दहा डझनही केळी विकली जात नाहीत. आता स्थलांतर करायचं म्हटलं तर जायचं कुठं? हाच मोठा प्रश्न आहे. दिवसभरात भांडवलाचा खर्चही सुटत नाही.