शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चांद नदीवरील पुलांचे काम युद्धपातळीवर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST

मायणी : मायणी व मायणी परिसरामध्ये सुरू असलेल्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान असलेले येथील चांद नदीपात्रातील दोन्ही पुलांचे काम ...

मायणी : मायणी व मायणी परिसरामध्ये सुरू असलेल्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान असलेले येथील चांद नदीपात्रातील दोन्ही पुलांचे काम युद्धपातळीवर सुरू असून, येत्या महिन्याभरात हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.

सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाचे रुंदीकरण व्हावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदाय व वाहनचालक तसेच स्थानिक ग्रामस्थांकडून मागणी होत होती. मात्र, गेली कित्येक वर्षे विविध कारणांमुळे हे काम रखडले जात होते. सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर जि. सोलापूर यांच्या देखरेखीखाली काम सुरू आहे. मायणीपासून पंढरपूरपर्यंत सुमारे शंभर किलोमीटरचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे.

याच कामादरम्यान सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून मायणीकडे पाहिले जाते. पूर्वी बाजारपेठेतून जाणारा मार्ग अतिशय अरुंद असल्याने या ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. तासन्‌ तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे या मार्गाच्या रुंदीकरण कामादरम्यान रुंदीकरणाकडे सर्वांचे लक्ष गेल्या वर्षभरापासून लागून राहिले होते. अखेर संपूर्ण गावाच्या पेठेतून काँक्रिटीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

गावाच्या पूर्व व पश्चिम बाजूस नदीचे पात्र आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे या नदीपात्रातील पुलाचे काम सतत रखडत होते, तसेच पर्यायी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात उभारलेला मातीपूलही दोन ते तीन वेळा वाहून गेल्यामुळे हा पूल कधी पूर्ण होणार, याकडे स्थानिक ग्रामस्थ, वाहनचालक व वारकरी संप्रदायांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर गेल्या दोन महिन्यापासून नदीपात्रातील पाणी पातळी पूर्ण कमी झाल्याने या दोन्ही पुलांचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून, येत्या महिन्याभरात नदीपात्रातील मायणी गावाच्या पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी ते खुले होतील, अशी आशा निर्माण झाली आहे.

चौकट -

मल्हारपेठ-पंढरपूर राज्य महामार्ग रुंदीकरणातील पहिला टप्पा मायणी ते पंढरपूर सुमारे शंभर किलोमीटर अंतर रुंदीकरण जवळजवळ पूर्ण झाले आहे. मात्र, मायणीपासून मल्हारपेठकडे जाणाऱ्या सुमारे साठ किलोमीटर अंतराचे रुंदीकरण कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा आजही कायम आहे.

०३मायणी

मायणी येथील चांद नदीपात्रातील पुलाचे रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. (छाया : संदीप कुंभार)