शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

चांद नदीवरील पुलांचे काम युद्धपातळीवर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST

मायणी : मायणी व मायणी परिसरामध्ये सुरू असलेल्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान असलेले येथील चांद नदीपात्रातील दोन्ही पुलांचे काम ...

मायणी : मायणी व मायणी परिसरामध्ये सुरू असलेल्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान असलेले येथील चांद नदीपात्रातील दोन्ही पुलांचे काम युद्धपातळीवर सुरू असून, येत्या महिन्याभरात हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.

सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाचे रुंदीकरण व्हावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदाय व वाहनचालक तसेच स्थानिक ग्रामस्थांकडून मागणी होत होती. मात्र, गेली कित्येक वर्षे विविध कारणांमुळे हे काम रखडले जात होते. सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर जि. सोलापूर यांच्या देखरेखीखाली काम सुरू आहे. मायणीपासून पंढरपूरपर्यंत सुमारे शंभर किलोमीटरचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे.

याच कामादरम्यान सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून मायणीकडे पाहिले जाते. पूर्वी बाजारपेठेतून जाणारा मार्ग अतिशय अरुंद असल्याने या ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती. तासन्‌ तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे या मार्गाच्या रुंदीकरण कामादरम्यान रुंदीकरणाकडे सर्वांचे लक्ष गेल्या वर्षभरापासून लागून राहिले होते. अखेर संपूर्ण गावाच्या पेठेतून काँक्रिटीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

गावाच्या पूर्व व पश्चिम बाजूस नदीचे पात्र आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे या नदीपात्रातील पुलाचे काम सतत रखडत होते, तसेच पर्यायी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात उभारलेला मातीपूलही दोन ते तीन वेळा वाहून गेल्यामुळे हा पूल कधी पूर्ण होणार, याकडे स्थानिक ग्रामस्थ, वाहनचालक व वारकरी संप्रदायांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर गेल्या दोन महिन्यापासून नदीपात्रातील पाणी पातळी पूर्ण कमी झाल्याने या दोन्ही पुलांचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून, येत्या महिन्याभरात नदीपात्रातील मायणी गावाच्या पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी ते खुले होतील, अशी आशा निर्माण झाली आहे.

चौकट -

मल्हारपेठ-पंढरपूर राज्य महामार्ग रुंदीकरणातील पहिला टप्पा मायणी ते पंढरपूर सुमारे शंभर किलोमीटर अंतर रुंदीकरण जवळजवळ पूर्ण झाले आहे. मात्र, मायणीपासून मल्हारपेठकडे जाणाऱ्या सुमारे साठ किलोमीटर अंतराचे रुंदीकरण कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा आजही कायम आहे.

०३मायणी

मायणी येथील चांद नदीपात्रातील पुलाचे रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. (छाया : संदीप कुंभार)