शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

जिल्ह्यात ऊन वाढू लागले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:14 IST

सातारा : जिल्ह्यात थंडीचे प्रमाण कमी होत चालले असून, ऊन वाढू लागले आहे. मागील पाच दिवसांत तर साताऱ्यासह पूर्व ...

सातारा : जिल्ह्यात थंडीचे प्रमाण कमी होत चालले असून, ऊन वाढू लागले आहे. मागील पाच दिवसांत तर साताऱ्यासह पूर्व भागातील कमाल तापमान ३५ अंशावर राहिले आहे. त्यामुळे लवकरच उन्हाची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात यंदाच्या हिवाळी ऋतूत थंडीचे प्रमाण कमी राहिले आहे. एकवेळच फक्त साताऱ्याचे किमान तापमान ९ अंशापर्यंत खाली आले होते. हे तापमान दोन वर्षांतील नीच्चांकी ठरले होते. डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात हे तापमान नोंदले गेले. मात्र, त्यानंतर कधीही तापमान १० अंशाच्या खाली आले नाही, तर हिवाळी ऋतूत सतत किमान तापमान १५ अंशाच्यावरच राहिले. त्यामुळे जिल्हावासीयांना मोठ्या प्रमाणात थंडीचा कडाका अनुभवयास मिळालाच नाही. त्यातच मागील काही दिवसांपासून किमान तापमान वाढतच चालले आहे. त्यामुळे थंडी गायबच आहे. त्यातच आता कमाल तापमानही वाढत चालले आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे.

सातारा शहराचे कमाल तापमान ३५ अंशावर आहे, तर पूर्व ग्रामीण भागात तापमान ३६ अंशाच्या पुढे जाऊ लागलंय. सोमवारी साताऱ्यात कमाल तापमान ३६ अंश होते, तर महाबळेश्वरचा पारा ३०.०३ नोंदला गेला. त्यानंतर मंगळवारी आणि बुधवारीही साताऱ्याचे कमाल तापमान ३६ अंशापर्यंत होते. किमान आणि कमाल तापमान वाढत चालल्याने थंडी गायब झाली असून, उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.

सातारा शहरातील कमाल तापमान असे :

दि. २१ फेब्रुवारी ३०.०७, दि. २२ फेब्रुवारी ३१.०३, दि. २३ फेब्रुवारी ३२.०९, दि. २४ फेब्रुवारी ३४, दि. २५ फेब्रुवारी ३४.०४, दि. २६ फेब्रुवारी ३४.०५, दि. २७ फेब्रुवारी ३५.०३, दि. २८ फेब्रुवारी ३६.०२, दि. १ मार्च ३६, दि. २ आणि ३ मार्च ३५.०८.

.....................................................