शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

महिलांना चिंता बचत गटाच्या कर्जफेडीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:40 IST

तरडगाव : फलटण तालुक्यातील गोरगरीब व मध्यमवर्गीय महिलांनी विविध खासगी फायनान्स कंपन्यांकडून बचत गटाच्या माध्यमातून घेतलेले कर्ज हे सध्याच्या ...

तरडगाव : फलटण तालुक्यातील गोरगरीब व मध्यमवर्गीय महिलांनी विविध खासगी फायनान्स कंपन्यांकडून बचत गटाच्या माध्यमातून घेतलेले कर्ज हे सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे फिटेनासे झाले आहे. काहींनी कर्ज प्रकरण नवे-जुने केले आहे, तर अनेक महिला परतफेड करू शकल्या नाहीत. गत वर्षापासून सुरू असलेल्या संचारबंदी व लॉकडाऊनच्या या खेळात आयुष्याच्या डाव मोडकळीस आला असताना कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेत बऱ्याच महिला आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून विविध खासगी फायनान्स हे महिलांना कर्ज वाटप करीत आहेत. बचत गटामार्फत तालुक्यातील प्रत्येक गावांत गरजू महिलांना १५ ते २५ हजारांपर्यंत कर्ज दिले गेले आहे. कोरोनाचा संसर्ग पसरण्यासपूर्वी महिलांचा सर्व व्यवहार सुरळीत सुरू होता. ठरवून दिलेले कर्जाचे हप्ते वेळेवर जात. मात्र, कोरोनामुळे महिलांच्या हाताला व कुटुंबातील कर्त्या पुरुषाला काम मिळणे कठीण होऊन बसले. यामुळे जिथं घरचा रोजचा खर्च भागविणे मुश्कील झाले तिथे हप्ते कसे भरायचे, याची चिंता लागून राहिली आहे.

सध्याची परिस्थिती लक्षात घेता काही फायनान्स कंपन्यांकडून हप्ते मागितले जात नसले तरी व्याजाची रक्कम वाढत आहे. काही प्रतिनिधी हे हप्ते घेण्यासाठी घरी येत आहेत. महिलांकडे पैसे नसल्याकारणाने संबंधितांमध्ये किरकोळ शाब्दिक वाद होतो, तर काही वसुली प्रतिनिधी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत महिलांकडे पैसे नसल्याचे ओळखून माघारी जातात, तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी आहे, अशा महिला प्रामाणिकपणे काही ठराविक रक्कम प्रतिनिधीकडे देत कर्जाचा डोंगर कमी करतानादेखील दिसत आहेत.

चौकट..

संसाराचा गाडा हाकताना अडचणी...

याउलट काहींना लॉकडाऊन म्हणजे हे एक पैसे न भरण्यासाठी कारणच झाले आहे, तसेच बचत गटाच्या या मेळ्यात अशा पण काही महिला आहेत की ज्यांना कोरोनामुळे कर्जमाफी होईल, असे वाटत आहे. एकूणच बिकट परिस्थिती बनलेल्या अनेक महिलांना पैशाअभावी संसाराचा गाडा हाकताना कर्जाची परतफेड कशी करायची, याची काळजी वाटत आहे.