शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

खासगी बस उलटून महिला ठार

By admin | Updated: January 23, 2015 23:43 IST

१८ प्रवासी जखमी : फळणीजवळील दुर्घटना; जखमींमध्ये इस्लामपूर, बांबवडे येथील महिलांचा समावेश

सातारा : जावळी तालुक्यातील फळणी गावच्या हद्दीत असणाऱ्या आपटीच्या वळणावर भाविकांना घेऊन निघालेली खासगी प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार, तर १७ महिला आणि एक असे १८ जण जखमी झाले. मृत आणि १६ जखमी वाळवा आणि इस्लामपूर तालुक्यातील, तर दोन जखमी शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील आहेत.राणी उमेश करे (रा. धनगर गल्ली, उरुण-इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) असे मृत महिलेचे नाव असून, सर्व जखमींवर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी पाच ते सहा महिला गंभीर आहेत. दरम्यान, या घटनेनंतर चालक भूषण बापूराव पाटील (रा. इस्लामपूर) याच्यावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.याबाबत जिल्हा रुग्णालय आणि मेढा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) येथील तीसहून अधिक महिला आणि सहा ते सात लहान मुले गणेश जयंतीनिमित्त शेंबडी येथील नारायण महाराज मठामध्ये गणेश दर्शनासाठी शुक्रवारी पहाटे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या प्रवासी बसने (एमएच ११ टी ९६९६) निघाल्या होत्या. सकाळी पावणेआठ वाजता बस फळणी गावच्या हद्दीत आली. आपटी गावाजवळच्या वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस उलटली. बहुतांश प्रवासी झोपेत होते. बस उलटल्याने एकच गोंधळ उडाला आणि जोराचा आक्रोश सुरू झाला. या घटनेत राणी करे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अठराजण जखमी झाले.अठरा जखमींपैकी इंदूबाई जालिंदर गवंडी (वय ५०), ओमकार उमेश करे (१४), धोंडूबाई सयाप्पा शेडगे (६५), शकूबाई बाबा कोळेकर (५८), धोंडूबाई बाबा कोळेकर (६२), यशोदा बाबू गवंडी (३८), रेखा उत्तम कोळेकर (३०), आरती रामचंद्र कोळेकर (१९), पार्वती वसंत बंडगर (५२), कमल संभाजी ढोबळे (६०), राधाबाई शिवाजी माने (५०), कोमल शामराव ताटे (१८), बाळाबाई संभाजी कोळेकर (४०, रा. अहिल्यादेवी नगर, इस्लामपूर), मालन विठ्ठल करे (५०), साखरु रामचंद्र कोळेकर (४०) हे सोळाजण इस्लामपूरचे, तर धनश्री आनंदा जानकर (१३), बाळाबाई तुकाराम जानकर (६०) या बांबवडे (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील आहेत. (प्रतिनिधी)दर्शन तर झालेच नाही..!इस्लामपूरच्या या महिला भाविकांनी गणेश जयंतीनिमित्त शेंबडी येथील नारायण महाराज मठात गणेश दर्शनासाठी येण्याचे दोनच दिवसांपूर्वी ठरवले होते. दर्शनानंतर या महिला पुणे जिल्ह्यातील प्रतिबालाजी नारायणपूर येथे जाणार होत्या. मात्र, तो निर्णय त्यांनी रद्द केला आणि गणेशदर्शन घेऊन पुन्हा इस्लामपूरला परतण्याचे त्यांनी ठरविले. शक्रवारी पहाटे पाच वाजता सगळे इस्लामपूरहून निघाले आणि पावणेतीन तासांतच गाडीला अपघात झाला. त्यामुळे दर्शन झालेच नाही.दर्शन तर झालेच नाही..!इस्लामपूरच्या या महिला भाविकांनी गणेश जयंतीनिमित्त शेंबडी येथील नारायण महाराज मठात गणेश दर्शनासाठी येण्याचे दोनच दिवसांपूर्वी ठरवले होते. दर्शनानंतर या महिला पुणे जिल्ह्यातील प्रतिबालाजी नारायणपूर येथे जाणार होत्या. मात्र, तो निर्णय त्यांनी रद्द केला आणि गणेशदर्शन घेऊन पुन्हा इस्लामपूरला परतण्याचे त्यांनी ठरविले. शक्रवारी पहाटे पाच वाजता सगळे इस्लामपूरहून निघाले आणि पावणेतीन तासांतच गाडीला अपघात झाला. त्यामुळे दर्शन झालेच नाही.