शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

बाईच्या जातीनं.. सोसावं जरा संसारासाठी विवाहितांची कुचंबणा : प्रत्येक पावलावर सहन करण्याचा विट आल्यावर मनस्तापातून होते कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:48 IST

सातारा : पती-पत्नी संसाराची समान चाके आहेत, असे कितीही घसा फोडून कोणी सांगितले तरी वास्तवात घराघरांत ‘बाईच्या जातीनं सोसावं जरा संसारासाठी’ हे वाक्य ठरलेलं असतं.

ठळक मुद्दे आत्महत्येची कारणमीमांसा

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : पती-पत्नी संसाराची समान चाके आहेत, असे कितीही घसा फोडून कोणी सांगितले तरी वास्तवात घराघरांत ‘बाईच्या जातीनं सोसावं जरा संसारासाठी’ हे वाक्य ठरलेलं असतं. माहेर-सासर, पाहुणे, मुलं, पती, नातेवाईक या सर्वांना सांभाळताना होणारी कसरत आणि त्यातून येणाऱ्या अपमानास्पद प्रसंगामुळे जगणं संपविण्याचा विचार महिला करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.साताऱ्यात महिलांचे आत्महत्येचे प्रमाण काही दिवसांत वाढले आहे. लग्नानंतर महिलांची अवस्था कुंपणावर असलेल्या दोडक्यासारखी होते, असे काहींचे म्हणणे आहे. कोणतीही अडचण आली की माहेरचे लोक सासरकडे आणि सासरचे माहेराकडे बोट करतात, असे महिला सांगतात.बºयाचदा मुलीचा संसार वाचविण्यासाठी माहेरचे लोकही सासरच्या मंडळींपुढे मुलींना दोषी ठरवतात, हे धक्कादायक वास्तव काही प्रकरणांमध्ये समोर आले आहे.‘तुला सांभाळायला काही नाही; पण जग नावे ठेवायलाच बसलाय, जगासाठी आपला संसार टिकवलापाहिजे, सगळ्याच बायकांना त्रास होतो, म्हणून काय त्या येतात का तुझ्यासारखं पळून,’ ही वाक्ये महिलांना सरावाची झाली आहेत.उठता बसता घरातून होणारी शेरेबाजी, मानापमानाच्या गोष्टी, कामात उशीर म्हणून ओरड, मद्यपी पतीकडून होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास अशी एक ना अनेक कारणे महिलांचे मानसिक खच्चीकरण करत असतात. मात्र, सासरच्या लोकांनी कितीही मानहानीकारकपणे वागणूक दिली तरीही ‘सहन कर’ हे ब्रह्मवाक्य ज्यांना सोसवत नाही, त्या मृत्यूला कवटाळणं पसंत करतात.महिलांची नैसर्गिक रचना मृदू आहे. मात्र, आत्महत्या करताना ती भलतीच कठोर होते. स्वयंपाक करताना बसलेला छोटा चटका किती वेदनादायी आहे, हे माहीत असूनही ती रॉकेल टाकून स्वत:ला पेटवते. तिचे ही कृत्य तिच्यातील मनस्ताप व्यक्त करणारे आहे. आगीच्या ज्वाळेत स्वत:ला झोकून देण्यासाठी लागणारं धाडस तिला हतबलतेतून येतअसते.आपल्या भविष्याची सुंदर स्वप्न ज्या मुलांच्या रुपाने महिलांच्या आयुष्यात अवतरलेली असतात, त्यांनाही आपल्या पश्चात कोण सांभाळणार, आपण असताना त्यांना कोणी नीट बघितले नाही, मग आपल्या पश्चात कोण बघेल हा विचार करून कठोर आई बनून महिला आत्महत्या करताना मुलांनाही सोबत घेतल्याचे दिसत आहे. या घटनासमोर आल्यानंतर मन सुन्नहोतं.आत्महत्यापूर्वी लक्षणेपुरुषांसारखं महिला कोणतीच भावना मनात ठेवत नाहीत. घरात होणाºया त्रासाविषयी महिला माहेरी सांगतात. अनेकदा माहेरच्या माणसांनाही त्या आत्महत्या करावीशी वाटते, हे बोलून दाखवतात. पण नैराश्यातून आलेले हे वाक्य असल्याचा कुटुंबीयांचा कयास असतो. शेजारी, जवळचे नातेवाईक, पालक यांच्यापेक्षाही महिलांना त्यांचा भाऊ आणि वहिनी अधिक जवळ वाटतात. त्यांच्याशी बोलताना त्या मनातील भावना व्यक्त करतात. पण दुर्दैवाने त्याकडे गांभीर्याने बघितले नाही. नोकरी करणारी महिला असेल तर सहकाºयांशी याविषयावर बोलते.साताऱ्यातील काही उदाहरणेकोरेगाव येथील एका विवाहितेने पती बाहेरगावी गेल्यानंतर आपल्या दीड महिन्याच्या मुलीसह बाथरूममध्ये जाऊन पेटवून घेतले. आत्महत्या करण्यापूर्वी तिने त्याविषयीचा मेसेज भावाला केला होता.कºहाड तालुक्यातील एक विवाहिता आपल्या नऊ वर्षांच्या मुलीबरोबर आपल्या काही नातेवाइकांना भेटली. त्यानंतर घरी परतताना तिने तिच्या मुलीसह स्वत:ला गळफास घेतला आणि मृत्यूला कवटाळले.

ही काही कारणेमाहेरच्या माणसांवरून होणारी मानहानीकारक टिप्पणीसण समारंभ आणि लग्नात न झालेले मानपान यामुळे शेरेबाजी,पतीचा संशयी स्वभाव,या जगात आपले कोणीच नाही ही असुरक्षिततेची भावना,सारखी तडजोड मीच करायची ही हतबलता!