शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बाईच्या जातीनं.. सोसावं जरा संसारासाठी विवाहितांची कुचंबणा : प्रत्येक पावलावर सहन करण्याचा विट आल्यावर मनस्तापातून होते कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:48 IST

सातारा : पती-पत्नी संसाराची समान चाके आहेत, असे कितीही घसा फोडून कोणी सांगितले तरी वास्तवात घराघरांत ‘बाईच्या जातीनं सोसावं जरा संसारासाठी’ हे वाक्य ठरलेलं असतं.

ठळक मुद्दे आत्महत्येची कारणमीमांसा

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : पती-पत्नी संसाराची समान चाके आहेत, असे कितीही घसा फोडून कोणी सांगितले तरी वास्तवात घराघरांत ‘बाईच्या जातीनं सोसावं जरा संसारासाठी’ हे वाक्य ठरलेलं असतं. माहेर-सासर, पाहुणे, मुलं, पती, नातेवाईक या सर्वांना सांभाळताना होणारी कसरत आणि त्यातून येणाऱ्या अपमानास्पद प्रसंगामुळे जगणं संपविण्याचा विचार महिला करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.साताऱ्यात महिलांचे आत्महत्येचे प्रमाण काही दिवसांत वाढले आहे. लग्नानंतर महिलांची अवस्था कुंपणावर असलेल्या दोडक्यासारखी होते, असे काहींचे म्हणणे आहे. कोणतीही अडचण आली की माहेरचे लोक सासरकडे आणि सासरचे माहेराकडे बोट करतात, असे महिला सांगतात.बºयाचदा मुलीचा संसार वाचविण्यासाठी माहेरचे लोकही सासरच्या मंडळींपुढे मुलींना दोषी ठरवतात, हे धक्कादायक वास्तव काही प्रकरणांमध्ये समोर आले आहे.‘तुला सांभाळायला काही नाही; पण जग नावे ठेवायलाच बसलाय, जगासाठी आपला संसार टिकवलापाहिजे, सगळ्याच बायकांना त्रास होतो, म्हणून काय त्या येतात का तुझ्यासारखं पळून,’ ही वाक्ये महिलांना सरावाची झाली आहेत.उठता बसता घरातून होणारी शेरेबाजी, मानापमानाच्या गोष्टी, कामात उशीर म्हणून ओरड, मद्यपी पतीकडून होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास अशी एक ना अनेक कारणे महिलांचे मानसिक खच्चीकरण करत असतात. मात्र, सासरच्या लोकांनी कितीही मानहानीकारकपणे वागणूक दिली तरीही ‘सहन कर’ हे ब्रह्मवाक्य ज्यांना सोसवत नाही, त्या मृत्यूला कवटाळणं पसंत करतात.महिलांची नैसर्गिक रचना मृदू आहे. मात्र, आत्महत्या करताना ती भलतीच कठोर होते. स्वयंपाक करताना बसलेला छोटा चटका किती वेदनादायी आहे, हे माहीत असूनही ती रॉकेल टाकून स्वत:ला पेटवते. तिचे ही कृत्य तिच्यातील मनस्ताप व्यक्त करणारे आहे. आगीच्या ज्वाळेत स्वत:ला झोकून देण्यासाठी लागणारं धाडस तिला हतबलतेतून येतअसते.आपल्या भविष्याची सुंदर स्वप्न ज्या मुलांच्या रुपाने महिलांच्या आयुष्यात अवतरलेली असतात, त्यांनाही आपल्या पश्चात कोण सांभाळणार, आपण असताना त्यांना कोणी नीट बघितले नाही, मग आपल्या पश्चात कोण बघेल हा विचार करून कठोर आई बनून महिला आत्महत्या करताना मुलांनाही सोबत घेतल्याचे दिसत आहे. या घटनासमोर आल्यानंतर मन सुन्नहोतं.आत्महत्यापूर्वी लक्षणेपुरुषांसारखं महिला कोणतीच भावना मनात ठेवत नाहीत. घरात होणाºया त्रासाविषयी महिला माहेरी सांगतात. अनेकदा माहेरच्या माणसांनाही त्या आत्महत्या करावीशी वाटते, हे बोलून दाखवतात. पण नैराश्यातून आलेले हे वाक्य असल्याचा कुटुंबीयांचा कयास असतो. शेजारी, जवळचे नातेवाईक, पालक यांच्यापेक्षाही महिलांना त्यांचा भाऊ आणि वहिनी अधिक जवळ वाटतात. त्यांच्याशी बोलताना त्या मनातील भावना व्यक्त करतात. पण दुर्दैवाने त्याकडे गांभीर्याने बघितले नाही. नोकरी करणारी महिला असेल तर सहकाºयांशी याविषयावर बोलते.साताऱ्यातील काही उदाहरणेकोरेगाव येथील एका विवाहितेने पती बाहेरगावी गेल्यानंतर आपल्या दीड महिन्याच्या मुलीसह बाथरूममध्ये जाऊन पेटवून घेतले. आत्महत्या करण्यापूर्वी तिने त्याविषयीचा मेसेज भावाला केला होता.कºहाड तालुक्यातील एक विवाहिता आपल्या नऊ वर्षांच्या मुलीबरोबर आपल्या काही नातेवाइकांना भेटली. त्यानंतर घरी परतताना तिने तिच्या मुलीसह स्वत:ला गळफास घेतला आणि मृत्यूला कवटाळले.

ही काही कारणेमाहेरच्या माणसांवरून होणारी मानहानीकारक टिप्पणीसण समारंभ आणि लग्नात न झालेले मानपान यामुळे शेरेबाजी,पतीचा संशयी स्वभाव,या जगात आपले कोणीच नाही ही असुरक्षिततेची भावना,सारखी तडजोड मीच करायची ही हतबलता!