शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
7
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
8
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
9
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
10
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
11
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
12
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
13
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
14
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
15
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
16
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
17
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
18
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
19
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
20
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

तब्बल ९७० उमेदवारांकडून अर्ज माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:08 IST

फलटण : फलटण तालुक्यातील ऐंशी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी तब्बल ९७० उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. ...

फलटण : फलटण तालुक्यातील ऐंशी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी तब्बल ९७० उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. त्यामुळे निवडणूक रिंगणात १२७० उमेदवार उभे आहेत. तालुक्यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून १३८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

फलटण तालुक्यात तब्बल २४०८ अर्ज दाखल झाले होते. २६ अर्ज बाद झाल्याने ऐंशी जागांसाठी २३७८ उमेदवार उभे होते. आता ७४ ग्रामपंचायतींसाठी १२७० उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यातील डोंबाळवाडी, काशीदवाडी, वाघोशी, तडवळे, रावडी खुर्द, ढवळेवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर सांगवी ग्रामपंचायतीचे प्रभाग दोन व प्रभाग तीन, विंचुर्णी ग्रामपंचायतीचे प्रभाग तीन, बोडकेवाडी ग्रामपंचायतीचे प्रभाग १ व प्रभाग ३, कोऱ्हाळे ग्रामपंचायतीचे प्रभाग २, वडगाव ग्रामपंचायतीचा प्रभाग एक, कोरेगाव ग्रामपंचायतीचे प्रभाग ३, जिंती ग्रामपंचायतीचे प्रभाग ४, खुंटे ग्रामपंचायतीचा प्रभाग १, पिराचीवाडी ग्रामपंचायतीचे प्रभाग ३, गुणवरे ग्रामपंचायतीचे प्रभाग ५, आंदरुड ग्रामपंचायतीचे प्रभाग २, मिरढे ग्रामपंचायतीचा प्रभाग १, शेरेशिंदेवाडी ग्रामपंचायतीचे प्रभाग २, निरगुडी ग्रामपंचायतीचे प्रभाग १, प्रभाग ३, प्रभाग ४ हे बिनविरोध प्रभाग झालेले आहेत.

तालुक्यावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे वर्चस्व असल्याने त्यांच्या गटाकडून इच्छुकांची गर्दी होती. अनेक गावांमध्ये राजे गटाअंतर्गतच दोन-तीन पॅनेल होण्याची शक्यता दिसत होती. बंडाळी होऊ नये म्हणून स्वतः रामराजे यांनी अनेक इच्छुकांना बोलावून बंडाच्या तयारीत असणाऱ्यांना थंड करीत अर्ज माघारी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे राजे गटाअंतर्गत होणारी बंडखोरी टळली आहे. त्यांना मानणारे अनेकजण बिनविरोध निवडून आले आहेत.

दुसरीकडे राजे गटाच्या विरोधात खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या गटाने कंबर कसली आहे. बहुसंख्य ग्रामपंचायतीत त्यांनी उमेदवार उभे केले आहेत. खासदार गटातून बाहेर पडलेले दिगंबर आगवणे यांनीही आपल्या समर्थक इच्छुकांना अनेक ग्रामपंचायतींमध्ये उभे केले आहे, तर काहींना बाहेरून ताकद दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

चौकट :

तहसील कार्यालयात गर्दी

अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशीच चिन्ह वाटप होणार असल्याने तहसील कार्यालयाच्या आवारात प्रचंड गर्दी झाली होती. इच्छुक नाराजांची मनधरणी करताना अनेक पॅनेलप्रमुख दिसत होते. जे उमेदवार माघार घेणार होते, त्यांच्यासाठी खास वाहनांचीही सोय त्या-त्या गावातील पॅनेल प्रमुखांनी केली होती.