शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

लोकभावना जिंकली... हेल्मेटची कटकट मिटली !

By admin | Updated: July 13, 2017 15:24 IST

सक्तीचा आदेश पोलिसांनी घेतला मागे

आॅनलाईन लोकमतसातारा, दि.१३ : सातारा जिल्ह्यातील शहरांमध्ये हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, शहरांमधील रस्ते अरुंद आहेत. येथील वाहनांचा वेग खूपच कमी असतो. त्यामुळे हेल्मेट सक्ती करू नये, अशी मागणी साताकरांमधून केली जात होती. या लोकभावनांचा आदर करुन पोलिसांनी हेल्मेट सक्ती मागे घेतली. त्यामुळे सातारकरांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी १५ जुलैपासून जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचा आदेश दिला होता. यानंतर विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी या हेल्मेट सक्ती विरोधात दंड थोपटले होते. हेल्मेट सक्तीला सातारकरांचा वाढता विरोध पाहता आयजी नांगरे पाटील यांनी मवाळ भूमिका घेत सातारकरांच्या भावनेचा आदर करून हेल्मेट सक्ती मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सातारकरांनी सुटकेचा निश्वास सोडला.वास्तविक साताऱ्यामध्ये रस्ते अरूंद असल्यामुळे वाहनांचा वेगही कमी असतो. त्यातच केवळ इनमीन तीन रस्ते असल्यामुळे अपसूकच वेगावर नियंत्रण येत असते. त्यामुळे शहरात हेल्मेट सक्ती नकोच, अशी भूमिका सातारकरांनी घेतली होती. हेल्मेट सक्ती होण्यास केवळ दोन दिवस बाकी असतानाच पोलिसांनी हेल्मेट सक्ती मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सातारकरांच्या जीवात जीव आला.पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी सकाळी पोलिस मुख्यालयात गर्दी केली होती. हेल्मेट सक्ती रद्द झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. हातात पुष्पगुच्छ आणि पेढे घेऊन नागरिक पोलिस अधीक्षकांना भेटण्यासाठी जात होते. यामुळे पोलिस मुख्यालयातील माहोलच बदलून गेला.