शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

वानरांच्या दहशतीने वडूजकर हैराण

By admin | Updated: February 2, 2015 23:57 IST

वनविभागाला लेखी देऊनही टाळाटाळ; पंधरा दिवसांत पंधराजण जखमी

वडूज : ‘पोटासाठी कायपण’ हेच ब्रीदवाक्य अंगी बाळगून भर लोकवस्तीत वानरांच्या टोळीने उच्छांद मांडून आणि प्रसंगी लोकांना गंभीर जखमी करणाऱ्या माकडांनी मुख्य बाजारपेठेतील पेठकऱ्यांचे जीवन गत पंधरा दिवसांपासून हैराण केले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.वडूज परिसरातील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड आणि काहीच खायला न मिळाल्यामुळे या परिसरातील माकडे आक्रमक झाली असल्याने लोकवस्तीमध्ये दहशत माजवत आहे. वानरांना हाकलताना शाळकरी दोन मुली, एक तीन वर्षांचा मुलगा तर इतर वयोवृद्ध व्यक्ती जखमी आहेत. आत्तापर्यंत जखमी झालेल्या व्यक्तींना ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. यानंतर वनविभागाकडे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता आमच्याकडे पिंजरा नाही आणि माकडे धरणारे कर्मचारी नसल्याचे उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहेत. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश तोडकर यांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन हकीगत सांगितली. याबाबत ग्रामपंचायतीने या वानरांचा बंदोबस्त करावा, या आशयाचा ठराव करून वनविभागाकडे सादर करून देखील कोणतीच कार्यवाही झालेली नाही.गत पंधरा दिवसांपासून हैराण झालेले पेठकरी आपले दैनंदिन जीवनमान घाबरतच व्यतीत करीत आहेत. याच रस्त्यावरून शाळेला ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या जादा आहे. तर याच परिसरात चावडी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, पोस्ट आॅफिस आणि मंदिरांची संख्या जादा असल्याने वर्दळ जादा असते.यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास वनविभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)या टोळीचे वारंवार होणारे आक्रमण पाहून पेठकरी गर्भगळीत झालेले दिसून येत आहेत. किराणा दुकानामध्ये बसलेल्या एका युवकाच्या हाताला चावा घेतला तर शाळकरी मुलींना भररस्त्यात धक्के देऊन पाडले आणि लहान मुलाच्या पाठीवर नखांचे ओरखडे ओढल्याने येथील सर्व नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत.