शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वानरांच्या दहशतीने वडूजकर हैराण

By admin | Updated: February 2, 2015 23:57 IST

वनविभागाला लेखी देऊनही टाळाटाळ; पंधरा दिवसांत पंधराजण जखमी

वडूज : ‘पोटासाठी कायपण’ हेच ब्रीदवाक्य अंगी बाळगून भर लोकवस्तीत वानरांच्या टोळीने उच्छांद मांडून आणि प्रसंगी लोकांना गंभीर जखमी करणाऱ्या माकडांनी मुख्य बाजारपेठेतील पेठकऱ्यांचे जीवन गत पंधरा दिवसांपासून हैराण केले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.वडूज परिसरातील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड आणि काहीच खायला न मिळाल्यामुळे या परिसरातील माकडे आक्रमक झाली असल्याने लोकवस्तीमध्ये दहशत माजवत आहे. वानरांना हाकलताना शाळकरी दोन मुली, एक तीन वर्षांचा मुलगा तर इतर वयोवृद्ध व्यक्ती जखमी आहेत. आत्तापर्यंत जखमी झालेल्या व्यक्तींना ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. यानंतर वनविभागाकडे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता आमच्याकडे पिंजरा नाही आणि माकडे धरणारे कर्मचारी नसल्याचे उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहेत. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश तोडकर यांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन हकीगत सांगितली. याबाबत ग्रामपंचायतीने या वानरांचा बंदोबस्त करावा, या आशयाचा ठराव करून वनविभागाकडे सादर करून देखील कोणतीच कार्यवाही झालेली नाही.गत पंधरा दिवसांपासून हैराण झालेले पेठकरी आपले दैनंदिन जीवनमान घाबरतच व्यतीत करीत आहेत. याच रस्त्यावरून शाळेला ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या जादा आहे. तर याच परिसरात चावडी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, पोस्ट आॅफिस आणि मंदिरांची संख्या जादा असल्याने वर्दळ जादा असते.यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास वनविभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)या टोळीचे वारंवार होणारे आक्रमण पाहून पेठकरी गर्भगळीत झालेले दिसून येत आहेत. किराणा दुकानामध्ये बसलेल्या एका युवकाच्या हाताला चावा घेतला तर शाळकरी मुलींना भररस्त्यात धक्के देऊन पाडले आणि लहान मुलाच्या पाठीवर नखांचे ओरखडे ओढल्याने येथील सर्व नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत.