शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

वानरांच्या दहशतीने वडूजकर हैराण

By admin | Updated: February 2, 2015 23:57 IST

वनविभागाला लेखी देऊनही टाळाटाळ; पंधरा दिवसांत पंधराजण जखमी

वडूज : ‘पोटासाठी कायपण’ हेच ब्रीदवाक्य अंगी बाळगून भर लोकवस्तीत वानरांच्या टोळीने उच्छांद मांडून आणि प्रसंगी लोकांना गंभीर जखमी करणाऱ्या माकडांनी मुख्य बाजारपेठेतील पेठकऱ्यांचे जीवन गत पंधरा दिवसांपासून हैराण केले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.वडूज परिसरातील मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड आणि काहीच खायला न मिळाल्यामुळे या परिसरातील माकडे आक्रमक झाली असल्याने लोकवस्तीमध्ये दहशत माजवत आहे. वानरांना हाकलताना शाळकरी दोन मुली, एक तीन वर्षांचा मुलगा तर इतर वयोवृद्ध व्यक्ती जखमी आहेत. आत्तापर्यंत जखमी झालेल्या व्यक्तींना ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. यानंतर वनविभागाकडे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता आमच्याकडे पिंजरा नाही आणि माकडे धरणारे कर्मचारी नसल्याचे उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहेत. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश तोडकर यांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन हकीगत सांगितली. याबाबत ग्रामपंचायतीने या वानरांचा बंदोबस्त करावा, या आशयाचा ठराव करून वनविभागाकडे सादर करून देखील कोणतीच कार्यवाही झालेली नाही.गत पंधरा दिवसांपासून हैराण झालेले पेठकरी आपले दैनंदिन जीवनमान घाबरतच व्यतीत करीत आहेत. याच रस्त्यावरून शाळेला ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या जादा आहे. तर याच परिसरात चावडी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, पोस्ट आॅफिस आणि मंदिरांची संख्या जादा असल्याने वर्दळ जादा असते.यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास वनविभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)या टोळीचे वारंवार होणारे आक्रमण पाहून पेठकरी गर्भगळीत झालेले दिसून येत आहेत. किराणा दुकानामध्ये बसलेल्या एका युवकाच्या हाताला चावा घेतला तर शाळकरी मुलींना भररस्त्यात धक्के देऊन पाडले आणि लहान मुलाच्या पाठीवर नखांचे ओरखडे ओढल्याने येथील सर्व नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत.