शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वारा गाई गाणे...‘कोटींचे’ तराणे !

By admin | Updated: August 24, 2014 00:32 IST

जिल्ह्यात १८५३ पवनचक्क्या : ‘सातारचा डोंगर’ मिळवून देतोय वर्षाला ४७८ कोटी

मोहन मस्कर-पाटील ल्ल साताराजिल्ह्यातील अनेक डोंगरपठारावर सुसाट वेगाने धावणारे वारे पवनचक्की कंपन्यांसाठी ‘कोटींची उड्डाण’ ठरले आहे. जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांनी वाऱ्याच्या माध्यमातून वीजनिर्मिती केली आणि ती राज्याला दिली म्हणून ‘महावितरण’ने त्यांना वर्षभरात ४७८ कोटी रुपये दिले आहेत. परिणामी धरणातील पाण्यापाठोपाठ आता सातारचे वारेही पवनचक्की कंपन्यांना अब्जाधीश बनविण्यास कारणीभूत ठरले आहे. जिल्ह्यात आजमितीस १८५३ पवनचक्की कार्यरत आहेत. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरणाने महाराष्ट्र प्रकाशमान केला. एकट्या कोयना धरणातून २000 मेगावॅट वीजनिर्मिती होते. कोयना धरणातील वीजनिर्मिती टप्प्याटप्प्याने वाढत गेली असलीतरी गेल्या सहा दशकात कोयना धरणाने ‘महावितरण’ला किती कोटी मिळवून दिले असतील, याची कल्पनाच न केलेली बरी. कोयना धरणापाठोपाठ आता सातारचा वाराही पवनचक्की कंपन्यांना कोट्यधीश बनविणारा ठरला आहे. याच वाऱ्याच्या वेगावर पवनचक्कींच्या माध्यमातून महावितरणला १४२४ मेगावॅट वीज मिळत आहे. सातारा जिल्ह्याचा बहुतांशी भाग डोंगराळ आहे. गणेशवाडी, कास, चाळकेवाडी, बामणोली, पाटण, चाळकेवाडी, ठोसेघर, चवणेश्वर येथे जगभरातील आंतरराष्ट्रीय, बहुराष्ट्रीय विंड मिल कंपन्यांनी पवनचक्की उभारल्या आहेत. काही पवनचक्क्या पुणे, मुबंई येथील नामांकित उद्योगसमूहांच्या आहेत. या डोंगरपठारावर १८५३ पवनचक्की असून येथे १४२४ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. यातून १९00 दशलक्ष युनिट वीज महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीला मिळत असून त्याबदल्यात महावितरण संबंधित पवनचक्की कंपन्यांना पैसे देत आहे. यावर्षातील ही रक्कम ४७८ कोटी इतकी आहे.सह्याद्रीच्या रांगामुळे सातारा जिल्ह्याकडे नेहमीच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर कार्यरत पवनचक्की उद्योगाचे लक्ष गेले आहे. त्यातूनच प्रत्येक वर्षाला जिल्ह्यात सरासरी शंभरहून अधिक पवनचक्क्यांची उभारणी होत आहे. सर्वाधिक पवनचक्क्या पाटण आणि सातारा तालुक्यात उभारल्या आहेत. जावळी तालुक्यातही हे लोण पसरत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत आता माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्याच्या काही भागात पवनचक्की उभारणीला वेग आला आहे. त्यामुळे पवनचक्क्यांची संख्या वाढणार आहे. आगामी चार ते पाच वर्षांत तर हेच प्रमाण चार हजारच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.जमिनीचे भाव भिडले गगनाला४सातारा जिल्ह्यात असणाऱ्या कास, बामणोली, चाळकेवाडी, डोंगरपठारावरील जमिनीला पूर्वी कोणी भाव द्यायलाही तयार नसायचे. मात्र, गेल्या दशकात येथील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यास कारणीभूत पवनचक्की कंपन्याच आहेत, ही बाब कोणी नाकारत नाही. यातून काही दलालही निर्माण झाले. अनेकांनी एकच जागा चार ते पाच जणांना विकण्याचे प्रतापही केले आहेत. विशेष म्हणजे दलालांमध्ये सरकारी कर्मचारी, शिक्षक मंडळीही सहभागी आहे. ग्रामपंचायतींना ३२ कोटींचा कर पवनचक्की कंपन्यांनी ज्या परिसरात अथवा ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत पवनचक्की उभी केली आहे, त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामपंचायतीला २0१३ च्या शासन निर्णयाप्रमाणे कर देणे बंधनकारक आहे. मात्र, कोरेगाव, खटाव, कऱ्हाड, जावळी, सातारा, पाटण, वाई, महाबळेश्वर आणि माण या नऊ तालुक्यातील १६२0 पवनचक्की कंपन्या १२0४ ग्रामपंचायतींना करापोटी असणारी ३२ कोटी २२ लाख २१ हजार रुपये इतके देणे लागते.