शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

वारा गाई गाणे...‘कोटींचे’ तराणे !

By admin | Updated: August 24, 2014 00:32 IST

जिल्ह्यात १८५३ पवनचक्क्या : ‘सातारचा डोंगर’ मिळवून देतोय वर्षाला ४७८ कोटी

मोहन मस्कर-पाटील ल्ल साताराजिल्ह्यातील अनेक डोंगरपठारावर सुसाट वेगाने धावणारे वारे पवनचक्की कंपन्यांसाठी ‘कोटींची उड्डाण’ ठरले आहे. जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांनी वाऱ्याच्या माध्यमातून वीजनिर्मिती केली आणि ती राज्याला दिली म्हणून ‘महावितरण’ने त्यांना वर्षभरात ४७८ कोटी रुपये दिले आहेत. परिणामी धरणातील पाण्यापाठोपाठ आता सातारचे वारेही पवनचक्की कंपन्यांना अब्जाधीश बनविण्यास कारणीभूत ठरले आहे. जिल्ह्यात आजमितीस १८५३ पवनचक्की कार्यरत आहेत. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरणाने महाराष्ट्र प्रकाशमान केला. एकट्या कोयना धरणातून २000 मेगावॅट वीजनिर्मिती होते. कोयना धरणातील वीजनिर्मिती टप्प्याटप्प्याने वाढत गेली असलीतरी गेल्या सहा दशकात कोयना धरणाने ‘महावितरण’ला किती कोटी मिळवून दिले असतील, याची कल्पनाच न केलेली बरी. कोयना धरणापाठोपाठ आता सातारचा वाराही पवनचक्की कंपन्यांना कोट्यधीश बनविणारा ठरला आहे. याच वाऱ्याच्या वेगावर पवनचक्कींच्या माध्यमातून महावितरणला १४२४ मेगावॅट वीज मिळत आहे. सातारा जिल्ह्याचा बहुतांशी भाग डोंगराळ आहे. गणेशवाडी, कास, चाळकेवाडी, बामणोली, पाटण, चाळकेवाडी, ठोसेघर, चवणेश्वर येथे जगभरातील आंतरराष्ट्रीय, बहुराष्ट्रीय विंड मिल कंपन्यांनी पवनचक्की उभारल्या आहेत. काही पवनचक्क्या पुणे, मुबंई येथील नामांकित उद्योगसमूहांच्या आहेत. या डोंगरपठारावर १८५३ पवनचक्की असून येथे १४२४ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. यातून १९00 दशलक्ष युनिट वीज महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीला मिळत असून त्याबदल्यात महावितरण संबंधित पवनचक्की कंपन्यांना पैसे देत आहे. यावर्षातील ही रक्कम ४७८ कोटी इतकी आहे.सह्याद्रीच्या रांगामुळे सातारा जिल्ह्याकडे नेहमीच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर कार्यरत पवनचक्की उद्योगाचे लक्ष गेले आहे. त्यातूनच प्रत्येक वर्षाला जिल्ह्यात सरासरी शंभरहून अधिक पवनचक्क्यांची उभारणी होत आहे. सर्वाधिक पवनचक्क्या पाटण आणि सातारा तालुक्यात उभारल्या आहेत. जावळी तालुक्यातही हे लोण पसरत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत आता माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्याच्या काही भागात पवनचक्की उभारणीला वेग आला आहे. त्यामुळे पवनचक्क्यांची संख्या वाढणार आहे. आगामी चार ते पाच वर्षांत तर हेच प्रमाण चार हजारच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.जमिनीचे भाव भिडले गगनाला४सातारा जिल्ह्यात असणाऱ्या कास, बामणोली, चाळकेवाडी, डोंगरपठारावरील जमिनीला पूर्वी कोणी भाव द्यायलाही तयार नसायचे. मात्र, गेल्या दशकात येथील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यास कारणीभूत पवनचक्की कंपन्याच आहेत, ही बाब कोणी नाकारत नाही. यातून काही दलालही निर्माण झाले. अनेकांनी एकच जागा चार ते पाच जणांना विकण्याचे प्रतापही केले आहेत. विशेष म्हणजे दलालांमध्ये सरकारी कर्मचारी, शिक्षक मंडळीही सहभागी आहे. ग्रामपंचायतींना ३२ कोटींचा कर पवनचक्की कंपन्यांनी ज्या परिसरात अथवा ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत पवनचक्की उभी केली आहे, त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामपंचायतीला २0१३ च्या शासन निर्णयाप्रमाणे कर देणे बंधनकारक आहे. मात्र, कोरेगाव, खटाव, कऱ्हाड, जावळी, सातारा, पाटण, वाई, महाबळेश्वर आणि माण या नऊ तालुक्यातील १६२0 पवनचक्की कंपन्या १२0४ ग्रामपंचायतींना करापोटी असणारी ३२ कोटी २२ लाख २१ हजार रुपये इतके देणे लागते.