शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

वने वाऱ्यावर; समित्या कागदावर

By admin | Updated: November 22, 2014 00:19 IST

सदस्य अधिकारांपासून अंधारात : लाकूडतोड, शिकार मात्र सुरूच

सणबूर : लोकसहभागातून वनांचे संरक्षण व्हावे, यासाठी प्रत्येक गावात वनसंरक्षण समिती स्थापन करण्यात आली; मात्र त्या समित्या सध्या कागदावरच राहिल्या असल्याचे चित्र आहे़ अनेकांना ते त्या समितीत आहेत, याचीही माहिती नसल्याचे चित्र आहे़ त्यामुळे राजरोसपणे जंगलपट्ट्यात लाकूडतोड व शिकार सुरू असतानाही, त्याची माहिती वन विभागाला तातडीने मिळू शकत नाही़ या समित्यांना अनेक अधिकार असताना त्यांच्या अधिकारांचीही जाणीवच करून देण्यात आलेली नाही़ त्यामुळे या समित्या असून नसल्यासारख्या आहेत़ ढेबेवाडी विभागात मोठ्या प्रमाणात जंगल आहे़ त्याच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभागावर आहे़ मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची अपुरी असलेली संख्या आणि मोठ्या प्रमाणात असणारे कार्यक्षेत्राचा मेळ घालणे अवघड बनले आहे़ सध्या उपलब्ध असलेल्या वनाचे रक्षण, लोकसहभाग वाढावा आणि लोकांच्यामध्ये त्याबाबतची जनजागृती व्हावी, यासाठी गावोगावी वनसंरक्षण समिती स्थापन करण्यात आली़ त्यानुसार ज्या-ज्या ठिकाणी वनक्षेत्र व त्याचा परिसर आहे, त्या ठिकाणच्या प्रत्येक गावात वनसमितीची स्थापना करण्यात आली आहेत़ या समित्यांना अनेक हक्क व अधिकार देण्यात आले आहेत़ असे असतानाही मात्र त्या समित्यांच्या कामामध्ये सातत्य दिसत नाही़ स्थापन करण्यात आलेल्या वनसमित्या केवळ कागदावरच राहिल्याने वनाच्या व वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ शिवाय परिसरात लाकूडतोड सुरू असल्याचे दिसून येत आहे़ त्याबाबतची माहिती वनविभागाला मिळत नाही़ त्यामुळे त्यांना कारवाई करताना समस्या निर्माण होत आहेत़ परिणामी लाकूडतोड करणाऱ्यांवर कारवाई होणार कशी? हाच प्रश्न निर्माण झाला आहे़ (वार्ताहर)सदस्यच अनभिज्ञवनसंरक्षण समितीमध्ये सरपंच, ग्रामसेवक हे सदस्य असतात़ तर वनपाल हे त्या समितीचे सचिव असतात़ त्याचबरोबर स्वायत्त संस्थेने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती आणि अन्य सहा सदस्यांचा या समितीमध्ये समावेश असतो; पण अनेक ठिकाणी या अन्य सहा सदस्यांनाच आपण समितीत असल्याचे माहीत दिसत नाही़