शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

सातारचा ‘भोपाळ’ करणार का ?

By admin | Updated: November 26, 2014 00:06 IST

‘भीमेश्वरी’ चे प्रदूषण : देगाव, निगडी ग्रामस्थांचा सवाल; ‘पीसीबी’च्या आदेशाला केराची टोपली

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमधील भीमेश्वर इस्पात कंपनीतून बाहेर सोडण्यात येणाऱ्या धूर व कार्बनमुळे नागरिकांच्या आरोग्यावर भीषण परिणाम होऊ लागले आहेत. अनेकदा या कंपनीच्या प्रशासनाला नागरिकांनी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस देवूनही कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे या कंपनीचे प्रशासन भोपाळच्या पुनरावृत्तीची वाट पाहातय का, असा सवाल कारंडवाडी, देगांव, निगडी परिसरातील नागरिक करीत आहेत.देगाव रस्त्यावरील लोकवस्तीलगत भीमेश्वर इस्पात हा लोखंड प्रक्रिया करून स्टीलनिर्मिती करणारा कारखाना आहे. कारंडवाडी, देगाव आणि निगडी परिसर या कारखान्याला लागून आहे. या कंपनीमध्ये रात्रंदिवस उत्पादन सुरू केले आहे. कारखान्यातील काजळी, धूर स्वरूपात कार्बन बाहेर फेकला जातो. ज्या ठिकाणाहून धूर सोडण्यात येतो, ती नळी (चिमणी) ची उंची कमी आहे. त्यातच तो भाग सखल असल्यामुळे त्यातून बाहेर पडणारा धूर वाऱ्यामुळे कारंडवाडी परिसरात पसरतो. धुरामुळे रहिवाशांच्या डोळ्यांची जळजळ होत आहे. घरांची पत्रे, छतावर काजळीचा थर साठला आहे. घरांच्या खिडक्या, काचा, भांडी, काळी पडू लागली आहेत.देगाव रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनाही या धुराचा त्रास होत आहे. केवळ धुराड्यातूनच नव्हे तर कारखान्याच्या शेडमधूनही मोठ्या प्रमाणात धूर, कार्बनचे लोट बाहेर येत आहेत. तेथील रहिवाशांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. याबाबत परिसरातील नगरिकांनी जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळालाही अनेकदा निवेदन दिली आहेत. मात्र अद्याप यावर निर्णय झाला नाही. धुरामुळेच नागरिकांच्या आरोग्यला धोका होत आहे. हे वैद्यकीय तपासणी केल्याशीवाय समजणार नाही, त्यामुळे प्रशासनाने आजारी पडणाऱ्या नागरिकांची तपासणी करावी, अशीही नागरिकांतून मागणी होत आहे. माणसांचे जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही ग्रामस्थ करीत आहेत.प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीला इमीशन कंट्रोल बसवून घ्यावे, अशा आशयाचे नोटीस पाठविले आहे. मात्र अद्याप कंपनीच्या प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून आणखीनच संतापाची लाट उसळली आहे. प्रदूषण मंडळालाही न जुमानणाऱ्या या कंपनीच्या प्रशासनाला नागरिकांतून उठाव झाल्यानंतर तरी जाग येईल का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.येत्या काही दिवसांत जर त्या कंपनीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही पाऊल न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी वेळोवेळी कंपनीला दिला आहे. (प्रतिनिधी)झोपेत जीव गुदमरण्याची भीतीदेगाव रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनाही या धुराचा त्रास होत आहे. केवळ धुराड्यातूनच नव्हे तर कारखान्याच्या शेडमधूनही मोठ्या प्रमाणात धूर, कार्बनचे लोट बाहेर येत आहेत. तेथील रहिवाशांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. याबाबत परिसरातील नगरिकांनी जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळालाही अनेकदा निवेदन दिली आहेत. मात्र अद्याप यावर निर्णय झाला नाही. रात्री अचानक झोपेत असताना धूरामुळे जीव गुदमरून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या कमालीचे भीतीचे वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे. जास्त धुराचाही आरोग्यास धोका असतो. त्यामुळे इस्पात कंपनीला इमीशन कंट्रोल बसवून घ्या म्हणून नोटीस दिली आहे. मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणतीच कारवाई झालेली नाही.- आय. टी. गायकवाड, प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकारी