शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

सातारचा ‘भोपाळ’ करणार का ?

By admin | Updated: November 26, 2014 00:06 IST

‘भीमेश्वरी’ चे प्रदूषण : देगाव, निगडी ग्रामस्थांचा सवाल; ‘पीसीबी’च्या आदेशाला केराची टोपली

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमधील भीमेश्वर इस्पात कंपनीतून बाहेर सोडण्यात येणाऱ्या धूर व कार्बनमुळे नागरिकांच्या आरोग्यावर भीषण परिणाम होऊ लागले आहेत. अनेकदा या कंपनीच्या प्रशासनाला नागरिकांनी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस देवूनही कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे या कंपनीचे प्रशासन भोपाळच्या पुनरावृत्तीची वाट पाहातय का, असा सवाल कारंडवाडी, देगांव, निगडी परिसरातील नागरिक करीत आहेत.देगाव रस्त्यावरील लोकवस्तीलगत भीमेश्वर इस्पात हा लोखंड प्रक्रिया करून स्टीलनिर्मिती करणारा कारखाना आहे. कारंडवाडी, देगाव आणि निगडी परिसर या कारखान्याला लागून आहे. या कंपनीमध्ये रात्रंदिवस उत्पादन सुरू केले आहे. कारखान्यातील काजळी, धूर स्वरूपात कार्बन बाहेर फेकला जातो. ज्या ठिकाणाहून धूर सोडण्यात येतो, ती नळी (चिमणी) ची उंची कमी आहे. त्यातच तो भाग सखल असल्यामुळे त्यातून बाहेर पडणारा धूर वाऱ्यामुळे कारंडवाडी परिसरात पसरतो. धुरामुळे रहिवाशांच्या डोळ्यांची जळजळ होत आहे. घरांची पत्रे, छतावर काजळीचा थर साठला आहे. घरांच्या खिडक्या, काचा, भांडी, काळी पडू लागली आहेत.देगाव रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनाही या धुराचा त्रास होत आहे. केवळ धुराड्यातूनच नव्हे तर कारखान्याच्या शेडमधूनही मोठ्या प्रमाणात धूर, कार्बनचे लोट बाहेर येत आहेत. तेथील रहिवाशांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. याबाबत परिसरातील नगरिकांनी जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळालाही अनेकदा निवेदन दिली आहेत. मात्र अद्याप यावर निर्णय झाला नाही. धुरामुळेच नागरिकांच्या आरोग्यला धोका होत आहे. हे वैद्यकीय तपासणी केल्याशीवाय समजणार नाही, त्यामुळे प्रशासनाने आजारी पडणाऱ्या नागरिकांची तपासणी करावी, अशीही नागरिकांतून मागणी होत आहे. माणसांचे जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही ग्रामस्थ करीत आहेत.प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीला इमीशन कंट्रोल बसवून घ्यावे, अशा आशयाचे नोटीस पाठविले आहे. मात्र अद्याप कंपनीच्या प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून आणखीनच संतापाची लाट उसळली आहे. प्रदूषण मंडळालाही न जुमानणाऱ्या या कंपनीच्या प्रशासनाला नागरिकांतून उठाव झाल्यानंतर तरी जाग येईल का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.येत्या काही दिवसांत जर त्या कंपनीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही पाऊल न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी वेळोवेळी कंपनीला दिला आहे. (प्रतिनिधी)झोपेत जीव गुदमरण्याची भीतीदेगाव रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनाही या धुराचा त्रास होत आहे. केवळ धुराड्यातूनच नव्हे तर कारखान्याच्या शेडमधूनही मोठ्या प्रमाणात धूर, कार्बनचे लोट बाहेर येत आहेत. तेथील रहिवाशांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. याबाबत परिसरातील नगरिकांनी जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळालाही अनेकदा निवेदन दिली आहेत. मात्र अद्याप यावर निर्णय झाला नाही. रात्री अचानक झोपेत असताना धूरामुळे जीव गुदमरून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या कमालीचे भीतीचे वातावरण असल्याचे चित्र दिसत आहे. जास्त धुराचाही आरोग्यास धोका असतो. त्यामुळे इस्पात कंपनीला इमीशन कंट्रोल बसवून घ्या म्हणून नोटीस दिली आहे. मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणतीच कारवाई झालेली नाही.- आय. टी. गायकवाड, प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकारी