शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ोरेंना त्यांची जागा दाखविणारच !

By admin | Updated: April 26, 2017 23:39 IST

रामराजे नाईक-निंबाळकर : पवारवाडीतील सभेत सणसणीत इशारा, माझा राजकीय जन्मच बंडखोरीतून

फलटण : ‘सांगलीच्या तुरुंगातून सुटून आलेल्या व ज्याचे घरातील व्यक्तीशीही पटत नाही, अशा माणच्या माणसाला तालुक्यात थारा देऊ नका, माझ्यावर राजकीय पेक्षा वैयक्तिक टीका करणाऱ्यांना तुम्ही जाब विचारला पाहिजे. माझा राजकीय जन्मच बंडखोरीतून झाला आहे. त्यामुळे आमदार जयकुमार गोरेंसारख्या माणसाला त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही,’ असा सणसणीत इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला. पवारवाडी (ता. फलटण) येथे आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक दादाराजे खर्डेकर, आमदार दीपक चव्हाण, पंचायत समिती सभापती रेश्मा भोसले, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर आदी उपस्थित होतेरामराजे म्हणाले, ‘संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सर्वांपर्यंत मनमिळावू काम सुरू केले आहे. २५ वर्षे त्यांनी तालुक्याची सेवा केली आहे. अनेक दौरे यशस्वी केले आहेत. ग्रामीण भागातील सोसायट्या, ग्रामपंचायती व अन्य संस्थांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असून, त्यांनी केलेल्या कामाची हीच खरी पोच पावती आहे. माझ्या राजकीय यशामध्ये माझे भाऊ व ज्येष्ठ नेते दादाराजे यांचाही मोठा वाटा आहे.सध्या राज्यामध्ये अनेक राजकीय उलथापालथ सुरू असून, त्यात आपल्या जिल्ह्याने माजी मंत्री शरद पवार यांच्यावर प्रेम दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवली. परंतु ज्यांनी काँग्रेसची संस्कृती नीट जोपासली नाही त्यांनीच नाश करायला सुरुवात केली. त्या माजी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला राजकीय शहाणपण शिकवू नये. ज्या चिमणराव कदमांनी तालुक्यात राजकारण केले त्यांची ग्रामपंचायतही वाईट प्रवृत्तीकडे गेल्याने आपल्या मनाला वाईट वाटत आहे. त्यामुळे नको त्या माणसाच्या हातात सत्ता देऊ नका. तालुक्यात धोम-बलकवडीचे पाणी आणले, विविध विकासकामे केली. २५ वर्षे सत्ता आमच्या ताब्यात दिली, आमच्यावर मोठा विश्वास दाखवला त्यामध्ये प्रामुख्याने पूर्व भागाची नेहमीच साथ मिळाली, असे रामराजे म्हणाले. (प्रतिनिधी)शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावे...‘ज्या सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्याला समृद्ध करण्याचे आश्वासन दिले होते. त्या सरकारने तूर, कांदा, पालेभाज्यांचे दर पाडले ते सरकार काय करणार? ज्या शरद पवारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडले होते. शेतकरी महत्त्वाचा घटक मानून कार्य केले त्या शरद पवारांची किंमत जनतेला कळली आहे. शरद पवारांनी पंतप्रधान व्हावे, ही आमची इच्छा आहे. तालुक्यात विकासाची गंगा पोहोचवणाऱ्या शरद पवारांचा फलटण तालुका कायमच ऋणी आहे,’ असेही रामराजे यांनी सांगितले.