शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
4
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
5
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
7
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
8
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
9
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
10
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
11
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
12
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
14
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
15
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
16
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
17
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
18
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
19
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
20
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल

ोरेंना त्यांची जागा दाखविणारच !

By admin | Updated: April 26, 2017 23:39 IST

रामराजे नाईक-निंबाळकर : पवारवाडीतील सभेत सणसणीत इशारा, माझा राजकीय जन्मच बंडखोरीतून

फलटण : ‘सांगलीच्या तुरुंगातून सुटून आलेल्या व ज्याचे घरातील व्यक्तीशीही पटत नाही, अशा माणच्या माणसाला तालुक्यात थारा देऊ नका, माझ्यावर राजकीय पेक्षा वैयक्तिक टीका करणाऱ्यांना तुम्ही जाब विचारला पाहिजे. माझा राजकीय जन्मच बंडखोरीतून झाला आहे. त्यामुळे आमदार जयकुमार गोरेंसारख्या माणसाला त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही,’ असा सणसणीत इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला. पवारवाडी (ता. फलटण) येथे आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक दादाराजे खर्डेकर, आमदार दीपक चव्हाण, पंचायत समिती सभापती रेश्मा भोसले, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर आदी उपस्थित होतेरामराजे म्हणाले, ‘संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सर्वांपर्यंत मनमिळावू काम सुरू केले आहे. २५ वर्षे त्यांनी तालुक्याची सेवा केली आहे. अनेक दौरे यशस्वी केले आहेत. ग्रामीण भागातील सोसायट्या, ग्रामपंचायती व अन्य संस्थांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असून, त्यांनी केलेल्या कामाची हीच खरी पोच पावती आहे. माझ्या राजकीय यशामध्ये माझे भाऊ व ज्येष्ठ नेते दादाराजे यांचाही मोठा वाटा आहे.सध्या राज्यामध्ये अनेक राजकीय उलथापालथ सुरू असून, त्यात आपल्या जिल्ह्याने माजी मंत्री शरद पवार यांच्यावर प्रेम दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दाखवली. परंतु ज्यांनी काँग्रेसची संस्कृती नीट जोपासली नाही त्यांनीच नाश करायला सुरुवात केली. त्या माजी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला राजकीय शहाणपण शिकवू नये. ज्या चिमणराव कदमांनी तालुक्यात राजकारण केले त्यांची ग्रामपंचायतही वाईट प्रवृत्तीकडे गेल्याने आपल्या मनाला वाईट वाटत आहे. त्यामुळे नको त्या माणसाच्या हातात सत्ता देऊ नका. तालुक्यात धोम-बलकवडीचे पाणी आणले, विविध विकासकामे केली. २५ वर्षे सत्ता आमच्या ताब्यात दिली, आमच्यावर मोठा विश्वास दाखवला त्यामध्ये प्रामुख्याने पूर्व भागाची नेहमीच साथ मिळाली, असे रामराजे म्हणाले. (प्रतिनिधी)शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावे...‘ज्या सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्याला समृद्ध करण्याचे आश्वासन दिले होते. त्या सरकारने तूर, कांदा, पालेभाज्यांचे दर पाडले ते सरकार काय करणार? ज्या शरद पवारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडले होते. शेतकरी महत्त्वाचा घटक मानून कार्य केले त्या शरद पवारांची किंमत जनतेला कळली आहे. शरद पवारांनी पंतप्रधान व्हावे, ही आमची इच्छा आहे. तालुक्यात विकासाची गंगा पोहोचवणाऱ्या शरद पवारांचा फलटण तालुका कायमच ऋणी आहे,’ असेही रामराजे यांनी सांगितले.