शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

डंपर, टीपर चालवून प्रश्न सुटतील का:शिवेंद्रसिंहराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:08 IST

सातारा : ‘डंपर आणि टीपर चालवून सातारकरांचे प्रश्न सुटतील, असा बालिशपणा दाखविणाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांनीच नगराध्यक्षा व्हावे, असे म्हणणे म्हणजे आपली जबाबदारी झटकून जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखवणे आहे. जिल्हाधिकाºयांना कशाला, ज्या साशा कंपनीमुळे सातारकरांचे जगणे मुश्कील झाले आहे, त्या साशा कंपनीलाच पालिका चालविण्यास द्या, म्हणजे तुमचे समाधान होईल,’ असा घणाघात आमदार शिवेंद्रसिंहराजे ...

सातारा : ‘डंपर आणि टीपर चालवून सातारकरांचे प्रश्न सुटतील, असा बालिशपणा दाखविणाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांनीच नगराध्यक्षा व्हावे, असे म्हणणे म्हणजे आपली जबाबदारी झटकून जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखवणे आहे. जिल्हाधिकाºयांना कशाला, ज्या साशा कंपनीमुळे सातारकरांचे जगणे मुश्कील झाले आहे, त्या साशा कंपनीलाच पालिका चालविण्यास द्या, म्हणजे तुमचे समाधान होईल,’ असा घणाघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गणेशोत्सव तोंडावर आला असून, गणेशोत्सवानंतर गणेशमूर्ती कोठे विसर्जित करायच्या? असा गहण प्रश्न निर्माण झाला आहे. सातारा शहरातील गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन कोठे करायचे, याबाबत निर्णय घेण्यास आणि तोडगा काढण्यास सातारा पालिकेने खूपच उशीर केला आहे. आता गणेश मंडळांच्या बैठका घेऊन आणि चर्चा करून सत्ताधारी चूक लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.वास्तविक विसर्जन कोठे करायचे, याचा निर्णय गणेश मंडळे घेऊ शकत नाहीत. त्यामुळे चर्चेचा फार्स कशासाठी केला? काही दिवसांपूर्वीच खासदारांनी रिसालदार तळ्यात विसर्जन करण्याचा निर्णय जाहीर केला होता. पोलीस प्रशासनाने मात्र विसर्जनास नकार दिला आहे. त्यामुळे मूर्ती विसर्जनाचा प्रश्न आता जटील बनला आहे. त्यामुळे खुशीत गाजरे खाणाºयांची झोप उडाली आहे. त्यामुळेच त्यांनी जिल्हाधिकाºयांना दगडाची उपमा देऊन आपला नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हाधिकारी म्हणजे म्हटलं तर देव आणि म्हटलं तर दगड, असे म्हणणाºयांना जनाची नाही तर, मनाची तरी लाज वाटायला हवी होती.वाळू ठेक्यांचे परवाने हवे तसे मिळाले की जिल्हाधिकारी देव आणि सातारा पालिकेतील भ्रष्टाचाराला चाप लावला की जिल्हाधिकारी दगड, तुम्हाला असे म्हणायचे आहे का? असा बोचरा सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला आहे. निवडणुकीपूर्वी जी आश्वासने सातारकरांना दिली. त्यांना भावनिक करून सत्ता मिळवली. आज त्याच सातारकरांची काय अवस्था करून ठेवली आहे? साताºयातील सगळ्याच रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरातील सर्वच कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत. सातारकरांना घरातून बाहेर पडणे आणि वाहन चालवणे मुश्कील बनले आहे.खापर दुसºयावर फोडून प्रश्न सुटणार का?‘सातारा पालिकेचा कारभार रामभरोसे चालला असून, गणेशमूर्ती विसर्जनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक विसर्जनाची जबाबदारी ही सातारा नगरपालिकेची आहे. असे असताना पालिकेचा कुचकामी, नियोजनशून्य कारभार आणि स्वत:चा नाकर्तेपणा लपवण्यासाठी आपले लोकप्रिय खासदार जिल्हाधिकाºयांना दगड संबोधून लपण्याचा प्रयत्न करत आहेत. गणेशमूर्ती विसर्जनाला तोशिष लागली तर सातारकर तुम्हाला माफ करणार नाहीत,’ अशी टीकाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.पालिकेच्या तिजोरीची लूट सुरू...स्वच्छता अभियान आणि शहर स्वच्छतेसाठी करोडो रुपयांचा चुराडा केला तरीही ‘अ’ वर्ग नगरपालिका असलेल्या साताºयाचा पहिल्या दहामध्ये नंबरही आला नाही. साशा नावाचे भूत सातारकरांच्या मानगुटीवर बसवून पालिकेच्या तिजोरीची लूट सुरू आहे. तरीही शहरात कचरा आहे. कमिशनला कंटाळून बिचाºया घंटागाडीचालकाला विषप्राशन करावे लागते, यावर कोणीही ब्र शब्द काढत नाही, हेच का तुमचे रोल मॉडेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.चुकीच्या कामाला यापुढेही विरोधपैसा, टक्केवारी आणि कमिशन यातून बाहेर पडला तर, तुम्हाला सातारकरांच्या समस्या दिसतील.जिल्हाधिकाºयांना दगड म्हणून समस्येपासून पळ काढण्यापेक्षा गणरायाच्या विसर्जनाचे विघ्न दूर करण्यासाठी याआधीच हालचाल करायला हवी होती.गणेश विसर्जनाचा प्रश्न सुटला नाही तर, सातारकर जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही.जिथे चुकीचा कारभार तिथे नगरविकास आघाडी तुम्हाला विरोधच करत आली आहे आणि सातारकरांच्या हितासाठी यापुढेही विरोध करत राहील.