शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
2
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
3
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
4
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
5
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
6
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
7
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
8
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
9
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
10
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
11
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
12
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
13
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
14
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
15
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
16
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
17
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
18
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
19
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
20
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)

औंधला ‘गरीब रथ’ थांबेल का?

By admin | Updated: March 20, 2016 23:51 IST

ग्रामस्थांचा सवाल : तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळाकडे एसटी महामंडळाचे दुर्लक्ष झाल्याने नाराजी

रशीद शेख -- औंध औंध, ता. खटाव येथे औंधमार्गे धावणाऱ्या अनेक एसटी गाड्यामागील काही वर्षांपासून हळूहळू बंद करण्यात आल्या असून, पूर्वीप्रमाणे सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करून भाविक, पर्यटक व विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवावी, अशी मागणी औंध ग्रामस्थांकडून होत आहे.सध्या उन्हाळी सुटीचा हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे औंधला येणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्यानंतर औंधमध्ये व्यापारी, व्यावसायिक वर्गांची मोठी उलाढाल होत असते; परंतु मागील काही दिवसांपासून अनेक लांब पल्ल्याच्या एसटी बस बंद आहेत. एसटीने औंधला येणाऱ्या भाविक, पर्यटकांची सख्या लक्षणीय आहे. ‘गरिबांचा रथ’ म्हणून ओळखली जाणारी एसटीची संख्या औंधमार्गे वाढवावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.औंध येथे डोंगराच्या पायथ्याशी विश्रामगृह कॉलेजच्या समोर बसस्थानक बांधण्यात आले आहे. अनेक सोयी सुविधा औंधमध्ये उपलब्ध असताना देखील एसटी महामंडळाचे औंधवर लक्ष का नाही? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.औंध हे ठिकाण पर्यटन व तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. येणाऱ्या भाविकांची संख्या ही प्रचंड आहे. औंध येथून पुणे, मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर, सांगली या ठिकाणी नोकरी, शिक्षण, व्यापारानिमित्त राहणाऱ्या व ये-जा करणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. परंतु औंधला येताना व औंधवरून जाताना एसटीच्या अनियमितपणामुळे मोठा मन:स्ताप प्रवाशांना होत आहे. वडूजच्या नवीन आगारप्रमुखांनी औंधवासीयांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे.औंधसाठी लांब पल्ल्याच्या व कऱ्हाडला जाणाऱ्या एसटी बसेस लवकरच सुरू करण्याच्या विचारात आहोत. लवकरच औंधच्या बाबतीत चित्र बदललेले दिसेल. - प्रताप पाटील, आगारप्रमुख वडूज औंधला ये-जा करण्यासाठी एसटी नाहीतच, असे समीकरणच भाविक व पर्यटकांच्या मनात तयार झाले आहे. हे समीकरण एसटी विभागाने बदलावे. - हणमंतराव शिंदे, विश्वस्त, औंध शिक्षण मंडळ उन्हाळ्यात जर औंधला येणाऱ्या एसटीच्या फेऱ्या वाढविल्या नाहीत तर तीव्र आंदोलन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल.- राजेंद्र माने, माजी उपसरपंच, औंध एसटीमधून येणाऱ्या भाविक, पर्यटकांची संख्या एसटी नसल्यामुळे खूप कमी झाल्याने व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. - धनाजी आमले, आजी-माजी सैनिक संघटना