शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

दुष्काळग्रस्तांच्या अश्रंमध्ये रंग भिजविणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 00:21 IST

आज रंगपंचमी : सोडलेल्या संकल्पाला अन् घेतलेल्या शपथेला जागणार जिल्ह्यातील नागरिक

सातारा : आज रंगपंचमी. हा सण आयुष्य रंगतदार कसं करायचं शिकवितो. पण दुष्काळाचा दाह वाढतोय. पाणीटंचाईचं मोठं संकट उभं ठाकलंय सर्वांसमोरच. माणसांसह जनावरं घोटभर पाण्यासाठी तहानलीत. एकीकडं असं विदारक ‘जीवन’ असताना दुष्काळग्रस्तांच्या अश्रंूमध्ये रंग भिजविणार नाही, असा निर्धार जणू गावोगावच्या तरुणाईनं, विद्यार्थ्यांनी केलाय. म्हणूनच कोरडे रंग लावून रंगपंचमीचा आनंद लुटायला तरुणाई सज्ज झालीय. पाण्याची नासाडी न करता रंग खेळून आनंद लुटण्यातच या सणाचं खरं साजरेपण आहे. यातूनच वाचलेल्या थेंबा थेंबानं कोरडे घसे ओलावतील अन् खऱ्या अर्थानं हा सण सर्वांसाठीच रंगतदार ठरणार आहे. गेल्या चार दिवसांपासून ‘लोकमत इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून सुरू केलेल्या ‘रंग उधळू या... पाणी सांभाळू या’ या उपक्रमाला जिल्हाभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. गावोगावच्या ग्रामसभांमधून, शाळांमधून पाणीबचतीचा संकल्प सोडला गेला. एवढेच काय पण विविध संस्था, तरुण मंडळांच्या तरुण कार्यकर्त्यांनीही कोरडी रंगपंचमी खेळून पाणी वाचविण्याची शपथ घेतली. वाया जाणाऱ्या पाण्याच्या एका थेंबाचंही महत्त्व आता सर्वांना उमजलंय. आता वेळ आहे ती हे सर्व कृतीतून दाखविण्याची. रंगपंचमी म्हटलं की रंगांची उधळण अन् पाण्याची बरसात; पण पाण्याशिवायही रंगपंचमीचा आनंद लुटता येऊ शकतो, हे दाखविण्यासाठी आता जिल्ह्यातली गावंच्या गावं सज्ज झालीत. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘ड्राय रंगपंचमी’ची गरज आणि महत्त्व ‘लोकमत’नं पोहोचवलंय. वाचविलेल्या पाण्यानं एखाद्या मुक्या जीवाची तहान भागविता आली तरी रंगपंचमीचा हा सण खऱ्या अर्थानं सार्थकी लागणार आहे. (प्रतिनिधी) संवेदनशीलता जागृत करणारा सण मानवी जीवनांत जर प्रेम नसेल, आस्था, जिव्हाळा नसेल तर जगणंही रंगतदार होत नाही अन् पाणी नसेल तर जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. उद्याचा रंगपंचमीचा सण आपल्याला बरचं काही सांगून अन् शिकवून जाणारा ठरणार आहे. विशेष म्हणजे तहानलेनं व्याकुळ झालेल्या जिवाची तहान भागविण्याची जाणीव करून देणारा आहे. पाणी म्हणजे जीवन, ते उधळून न देता त्याचा सदुपयोग झाला तर यंदाची रंगपंचमी सर्वांसाठीच संस्मरणीय ठरेल.