शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

दुष्काळग्रस्तांच्या अश्रंमध्ये रंग भिजविणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 00:21 IST

आज रंगपंचमी : सोडलेल्या संकल्पाला अन् घेतलेल्या शपथेला जागणार जिल्ह्यातील नागरिक

सातारा : आज रंगपंचमी. हा सण आयुष्य रंगतदार कसं करायचं शिकवितो. पण दुष्काळाचा दाह वाढतोय. पाणीटंचाईचं मोठं संकट उभं ठाकलंय सर्वांसमोरच. माणसांसह जनावरं घोटभर पाण्यासाठी तहानलीत. एकीकडं असं विदारक ‘जीवन’ असताना दुष्काळग्रस्तांच्या अश्रंूमध्ये रंग भिजविणार नाही, असा निर्धार जणू गावोगावच्या तरुणाईनं, विद्यार्थ्यांनी केलाय. म्हणूनच कोरडे रंग लावून रंगपंचमीचा आनंद लुटायला तरुणाई सज्ज झालीय. पाण्याची नासाडी न करता रंग खेळून आनंद लुटण्यातच या सणाचं खरं साजरेपण आहे. यातूनच वाचलेल्या थेंबा थेंबानं कोरडे घसे ओलावतील अन् खऱ्या अर्थानं हा सण सर्वांसाठीच रंगतदार ठरणार आहे. गेल्या चार दिवसांपासून ‘लोकमत इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून सुरू केलेल्या ‘रंग उधळू या... पाणी सांभाळू या’ या उपक्रमाला जिल्हाभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला. गावोगावच्या ग्रामसभांमधून, शाळांमधून पाणीबचतीचा संकल्प सोडला गेला. एवढेच काय पण विविध संस्था, तरुण मंडळांच्या तरुण कार्यकर्त्यांनीही कोरडी रंगपंचमी खेळून पाणी वाचविण्याची शपथ घेतली. वाया जाणाऱ्या पाण्याच्या एका थेंबाचंही महत्त्व आता सर्वांना उमजलंय. आता वेळ आहे ती हे सर्व कृतीतून दाखविण्याची. रंगपंचमी म्हटलं की रंगांची उधळण अन् पाण्याची बरसात; पण पाण्याशिवायही रंगपंचमीचा आनंद लुटता येऊ शकतो, हे दाखविण्यासाठी आता जिल्ह्यातली गावंच्या गावं सज्ज झालीत. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘ड्राय रंगपंचमी’ची गरज आणि महत्त्व ‘लोकमत’नं पोहोचवलंय. वाचविलेल्या पाण्यानं एखाद्या मुक्या जीवाची तहान भागविता आली तरी रंगपंचमीचा हा सण खऱ्या अर्थानं सार्थकी लागणार आहे. (प्रतिनिधी) संवेदनशीलता जागृत करणारा सण मानवी जीवनांत जर प्रेम नसेल, आस्था, जिव्हाळा नसेल तर जगणंही रंगतदार होत नाही अन् पाणी नसेल तर जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. उद्याचा रंगपंचमीचा सण आपल्याला बरचं काही सांगून अन् शिकवून जाणारा ठरणार आहे. विशेष म्हणजे तहानलेनं व्याकुळ झालेल्या जिवाची तहान भागविण्याची जाणीव करून देणारा आहे. पाणी म्हणजे जीवन, ते उधळून न देता त्याचा सदुपयोग झाला तर यंदाची रंगपंचमी सर्वांसाठीच संस्मरणीय ठरेल.