शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

ग्रामपंचायतीचा कारभारी बदलणार का?

By admin | Updated: April 1, 2015 00:11 IST

तरडगाव ग्रामस्थांमध्ये चर्चा : वर्षानंतरही पदाधिकारी निवडीच्या हालचाली नाहीत

सचिन गायकवाड - तरडगाव , ता. फलटण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वर्षाच्या कारभारानंतर ‘लोकमत’ने काही सदस्यांशी संवाद साधला असता वरिष्ठ नेत्यांकडून प्रत्येक सदस्याला पाच वर्षांच्या काळात सरपंच, उपसरपंच पदाची संधी विभागून दिली जाईल, असे आश्वासन दिले गेल्याची माहिती समोर आली. सत्ताधाऱ्यांची सदस्य संख्या दहा आहे. मात्र, वर्ष झाले तरी अजून नवीन पदाधिकारी निवडीसाठी हालचाली होताना दिसत नाहीत. यामुळे कारभारी बदलून इतरांना संधी दिली जाणार की नाही? याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.डिसेंबर २०१३ मध्ये राजे गटाच्या आमदार दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ पॅनेलने १५ पैकी १० जागा जिंकून विरोधी तरडगाव विकास आघाडीचा पराभव केला होता. त्यानंतर मार्च २०१४ मध्ये सरपंच, उपसरपंच पदांच्या निवडी झाल्या. वर्षाच्या कारभारानंतर काही सदस्यांशी संवाद साधला तेव्हा, त्यांच्याकडून वेगळीच माहिती समोर आली. त्यांच्या सांगण्यावरून गेल्यावर्षी फलटण येथील बैठकीत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सर्व सदस्यांना पुढील पाच वर्षांत गावचा करभार पाहण्याची म्हणजेच सरपंच, उपसरपंच पदाची संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते.सध्या ग्रामपंचायतीत सत्ताधारी सदस्य संख्या दहा आहे. यावरून प्रत्येकाला संधी द्यावयाची झाल्यास प्रत्येक वर्षी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करावी लागणार हे सरळ गणित आहे. परंतु, वर्ष झाले तरी पदाधिकारी निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या नसल्याचे नाराज सदस्यांच्या बोलण्यावरून दिसून येते.सन २००८-०९ मध्ये चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतून विरोधी तरडगाव विकास आघाडीने १५ पैकी ८ जागा जिंकून भैरवनाथ पॅनेलचा पराभव केला होता. वसंतराव गायकवाड यांची २५ वर्षांची एकहाती सत्ता संपुष्टात आली होती. त्यानंतर विकास आघाडीच्या नेत्यांनी सत्तेचे केंद्रीकरण होऊ नये, सर्व सामान्यांना सत्तेत समान संधी मिळावी, पदे कोणा एकाच्या घरात वाटली जावू नयेत, कोणाचीही मालकी असू नये या उद्देशाने पाच वर्षांत सर्व सदस्यांना सरपंच, उपसरपंच ही पदे विभागून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. पुढे तो प्रत्यक्षात अंमलात आणण्यात आला.विकास आघाडीने पाच वर्षांत सर्व सदस्यांना जशी कारभाराची संधी दिली. तसे चित्र सध्या सत्ताधारी असलेल्या भैरवनाथ पॅनेलकडून आपल्या सर्व सदस्यांना पदांची संधी देऊन पुढील काळात दिसणार का? याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. एकीकडे सत्ताधारी सदस्यांमध्ये आपल्याला देखील पद मिळावे, अशी कुजबूज सुरू आहे. बोलायचे आहे; पण बोलू कसे अशी दुविधा असल्यामुळे सगळ्यांनीच हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी भूमिका स्विकारली आहे. मनातील भावना कोणत्या पध्दतीने व्यक्त कराव्यात हे समजत नसल्यामुळे अनेकांची पाचावर धारण बसली आहे. सर्व समावेशक भूमिका गरजेचीपदाच्या व गटाच्या पुढील राजकीय उज्ज्वल भवितव्यासाठी दिलेल्या आश्वासनावरून पाच वर्षांत सर्वांना पदांची संधी देता यावी, यासाठी स्थानिक व तालुका पातळीवरील वरिष्ठ नेत्यांनी याबाबत ठोस सर्वसमावेशक भूमिका घेणे आवश्यक आहे. अशी अपेक्षा काही सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.