शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

शैक्षणिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार : तावडे

By admin | Updated: January 9, 2015 00:04 IST

विद्यार्थ्यांकडून शालेय शुल्काच्या नावाखाली भरमसाठ पैसे घेऊनदेखील त्यांना योग्य त्या सुविधा दिल्या जात नाहीत

सातारा : सातारा जिल्ह्यातील क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या विविध प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे शिक्षण तथा क्रीडा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. नागपूर येथे त्यांच्या ‘रविभवन’ या निवासस्थानी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रश्नांची युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील काळेकर, भाजपा, अजय परदेशी, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पटेल यांनी माहिती दिली. जिल्ह्यातील विविध विद्यालये व महाविद्यालये आजही समस्यांच्या गर्तेत असून, अनेक शिक्षण संस्था या आजही नियमांची पायमल्ली करत आहेत. विद्यार्थ्यांकडून शालेय शुल्काच्या नावाखाली भरमसाठ पैसे घेऊनदेखील त्यांना योग्य त्या सुविधा दिल्या जात नाहीत. त्याचबरोबर शासकीय अनुदानात असलेल्या योजनांमध्ये देखील पारदर्शकता नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यापुरते मर्यादित असलेले राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याच दबावाखाली जिल्हा प्रशासन काम करत असल्याचे दृश्य दिसत आहेत. राज्यांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या विचारांचे सरकार आले आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाला आज देखील त्याची जाणीव झाली नसल्याने जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत ढिसाळ कारभार दिसून येत आहे. मग तो शालेय पोषण आहाराचा असेल, अथवा पालकांना विश्वासात न घेता अवास्तव फी वाढीचा प्रश्न असेल, फी भरण्यास उशीर झाला तर आकारण्यात आलेला दंड असेल व याच कारणासाठी विद्यार्थ्यांना भर उन्हात दिवसभर उभे करण्याचा प्रश्न असेल अशा विविध जिल्ह्यांतील प्रश्नांबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली.या संदर्भात शिक्षण मंत्री यांनी जिल्ह्यातील सर्व प्रश्नांबाबत गांभीर्याने विचार करून विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली. यावेळी युवा मोर्चा सातारा जिल्हा व सातारा शहर युवक मंडळाच्या वतीने सरस्वतीचे प्रतिमा भेट देऊन शिक्षण मंत्री तावडे यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)