शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

भुर्इंजकरांना जमलं मग आपल्याला का नाही?

By admin | Updated: May 27, 2015 00:58 IST

चला बंद करूया कर्णकर्कश आवाज : मृत्यू आणि भांडण-तंट्याचे कारण बनलेल्या डॉल्बीचा तोरा उतरायला हवा--आव्वाज गावाचा... ..नाय डॉल्बीचा !

सातारा : उत्सवाकडे आजकाल केवळ चैन, मौज-मजा म्हणून बघितलं जातं. बेधुंद होऊन स्वत:ला उधळून दिलं जातं. उत्सवामुळं विवेक, संयम वाढीस लागायला हवा; मात्र तो कमी होताना दिसत आहे. डॉल्बीच्या तालावर संघटितपणे अभिव्यक्ती करण्यातून वादाला तोंड फुटते आणि त्यातूनच हाणामारीचे प्रकार उद्भवतात. सोमवार, दि. ८ सप्टेंबर २०१४ रोजी राजपथावर गणेशविसर्जनाची मिरवणूक सुरू असताना डॉल्बीच्या दणक्यानं एका दुमजली इमारती भिंत अंगावर कोसळून तिघांचा मूत्यू झाला होता. ही दुर्घटना कोणीही विसरू शकणार नाही. शुभकार्यात डॉल्बी वाजविणं योग्य की अयोग्य यापेक्षाही त्याचे दुष्परिणाम किती दूरगामी ठरू शकतात, याची अनेक उदाहरणे घडली आहेत. आणि म्हणूनच भुर्इंजकरांनी डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाला कंटाळून गावात डॉल्बीबंदीचा निर्णय घेतला. मृत्यू अन् भांडणतंट्यांचे कारण बनलेली ‘आवाजाची भिंत’ पाडणं भुर्इंजकरांना जमलं मग आपल्याला का नाही? भुर्इंजमध्ये तीन मंगल कार्यालये आहेत. लग्नसराईत दररोज याठिकाणी विवाहसोहळे पार पडत असतात. भुर्इंज येथील नाक्यापासून ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत काढण्यात येणाऱ्या नवरदेवाच्या मिरवणुकीत वाजणाऱ्या डॉल्बीमुळे या मार्गावरील व्यावसायिक तसेच ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत होते. विशेषत: लहान मुले, वृद्ध व रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाने त्रस्त झालेल्या भुर्इंज ग्रामस्थांनी अखेर ग्रामसभा घेऊन गावात डॉल्बीला बंदीचा निर्णय घेऊन डॉल्बीपेक्षा गावाच्या एकीचा आवाजच जास्त असल्याचे दाखवून दिले. पोलीस प्रशासनानेही सहकार्याचे बळ दिलेच; परंतु मंगल कार्यालय व घोड्यांचे मालक यांनीही गावाच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. जे भुर्इंजकरांना जमलं ते मनात आणलं तर आपल्यालाही जमू शकतं. आनंददायी उत्सावासाठी एवढं तरी आपण करूच शकतो. (लोकमत टीम)गावकऱ्यांनो... तुम्हीच घ्या पुढाकार!भर रस्त्यावर सुरू होतो दणदणाट; तेव्हा कान होतात बधिर. मेंदू होतो सुन्न अन् छातीत वाढते धडधड. तरीही ‘डॉल्बी’ वाजविण्याची अघोरी प्रथा थांबविण्यास आपण नाही तयार. कारण का?... तर म्हणे याच्या विरोधात पुढाकार घेणार कोण?... तर सूज्ञ नागरिकहो... आता तुम्हीच व्हा पुढं अन् पेटवा नव्या चळवळीची मशाल. अर्थात ‘आव्वाज गावकऱ्यांचा... नाय डॉल्बीचा’. भुर्इंजकरांनी जशी ‘डॉल्बी’ला गावात बंदी घातली, तसा निर्णय घेऊन शकता तुम्हीही तुमच्या गावात. मग विचार कसला करताय? उचला मोबाईल. लावा ‘लोकमत’ला अन् कळवा ‘आमचंबी गाव पुढारलेलं हाय बगा!’दुर्घटनेतून बोध घेणार कधी? गेल्या वर्षी सातारा शहरात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना डॉल्बीच्या दणक्याने इमारतीची भिंत अंगावर कोसळून तिघांचा मृत्यू झाला. यानंतर सर्वच स्तरातून डॉल्बी वाजविण्याला तीव्र विरोध झाला. काही गावांमध्ये डॉल्बीबंदीचा निर्णयही झाला; पण दुर्घटना घडल्यानंतर. उत्सव, शुभकार्य वेदनादायी नव्हे तर आनंददायी होण्यासाठी ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’, या म्हणीप्रमाणे आताच विचार करणे गरजेचे बनले आहे. जिवाची चैन की जिवाशी खेळ?डॉल्बी वाजविल्यामुळे उत्सव धूमधडाक्यात होतो. मनसोक्त नाचता येतं. आनंद साजरा करता येतो, हा समज युवकांमध्ये रूजू लागला आहे. मात्र, अशा प्रकारे जिवाची चैन करताना आपण लहान मुलं, वृद्ध, रुग्ण यांच्या तसेच उद्भवणाऱ्या भांडणातून आपल्याच मित्रांच्या जिवाशी तर खेळत नाही ना, हा विचार डॉल्बीच्या तालावर नाचणाऱ्यांच्या गावी नसतो.