शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
3
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
4
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
6
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
7
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
8
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
9
ओवेसींच्या पाठिंब्यामुळे प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत मारली बाजी, कोण आहेत काँग्रेसचे आमदार नवीन यादव?
10
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
11
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
13
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
14
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
15
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
16
Yuvraj Singh Father Yograj Singh : "मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
17
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
18
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
19
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
20
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
Daily Top 2Weekly Top 5

पेट का सवाल करतोय गल्लीबोळात बवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:25 IST

सातारा : कडक लॉकडाऊन शिथील केल्यानंतर सातारा मोठ्या प्रमाणावर अनलॉक झाला आहे. पापी पेट का सवाल म्हणत गल्लीबोळात हातगाड्यांवर ...

सातारा : कडक लॉकडाऊन शिथील केल्यानंतर सातारा मोठ्या प्रमाणावर अनलॉक झाला आहे. पापी पेट का सवाल म्हणत गल्लीबोळात हातगाड्यांवर दुकाने थाटून पुन्हा एकदा गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मास्कशिवाय खरेदी करणारे ग्राहक, सोशल डिस्टन्सिंग न पाळता दुकानात गर्दी करणारे, असे चित्र दिसू लागल्याने संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील अन्य महानगरांच्या तुलनेत साताऱ्याचा आकडा कायम वरचा राहिला आहे. लोकसंख्येच्या घनतेचा विचार केला तर साताऱ्यात विरळ वसाहत आहे. अनेक मोकळ्या जागा, प्रशस्त घर, बाहेर वावरायला सार्वजनिक ठिकाणं असल्याने साताऱ्यात याचा प्रसार इतक्या वेगाने होणे अपेक्षितच नव्हते. पण आपल्याला काही होणार नाही, ही भावना आणि आजार अंगावर काढण्याच्या वृत्तीमुळे हे आकडे शंभर, दोनशे करत अगदी अडीच हजारांवरही पोहोचले.

जिल्ह्यात कोविडची व्याप्ती वाढू नये म्हणून प्रशासनाने कडक लॉकडाऊनचे आदेश काढले. दुकाने पुढून बंद मागून सुरू, असे चित्र अवघ्या बाजारपेठेत पाहायला मिळाले. याची माहिती मिळूनही प्रशासनाने याकडे कानाडोळा केला. सताड उघडं ठेवलं तर सोशल डिस्टन्सिंग होत नाही आणि चोरून द्यायचं म्हटलं की गर्दी होऊ देत नाहीत, हे प्रशासनाने बरोबर हेरले होते. कडक लॉकडाऊनमध्ये अनेकांचे साजरीकरण आणि खाण्याचे मूड समाजमाध्यमांवरही झळकले. या दिवसांत मिळणारे साहित्य चढ्या दराने घेणाऱ्यांची संख्या वाढली पण सुरक्षित अंतर ठेवून खरेदी केल्याने संसर्ग टाळला गेला.

चौकट :

१.

गेला की कोरोना आता कशाला मास्क!

सातारा जिल्ह्याचा कोविडचा आकडा वाढता असल्याने प्रशासनाच्यावतीने गेले पंधरा दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यात शिथिलता आणल्यानंतर कोविड संपलाय, असा समज करून अनेकजण विनामास्क घराबाहेर पडत आहेत. पोलीस दिसले की हनुवटीचा मास्क वर ओढणाऱ्या या दिग्गजांना ‘अनलॉक केलं म्हणजे कोरोना गेला’ असंच वाटू लागलं आहे.

२.

पंधरा दिवस राहिलो की डांबून घरातच!

सुसाट गाड्या आणि विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या तरूणांवर लगाम ठेवणं आवश्यक बनलं आहे. कोविडचे सायलंट कॅरिअर म्हणून फिरणारी ही तरूणाई अनेकांसाठी धोकादायक ठरू शकते. उगीचच बाहेर का पडताय, या प्रश्नावर ही तरूणाई ‘पंधरा दिवस काढले की घरातच डांबून’ हे ठरलेलं उत्तर देत आहे.

३.

मंडई बंद मग मुख्य रस्त्यात पथारी!

प्रशासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली असली, तरीही भाजी मंडई सुरू करण्यास अद्यापही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे अनेकांनी भाजी आणून ती गल्लीतील मुख्य रस्त्यावर विकायला सुरू केली आहे. रिक्षाचालक, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांसह हंगामी काम करणाऱ्या अनेकांनी भाजी विकण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

कोट :

सलग दीड वर्ष कोविडची परिस्थिती असल्याने अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बदलले आहेत. यात प्रामुख्याने अत्यावश्यक सेवेत येणारे उद्योग निवडले आहेत. कुटुंबाच्या खर्चासाठी व्यवसाय सुरू करणाऱ्यांनी यातून कुटुंबाला कोविड होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

- कन्हैय्यालाल राजपुरोहित, सातारा

\\\\\\