शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

पेट का सवाल करतोय गल्लीबोळात बवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:25 IST

सातारा : कडक लॉकडाऊन शिथील केल्यानंतर सातारा मोठ्या प्रमाणावर अनलॉक झाला आहे. पापी पेट का सवाल म्हणत गल्लीबोळात हातगाड्यांवर ...

सातारा : कडक लॉकडाऊन शिथील केल्यानंतर सातारा मोठ्या प्रमाणावर अनलॉक झाला आहे. पापी पेट का सवाल म्हणत गल्लीबोळात हातगाड्यांवर दुकाने थाटून पुन्हा एकदा गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मास्कशिवाय खरेदी करणारे ग्राहक, सोशल डिस्टन्सिंग न पाळता दुकानात गर्दी करणारे, असे चित्र दिसू लागल्याने संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेत राज्यातील अन्य महानगरांच्या तुलनेत साताऱ्याचा आकडा कायम वरचा राहिला आहे. लोकसंख्येच्या घनतेचा विचार केला तर साताऱ्यात विरळ वसाहत आहे. अनेक मोकळ्या जागा, प्रशस्त घर, बाहेर वावरायला सार्वजनिक ठिकाणं असल्याने साताऱ्यात याचा प्रसार इतक्या वेगाने होणे अपेक्षितच नव्हते. पण आपल्याला काही होणार नाही, ही भावना आणि आजार अंगावर काढण्याच्या वृत्तीमुळे हे आकडे शंभर, दोनशे करत अगदी अडीच हजारांवरही पोहोचले.

जिल्ह्यात कोविडची व्याप्ती वाढू नये म्हणून प्रशासनाने कडक लॉकडाऊनचे आदेश काढले. दुकाने पुढून बंद मागून सुरू, असे चित्र अवघ्या बाजारपेठेत पाहायला मिळाले. याची माहिती मिळूनही प्रशासनाने याकडे कानाडोळा केला. सताड उघडं ठेवलं तर सोशल डिस्टन्सिंग होत नाही आणि चोरून द्यायचं म्हटलं की गर्दी होऊ देत नाहीत, हे प्रशासनाने बरोबर हेरले होते. कडक लॉकडाऊनमध्ये अनेकांचे साजरीकरण आणि खाण्याचे मूड समाजमाध्यमांवरही झळकले. या दिवसांत मिळणारे साहित्य चढ्या दराने घेणाऱ्यांची संख्या वाढली पण सुरक्षित अंतर ठेवून खरेदी केल्याने संसर्ग टाळला गेला.

चौकट :

१.

गेला की कोरोना आता कशाला मास्क!

सातारा जिल्ह्याचा कोविडचा आकडा वाढता असल्याने प्रशासनाच्यावतीने गेले पंधरा दिवस कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यात शिथिलता आणल्यानंतर कोविड संपलाय, असा समज करून अनेकजण विनामास्क घराबाहेर पडत आहेत. पोलीस दिसले की हनुवटीचा मास्क वर ओढणाऱ्या या दिग्गजांना ‘अनलॉक केलं म्हणजे कोरोना गेला’ असंच वाटू लागलं आहे.

२.

पंधरा दिवस राहिलो की डांबून घरातच!

सुसाट गाड्या आणि विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या तरूणांवर लगाम ठेवणं आवश्यक बनलं आहे. कोविडचे सायलंट कॅरिअर म्हणून फिरणारी ही तरूणाई अनेकांसाठी धोकादायक ठरू शकते. उगीचच बाहेर का पडताय, या प्रश्नावर ही तरूणाई ‘पंधरा दिवस काढले की घरातच डांबून’ हे ठरलेलं उत्तर देत आहे.

३.

मंडई बंद मग मुख्य रस्त्यात पथारी!

प्रशासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली असली, तरीही भाजी मंडई सुरू करण्यास अद्यापही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे अनेकांनी भाजी आणून ती गल्लीतील मुख्य रस्त्यावर विकायला सुरू केली आहे. रिक्षाचालक, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांसह हंगामी काम करणाऱ्या अनेकांनी भाजी विकण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

कोट :

सलग दीड वर्ष कोविडची परिस्थिती असल्याने अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बदलले आहेत. यात प्रामुख्याने अत्यावश्यक सेवेत येणारे उद्योग निवडले आहेत. कुटुंबाच्या खर्चासाठी व्यवसाय सुरू करणाऱ्यांनी यातून कुटुंबाला कोविड होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

- कन्हैय्यालाल राजपुरोहित, सातारा

\\\\\\