शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

जिसकी ताकद बडी.. उसका ‘तिकीट’ फिक्स!

By admin | Updated: January 24, 2017 23:34 IST

चुरस वाढली : निवडून येण्याच्या निकषाबाबत सर्वच पक्षनेते ठाम

 

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या आगामी निवडणुकीचा जोरदार धुरळा उडाला आहे. राष्ट्रवादी, काँगे्रस, भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षांकडे निवडणूक इच्छिणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी असली तरी चुरस वाढली असताना निवडून येण्याचा निकष लक्षात घेऊनच उमेदवारी देण्याचा अजेंडा सर्वच पक्षांतील नेतेमंडळींनी राबविला आहे. त्यामुळे ‘जिसकी ताकद बडी...उसका तिकीट फिक्स!,’ असेच धोरण सर्वच पक्षांत पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाभर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितींमध्ये वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाने सर्वप्रथम आघाडी घेत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या पक्षाकडून लढण्यासाठी ७५० उमेदवार इच्छुक आहेत. सुरुवातीला हा आकडा मोठा वाटत होता. त्यामुळे बंडखोरीचे दुखणे राष्ट्रवादीलाच जास्त झळ पोहोचवेल, असे चित्र होते. पण उमेदवारी मागणाऱ्यांची हीच गर्दी भाजप व शिवसेनेतही आहे. शिवसेनेने काही दिवसांपूर्वी ७१५ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. भाजपनेही तालुका पातळीवर मुलाखती घेतल्या होत्या. भाजप येत्या २५ जानेवारी रोजी अंतिम यादी जाहीर करणार आहे. साहजिकच, उमेदवारी मागणाऱ्यांची मोठी गर्दी सर्वच पक्षांकडे पाहायला मिळते. या उमेदवाऱ्या देताना स्थानिक राजकारणाचा विचार केला जातो. गावपातळीवर आर्थिक, सामाजिक व राजकीय या सर्व बाबींनी जो सक्षम असतो, त्यालाच उमेदवारी दिली जाते. मागील निवडणुकांचा इतिहास पाहता राष्ट्रवादी विरोधात काँगे्रस असे दुतर्फी युद्ध होत होते. भाजप, शिवसेना एखाद्या दुसऱ्या जागी यशस्वी झाली होती. मात्र, यंदाची निवडणूक वेगळी आहे. राज्यातील आघाडी सरकार गेल्याने राष्ट्रवादी व काँगे्रस यांच्या व्यतिरिक्त भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे पक्षही आक्रमक झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता आणणे, बंधनकारक असल्याने केंद्र व राज्यात सत्तेवर असणाऱ्या सत्ताधारी महायुतीनेही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या निवडणुकीत ठकास-महाठक उमेदवार देण्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांची केली असल्याचे चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)