शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

जिसकी ताकद बडी.. उसका ‘तिकीट’ फिक्स!

By admin | Updated: January 24, 2017 23:34 IST

चुरस वाढली : निवडून येण्याच्या निकषाबाबत सर्वच पक्षनेते ठाम

 

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या आगामी निवडणुकीचा जोरदार धुरळा उडाला आहे. राष्ट्रवादी, काँगे्रस, भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षांकडे निवडणूक इच्छिणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी असली तरी चुरस वाढली असताना निवडून येण्याचा निकष लक्षात घेऊनच उमेदवारी देण्याचा अजेंडा सर्वच पक्षांतील नेतेमंडळींनी राबविला आहे. त्यामुळे ‘जिसकी ताकद बडी...उसका तिकीट फिक्स!,’ असेच धोरण सर्वच पक्षांत पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाभर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितींमध्ये वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाने सर्वप्रथम आघाडी घेत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या पक्षाकडून लढण्यासाठी ७५० उमेदवार इच्छुक आहेत. सुरुवातीला हा आकडा मोठा वाटत होता. त्यामुळे बंडखोरीचे दुखणे राष्ट्रवादीलाच जास्त झळ पोहोचवेल, असे चित्र होते. पण उमेदवारी मागणाऱ्यांची हीच गर्दी भाजप व शिवसेनेतही आहे. शिवसेनेने काही दिवसांपूर्वी ७१५ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. भाजपनेही तालुका पातळीवर मुलाखती घेतल्या होत्या. भाजप येत्या २५ जानेवारी रोजी अंतिम यादी जाहीर करणार आहे. साहजिकच, उमेदवारी मागणाऱ्यांची मोठी गर्दी सर्वच पक्षांकडे पाहायला मिळते. या उमेदवाऱ्या देताना स्थानिक राजकारणाचा विचार केला जातो. गावपातळीवर आर्थिक, सामाजिक व राजकीय या सर्व बाबींनी जो सक्षम असतो, त्यालाच उमेदवारी दिली जाते. मागील निवडणुकांचा इतिहास पाहता राष्ट्रवादी विरोधात काँगे्रस असे दुतर्फी युद्ध होत होते. भाजप, शिवसेना एखाद्या दुसऱ्या जागी यशस्वी झाली होती. मात्र, यंदाची निवडणूक वेगळी आहे. राज्यातील आघाडी सरकार गेल्याने राष्ट्रवादी व काँगे्रस यांच्या व्यतिरिक्त भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे पक्षही आक्रमक झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता आणणे, बंधनकारक असल्याने केंद्र व राज्यात सत्तेवर असणाऱ्या सत्ताधारी महायुतीनेही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. या निवडणुकीत ठकास-महाठक उमेदवार देण्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांची केली असल्याचे चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)