शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

मोडले सारे घर... पण मोडला नाही कणा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:35 IST

आभाळ फाटलं अन् होत्याचं नव्हतं झालं. त्या काळरात्री जीवाभावाची माणसं मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. काही पाण्याच्या लोटात वाहून गेली. या ...

आभाळ फाटलं अन् होत्याचं नव्हतं झालं. त्या काळरात्री जीवाभावाची माणसं मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. काही पाण्याच्या लोटात वाहून गेली. या अस्मानी संकटातून जी जगली त्यांना जगण्याचं बळ देण्याचं काम जिल्हा प्रशासनानं तत्काळ हाती घेतलं. जिथे रस्ते वाहून गेले होते, त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात रस्ते तयार करुन मदतकार्य पोहोचविण्याचं काम हाती घेण्यात आलं. पाण्यात बोटी घालून बाधितांपर्यंत मदत पोहोचवली. आता ‘मोडले सारे घर... पण मोडला नाही कणा... पाठीवरती हात ठेवून फक्त लढा म्हणा...’ या कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती बाधितांच्या ओठावर तरळत आहेत!

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अत्यंत वेगाने यंत्रणा हलवल्याने मोठ्या संकटातही लोकांपर्यंत मदत पोहोचवता आली. पाटण तालुक्यातील आंबेघर, ढोकावळे, मिरगाव, वाई तालुक्यातील जोर, जांभळी, देवरुखवाडी (कोंढवली) याठिकाणी झालेल्या भूस्खलनात स्थानिक लोक, त्यांची जनावरे डोंगरउतारावरुन पाण्याबरोबर वाहून आलेल्या चिखलराडीत जमिनीखाली दबली गेली. अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे महाबळेश्वर तालुक्यातील ११३पैकी ६७ गावांमध्ये आजपर्यंत संपर्क झाला आहे. पण ५६ गावांमध्ये अद्याप जाता येत नाही, तर उरलेल्या दहा गावांमध्ये कोणत्याही मार्गाने पुढील काही दिवस पोहोचता येणार नाही, अशी स्थिती आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वच ठिकाणी यंत्रणा वेगाने राबवली.

कोल्हापुरात महामार्गावर पाणी आले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. तेव्हा आनेवाडी टोलनाक्यावर वाहने अडकून पडली होती. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर वाहनचालक, क्लिनर यांची उपासमार होऊ नये, यासाठी चव्हाण यांनी याठिकाणी जाऊन फूड पॅकेट्स दिली.

संगीता राजापूरकर पाेहोचल्या चतुरबेटमध्ये...

कुंभरोशी ते महाबळेश्वर या मार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने हा मार्ग पुढील महिनाभरात सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. चतुरबेट या दुर्गम गावात गुरुवार, दि. २९ रोजी वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले या गावाबाहेरच्या प्रशासनाच्या त्या दहा-बारा दिवसानंतर पोहोचलेल्या पहिल्या व्यक्ती होत्या. तेथील ग्रामस्थांना भेटून त्यांना आधार दिला. जोर, जांभळी अन् देवरुखवाडीतदेखील राजापूरकर यांनी भरपावसात उभे राहून मदतकार्य पोहोचवले.

जिल्हाधिकारी शेखर सिंह चिखल तुडवत आंबेघरमध्ये

पाटण तालुक्यातील आंबेघर या गावात भूस्खलनामुळे १५ ग्रामस्थांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह हे तत्काळ आंबेघरला गेले. विशेष म्हणजे धावडी गावापासून पुढे जाता येत नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी चिखल तुडवत आंबेघरमध्ये पोहोचले.

तहसीलदार रणजित भोसले यांचा सजग प्रयत्न

जोर खोऱ्यात मोठे नुकसान झाले असून, अजूनही हा भाग संपर्कहीन आहे. या भागात संपर्क पुनर्प्रस्थापित करणे व पुनर्वसनाच्या कामाला प्रशासनाने फार महत्त्व देऊन जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरुच आहे. वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी बोटीतून जाऊन लोकांना मदतकार्य पोहोचवले.

तुमच्या कष्टामुळे... आम्ही प्रकाशाच्या गावात राहतो

सातारा जिल्ह्यात मागच्या दोन-तीन दिवसात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे वीज... अनेक ठिकाणी तारा तुटणे, पोल वाहून जाणे अशा घटना घडल्या आहेत. हे सर्व पूर्ववत करण्यासाठी जिवाची पर्वा न करता विद्युत विभागाचे कर्मचारी काम करत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

फोटो...३१ सागर