शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धरणग्रस्तांच्या समस्या सोडवणार कोण... उमरकांचनच्या धरणग्रस्तांची वीस वर्षांपासून परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:36 IST

ढेबेवाडी : वांग प्रकल्पातील उमरकांचन येथील प्रकल्पग्रस्तांचे माहुली (ता. खानापूर) येथे गावठाण तयार केले व भूखंड वाटप करून ...

ढेबेवाडी : वांग प्रकल्पातील उमरकांचन येथील प्रकल्पग्रस्तांचे माहुली (ता. खानापूर) येथे गावठाण तयार केले व भूखंड वाटप करून पुनर्वसन आणि जमिनींचे वाटप केले. पण त्यापैकी काही नापिक, मुरमाड, खडकाळ व काही कधीही पाणी मिळणार नाही अशा लाभक्षेत्राबाहेरच्या आहेत. यामुळे प्रकल्पग्रस्तांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. दहा वर्षांपासून सुरु असलेली परवड थांबवा आणि परिपूर्ण पुनर्वसन करा, अशी मागणी या धरणग्रस्तांनी केली आहे.

वीस वर्षांपूर्वी माहुली येथे गावठाण तयार करून भूखंड वाटप केले गेले आणि गावठाणाच्या ८ किलोमीटर परिसरात माहुली ६४ हेक्टर, चिखलहोळ ९.३९ हेक्टर, वलखड २.६४ हेक्टर, अशी ७६.०३ हेक्टर जमीन वाटपासाठी उपलब्ध केली. यापैकी ५.७. ५४ हेक्टर जमीन प्रकल्पग्रस्तांना २००८ साली वाटप केली.

या वाटप जमिनीपैकी काही मुरमाड, खडकाळ व लागवडीयोग्य नाहीत, हे कारण देत तत्कालिन युती शासनाने जमिनीच्या बदली रोख पैसे देण्याचे धोरण घेतल्यानंतर ७४ पैकी ३९ जणांनी वाटप केलेल्या जमिनी नापिक, खडकाळ, व लाभक्षेत्राबाहेर असल्याने पाणी मिळणारच नाही म्हणून ते वाटप रद्द करून घेतले आणि जमिनीऐवजी रोख रक्कम स्वीकारली, यात ते धरणग्रस्त भूमिहीन झाले आहेत, ही बाब गंभीर आहे.

उरलेल्या ३५ जणांपैकी काही अपवादात्मक

धरणग्रस्त वगळता बाकी धरणग्रस्तांच्या जमिनीलासुद्धा पाणी मिळणार नाही, असा अहवाल २०१० साली टेंभू योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून दिला. तेव्हा नियमानुसार जमिनीला पाणी किंवा चारपट जमीन किंवा रोख रक्कम असे पर्याय त्या धरणग्रस्तांनी शासनाला दिले तरीसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे आजही ते धरणग्रस्त मूळ गावातच आहेत. त्यांचे पुढे काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

टेंभू योजनेच्या लाभ क्षेत्रात पाणी मिळत नाही म्हणून हातनूर व हातनोली या तासगाव तालुक्यातील गावांची ३३१ हेक्टर जमीन अद्यापही संपादित झालेली नाही. मात्र, शासनाने पुनर्वसन करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नागरी सुविधांसह गावठाण निर्मिती केली. त्यात जनतेचे करोडो रूपये खर्च केले आणि वाया गेले. या वाया गेलेल्या खर्चाची जबाबदारी कुणाची?

अद्याप नेवरी, कार्वे येथील साधारण ५३ धरणग्रस्तांच्या एकूण २७.२५ हेक्टर जमीन वाटपाचे शासन आदेश होऊनसुद्धा सातबारावर त्यांचे नाव लागलेले नाही. त्यापैकी २१ धरणग्रस्तांना दिलेल्या जमिनी अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या चुकीच्या संपादन नकाशामुळे धरणग्रस्तांच्या नावावर असूनही अद्याप त्यांना ताबा मिळालेला नाही, हा बेजबाबदारपणा कुणाचा? असा प्रश्नही निर्माण होत आहे.

कऱ्हाड, पाटण तालुक्यातील लाभक्षेत्रात ४ एकरावरील जमिनी संपादन केलेल्या आहेत. त्याचे धरणग्रस्तांना वाटप केले आहे. मात्र, मूळ शेतकरी न्यायालयात गेले व न्यायालयाने संपादन चुकीचे ठरवून काही जमिनी वगळल्या आहेत, सातबारा त्या धरणग्रस्तांच्या नावे पण ताबा मूळ शेतकऱ्यांकडे आहे. मात्र, जमीन नावावर दिसते, त्यामुळे त्यांना दुसरीकडे जमीन वाटप होत नाही. त्यामुळे धरणग्रस्त भूमिहीनच आहे त्याचे काय? वरील विषयांच्याबाबत अनेकदा मंत्रीमहोदय व शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. पण पुनर्वसनाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याची अधिकाऱ्यांची मानसिकता झाली की काय, त्यामुळे धरणग्रस्तांच्या समस्या सुटत नाहीत व त्यांना आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरत नाही.

कोट

अनेकदा या समस्येवर चर्चा झाली व पाहणी करून अहवाल देण्याचे आदेश दिलेे आहेेेत. पण बैठकीत जे ठरले ते कधीच वेळेेेत पूर्ण होत नाही, हा अनुभव आहे.

जगन्नाथ विभुते

सदस्य, पुनर्वसन प्राधिकरण, पुणे.