शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रेक द चेन’ पण तोडणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:39 IST

सातारा : राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहीम हाती घेतली. मात्र, सातारा जिल्ह्यात ही साखळी तुटण्याचे ...

सातारा : राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहीम हाती घेतली. मात्र, सातारा जिल्ह्यात ही साखळी तुटण्याचे नाव घेईना. पंधरा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने नवे उच्चांक गाठले. एकीकडे प्रशासन उपाययोजना राबविण्यास कमी पडतेय तर दुसरीकडे नागरिक संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरताहेत, अशी टोलवाटोलवी सुरू असल्याने कोरोनाची साखळी तोडणार तरी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. लॉकडाऊननंतर रुग्णसंख्या आटोक्यात येईल, ही आशाही आता फोल ठरू लागली आहे. कोरोनाचे दररोज दोन ते अडीच हजार नवे रुग्ण व सरासरी चाळीस रुग्णांचा मृत्यू होऊ लागल्याने जिल्ह्याची चिंता वाढू लागली आहे. सद्यस्थितीला सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई या तालुक्यांत कोरोना संक्रमणाचा वेग अधिक आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पडू लागले आहेत.

गतवर्षी स्थानिक प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठी विशेष पथके तयार केली होती. यामध्ये अंगणवाडी सेविका, शिक्षक, पालिका कर्मचारी आदींच्या समावेश होता. ही पथके गृहभेटीद्वारे नागरिकांची आरोग्य तपासणी करत होती. यंदा असे एकही सर्वेक्षण जिल्ह्यात झाले नाही. गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला जात होता. आता हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या गावांनी गावबंदी केली आहे. जिल्हाबंदी असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली परजिल्ह्यातून येणाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. तसेच अशा व्यक्तीची ना कोणती तपासणी केली जाते, ना कोणत्या नोंदी ठेवल्या जातात. स्वच्छता, निर्जंतुकीकरण मोहीम, जनजागृती अशा बाबींचादेखील प्रशासनाला विसर पडल्याचे दिसते.

एकीकडे प्रशासन उपाययोजना राबविण्यास कमी पडत असताना, दुसरीकडे नागरिकही शासन नियमांचे पालन करत नसल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. प्रशासन व नागरिकांची एकमेकांवर टोलवाटोलवी सुरू असल्याने कोरोनाचे संक्रमण कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत ज्या गतीने कोरोनाबाधितांची संख्या वाढली, ती पाहता जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, असे सध्याचे चित्र आहे.

(चौकट)

यामुळे वाढतेय संक्रमण

१. अत्यावश्यक सेवांना वेळेचे बंधन असले तरी अनेक दुकानदार शटर बंद करून दिवसभर सेवा पुरवत आहेत.

२. त्यामुळे बाजारपेठेत नागरिक, वाहनधारकांची दिवसभर रेचलेच सुरू असते. नागरिकांकडून एकाही नियमाचे पालन केले जात नाही.

३. जिल्ह्यात सध्याच्या घडीला तब्बल १८ हजार कोरोना रुग्ण घरातून उपचार घेत आहेत. हे रुग्ण औषधोपचारसह कोणत्या ना कोणत्या कारणाने घराबाहेर पडत आहेत.

४. अशा रुग्णांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने कोरोना संक्रमणाचा धोका अधिक संभवतो.

५. गतवर्षी प्रशासनाकडून घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले होते. या माध्यमातून कोरोना संशयित रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. यंदा असे एकही सर्वेक्षण जिल्ह्यात झालेले नाही.

६. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोहीम प्रभावीपणे राबवली जात नाही.

७. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली परजिल्ह्यातून येणाऱ्यांची संंख्याही अधिक आहे. अशा व्यक्तींच्या नोंदी आता ठेवल्या जात नाहीत.