शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
4
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
5
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
6
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
7
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
8
"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !
9
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
11
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
12
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
13
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
14
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
15
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
16
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
17
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
18
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
19
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
20
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा

कोण करतंय भटकंती तर कोण खेळतंय क्रिकेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:37 IST

सातारा : दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र साताऱ्यात संचारबंदीच्या नियमावलीचे नागरिकांकडून ...

सातारा : दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र साताऱ्यात संचारबंदीच्या नियमावलीचे नागरिकांकडून पालनच केले जात नाही. घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले असताना बहुतांश नागरिक सकाळी व सायंकाळी घराबाहेर भटकंतीसाठी पडत आहेत. रात्री गल्लीबोळात तरुणांकडून क्रिकेटचे सामने केले जात आहेत. फिजिकल डिस्टन्स व मास्क वापरण्याची तसदीही कोणी घेत नसल्याने कोरोना संक्रमण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

सातारा जिल्ह्यासह शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे निर्बंध अधिक कठोर केले आहेत. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच केवळ अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा दिली आहे. मात्र नागरिक खोटी कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे शहरात नागरिक व वाहनधारकांची दररोज गर्दी पहायला मिळत आहे. संचारबंदी केवळ कागदावर उरली असून, नागरिकांकडून एकाही नियमाचे पालन केले जात नाही. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांचे म्हणावेत असे पाठबळ व सहकार्य मिळत नसल्याने कोरोनाची साखळी तुटणार तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्ते बॅरिकेड करून बंदिस्त करण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी प्रमुख चौकांमध्ये पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. असे असतानाही बहुतांश नागरिक सकाळी व सायंकाळी घराबाहेर फेरफटका मारत आहेत. रात्री गल्लीबोळात तरुणांकडून क्रिकेटचे सामने खेळले जात आहेत. अनेक ठिकाणी तरुणांचे टोळके एकत्र येऊन गप्पा मारतानाही दिसत आहे. दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करूनही नागरिक व वाहनधारकांवर कोणताही परिणाम होत नसल्याने आता प्रशासनही हतबल झाले आहे.

(चौकट)

जबाबदारीचे भान ठेवा..

कोरोनामुळे आज कोणाचे मातृछत्र हरपले आहे तर कुणाचे पितृछत्र. अनेकजण आपली जवळची व्यक्ती गमावू लागला आहे. अशी परिस्थिती कधीच कोणावर ओढावू नये असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण सर्वांनी जबाबदारीने वागायला हवे. शासन नियमांचे काटेकोर पालन करून आपण स्वतःला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायला हवे. तरच कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल.