शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोण करतंय भटकंती तर कोण खेळतंय क्रिकेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:37 IST

सातारा : दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र साताऱ्यात संचारबंदीच्या नियमावलीचे नागरिकांकडून ...

सातारा : दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र साताऱ्यात संचारबंदीच्या नियमावलीचे नागरिकांकडून पालनच केले जात नाही. घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले असताना बहुतांश नागरिक सकाळी व सायंकाळी घराबाहेर भटकंतीसाठी पडत आहेत. रात्री गल्लीबोळात तरुणांकडून क्रिकेटचे सामने केले जात आहेत. फिजिकल डिस्टन्स व मास्क वापरण्याची तसदीही कोणी घेत नसल्याने कोरोना संक्रमण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

सातारा जिल्ह्यासह शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे निर्बंध अधिक कठोर केले आहेत. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच केवळ अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा दिली आहे. मात्र नागरिक खोटी कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे शहरात नागरिक व वाहनधारकांची दररोज गर्दी पहायला मिळत आहे. संचारबंदी केवळ कागदावर उरली असून, नागरिकांकडून एकाही नियमाचे पालन केले जात नाही. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांचे म्हणावेत असे पाठबळ व सहकार्य मिळत नसल्याने कोरोनाची साखळी तुटणार तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्ते बॅरिकेड करून बंदिस्त करण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी प्रमुख चौकांमध्ये पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. असे असतानाही बहुतांश नागरिक सकाळी व सायंकाळी घराबाहेर फेरफटका मारत आहेत. रात्री गल्लीबोळात तरुणांकडून क्रिकेटचे सामने खेळले जात आहेत. अनेक ठिकाणी तरुणांचे टोळके एकत्र येऊन गप्पा मारतानाही दिसत आहे. दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करूनही नागरिक व वाहनधारकांवर कोणताही परिणाम होत नसल्याने आता प्रशासनही हतबल झाले आहे.

(चौकट)

जबाबदारीचे भान ठेवा..

कोरोनामुळे आज कोणाचे मातृछत्र हरपले आहे तर कुणाचे पितृछत्र. अनेकजण आपली जवळची व्यक्ती गमावू लागला आहे. अशी परिस्थिती कधीच कोणावर ओढावू नये असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण सर्वांनी जबाबदारीने वागायला हवे. शासन नियमांचे काटेकोर पालन करून आपण स्वतःला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायला हवे. तरच कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल.