शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

कोण करतंय भटकंती तर कोण खेळतंय क्रिकेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:37 IST

सातारा : दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र साताऱ्यात संचारबंदीच्या नियमावलीचे नागरिकांकडून ...

सातारा : दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र साताऱ्यात संचारबंदीच्या नियमावलीचे नागरिकांकडून पालनच केले जात नाही. घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले असताना बहुतांश नागरिक सकाळी व सायंकाळी घराबाहेर भटकंतीसाठी पडत आहेत. रात्री गल्लीबोळात तरुणांकडून क्रिकेटचे सामने केले जात आहेत. फिजिकल डिस्टन्स व मास्क वापरण्याची तसदीही कोणी घेत नसल्याने कोरोना संक्रमण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

सातारा जिल्ह्यासह शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे निर्बंध अधिक कठोर केले आहेत. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच केवळ अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा दिली आहे. मात्र नागरिक खोटी कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे शहरात नागरिक व वाहनधारकांची दररोज गर्दी पहायला मिळत आहे. संचारबंदी केवळ कागदावर उरली असून, नागरिकांकडून एकाही नियमाचे पालन केले जात नाही. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांचे म्हणावेत असे पाठबळ व सहकार्य मिळत नसल्याने कोरोनाची साखळी तुटणार तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्ते बॅरिकेड करून बंदिस्त करण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी प्रमुख चौकांमध्ये पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. असे असतानाही बहुतांश नागरिक सकाळी व सायंकाळी घराबाहेर फेरफटका मारत आहेत. रात्री गल्लीबोळात तरुणांकडून क्रिकेटचे सामने खेळले जात आहेत. अनेक ठिकाणी तरुणांचे टोळके एकत्र येऊन गप्पा मारतानाही दिसत आहे. दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करूनही नागरिक व वाहनधारकांवर कोणताही परिणाम होत नसल्याने आता प्रशासनही हतबल झाले आहे.

(चौकट)

जबाबदारीचे भान ठेवा..

कोरोनामुळे आज कोणाचे मातृछत्र हरपले आहे तर कुणाचे पितृछत्र. अनेकजण आपली जवळची व्यक्ती गमावू लागला आहे. अशी परिस्थिती कधीच कोणावर ओढावू नये असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण सर्वांनी जबाबदारीने वागायला हवे. शासन नियमांचे काटेकोर पालन करून आपण स्वतःला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायला हवे. तरच कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल.