शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

वेगाला ब्रेक लावणार कोण?

By admin | Updated: December 29, 2014 23:54 IST

अजब टोलवाटोलवी : वेगमर्यादेचे फलक बसविण्यावरून पालिका-वाहतूक शाखेत मतभिन्नता

सातारा : सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी बेफाम धावणाऱ्या तरूणांच्या गाड्यांना आता वेगमर्यादेचे बंधन घालणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी पालिका आणि वाहतूक शाखा यांच्यातील टोलवाटोलवी आता अनेकांच्या जिवावर बेतण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सातारा शहरात सकाळी आणि संध्याकाळी प्रमुख रस्त्यांसह शाळा आणि कार्यालय परिसरात वाहनांची वर्दळ असते. शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण केवळ एकेरी वाहतुकीपुरतेच झाले. मात्र, त्यामुळे वाहतुकीत सुरळीतपणा अजूनही दिसत नाही. कित्येकदा संध्याकाळी निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी वेळेआधी अर्धा तास निघावे लागते. महानगरांप्रमाणे साताऱ्यातही वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहतुकीचे नियोजन होणे अत्यावश्यक बनले आहे.अनेक ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाल्याचे कारण पुढे करत वाहनचालक छोट्या बोळातून मार्ग काढत वाहतुकीची कोंडी करताना दिसतात. वाहतूक पोलीसही अनेकदा किरकोळ भाजीविके्रते आणि हातगाडीचालकांवर कायद्याचा बडगा उगारतात; पण सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाहीत.राज्यातील अनेक शहरांमध्ये कायम वर्दळीच्या ठिकाणी वेगमर्यादेचे फलक बसविण्यात आले आहेत. सातारा शहरात मात्र हे काम कोणाचे, या कारणावरून वेगमर्यादेचे फलकच लावले गेले नाहीत. त्यामुळे कारवाई करण्यासाठी पोलिसांना आधारच मिळत नाही, अशी स्थिती आहे. (प्रतिनिधी)संध्याकाळच्या वेळी तरूणाई अत्यंत बेफामपणे वाहने चालवत असते. अशा वेळी ज्येष्ठांसह सर्वांचेच जीव घाबरेघुबरे होतात. तरूणांच्या या वेगाला मर्यादा घालण्यासाठी त्यांना समज देणे आवश्यक आहे. कित्येकदा मुलींच्या मागे जाण्याच्या नादात तरूणांचे अपघात झाले आहेत.- सुभाष जाजू ,ज्येष्ठ नागरिकवाहतूक शाखा अन् पालिकेची टोलवाटोलवीवाहतूक विभाग वाहनांवर कारवाई करून जो दंड वसूल करते त्यातील निम्मी रक्कम पालिकेच्या खात्यावर वर्ग होत असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहनांच्या वेगावरील नियंत्रणाची जबाबदारी पालिकेचीही असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पोलीस म्हणतात, सूचनाफलक लावण्याचे काम पालिकेचे आहे, तर वाहतुकीची कोंडी कुठे आणि कशी होते याची माहिती पोलिसांना असताना आम्ही कसे फलक लावणार, असा बचाव पालिका करते. विशेष म्हणजे वाहतुक शाखा आणि पालिका यांच्यात याविषयी पत्रव्यवहारही झाला आहे. पण त्यावर कार्यवाही कोणतीच झाली नाही.तरूणांवर निर्बंध आवश्यकसध्या अनेक तरूणांच्या हातात अधिक क्षमतेच्या बाईक्स आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकजण वाऱ्याशी स्पर्धा करण्याची ऊर्मी मनात ठेवूनच वाहनावर बसतो. काहीवेळा ‘शायनिंग’साठी तर कधी कोणाला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी स्टंटबाजी चालते. संध्याकाळी सातनंतर वाहतूक पोलीस नसल्यामुळे बेलगाम तरूणाई आपल्याच नादात असते. कित्येकदा कट देण्याच्या नादात या तरूणाईने स्वत:चे आणि इतरांचेही शारीरिक नुकसान केले आहे. या तरूणाईवर निर्बंध ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनीही साध्या वेशात गस्त घालून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. वर्दळीची ठिकाणेराजवाडा, मोती चौक, प्रतापगंज पेठ चौक, शनिवार चौक, पोलीस मुख्यालय, पोवई नाका, जुना दवाखाना, शाळा आणि महाविद्यालय परिसर, एकेरी वाहतुकीची ठिकाणे, रूग्णालय परिसर.