शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वेगाला ब्रेक लावणार कोण?

By admin | Updated: December 29, 2014 23:54 IST

अजब टोलवाटोलवी : वेगमर्यादेचे फलक बसविण्यावरून पालिका-वाहतूक शाखेत मतभिन्नता

सातारा : सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी बेफाम धावणाऱ्या तरूणांच्या गाड्यांना आता वेगमर्यादेचे बंधन घालणे आवश्यक बनले आहे. त्यासाठी पालिका आणि वाहतूक शाखा यांच्यातील टोलवाटोलवी आता अनेकांच्या जिवावर बेतण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सातारा शहरात सकाळी आणि संध्याकाळी प्रमुख रस्त्यांसह शाळा आणि कार्यालय परिसरात वाहनांची वर्दळ असते. शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण केवळ एकेरी वाहतुकीपुरतेच झाले. मात्र, त्यामुळे वाहतुकीत सुरळीतपणा अजूनही दिसत नाही. कित्येकदा संध्याकाळी निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी वेळेआधी अर्धा तास निघावे लागते. महानगरांप्रमाणे साताऱ्यातही वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहतुकीचे नियोजन होणे अत्यावश्यक बनले आहे.अनेक ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाल्याचे कारण पुढे करत वाहनचालक छोट्या बोळातून मार्ग काढत वाहतुकीची कोंडी करताना दिसतात. वाहतूक पोलीसही अनेकदा किरकोळ भाजीविके्रते आणि हातगाडीचालकांवर कायद्याचा बडगा उगारतात; पण सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाहीत.राज्यातील अनेक शहरांमध्ये कायम वर्दळीच्या ठिकाणी वेगमर्यादेचे फलक बसविण्यात आले आहेत. सातारा शहरात मात्र हे काम कोणाचे, या कारणावरून वेगमर्यादेचे फलकच लावले गेले नाहीत. त्यामुळे कारवाई करण्यासाठी पोलिसांना आधारच मिळत नाही, अशी स्थिती आहे. (प्रतिनिधी)संध्याकाळच्या वेळी तरूणाई अत्यंत बेफामपणे वाहने चालवत असते. अशा वेळी ज्येष्ठांसह सर्वांचेच जीव घाबरेघुबरे होतात. तरूणांच्या या वेगाला मर्यादा घालण्यासाठी त्यांना समज देणे आवश्यक आहे. कित्येकदा मुलींच्या मागे जाण्याच्या नादात तरूणांचे अपघात झाले आहेत.- सुभाष जाजू ,ज्येष्ठ नागरिकवाहतूक शाखा अन् पालिकेची टोलवाटोलवीवाहतूक विभाग वाहनांवर कारवाई करून जो दंड वसूल करते त्यातील निम्मी रक्कम पालिकेच्या खात्यावर वर्ग होत असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहनांच्या वेगावरील नियंत्रणाची जबाबदारी पालिकेचीही असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पोलीस म्हणतात, सूचनाफलक लावण्याचे काम पालिकेचे आहे, तर वाहतुकीची कोंडी कुठे आणि कशी होते याची माहिती पोलिसांना असताना आम्ही कसे फलक लावणार, असा बचाव पालिका करते. विशेष म्हणजे वाहतुक शाखा आणि पालिका यांच्यात याविषयी पत्रव्यवहारही झाला आहे. पण त्यावर कार्यवाही कोणतीच झाली नाही.तरूणांवर निर्बंध आवश्यकसध्या अनेक तरूणांच्या हातात अधिक क्षमतेच्या बाईक्स आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकजण वाऱ्याशी स्पर्धा करण्याची ऊर्मी मनात ठेवूनच वाहनावर बसतो. काहीवेळा ‘शायनिंग’साठी तर कधी कोणाला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी स्टंटबाजी चालते. संध्याकाळी सातनंतर वाहतूक पोलीस नसल्यामुळे बेलगाम तरूणाई आपल्याच नादात असते. कित्येकदा कट देण्याच्या नादात या तरूणाईने स्वत:चे आणि इतरांचेही शारीरिक नुकसान केले आहे. या तरूणाईवर निर्बंध ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनीही साध्या वेशात गस्त घालून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. वर्दळीची ठिकाणेराजवाडा, मोती चौक, प्रतापगंज पेठ चौक, शनिवार चौक, पोलीस मुख्यालय, पोवई नाका, जुना दवाखाना, शाळा आणि महाविद्यालय परिसर, एकेरी वाहतुकीची ठिकाणे, रूग्णालय परिसर.