शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

अधिकाऱ्यांना धारेवर धरले की विषय संपतो काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:34 IST

कराड: नुकत्याच झालेल्या कराड पंचायत समितीच्या मासिक सभेत स्मार्ट अंगणवाडी निवडीवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले गेले. पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता ...

कराड: नुकत्याच झालेल्या कराड पंचायत समितीच्या मासिक सभेत स्मार्ट अंगणवाडी निवडीवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले गेले. पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता या निवडी कशा केल्या, असा संतप्त सवाल सदस्यांनी केला. खरेतर त्यांनी अधिकारी असे धाडस कसे करू शकतात यावर आत्मचिंतन करायला हवे होते. असो, पण असे प्रकार सभागृहाला काही नवीन नाहीत. अधिकाऱ्यांना धारेवर धरलं की विषय संपतो का, याचाही कुठेतरी विचार व्हायला हवा.

पंचायत समितीची मासिक सभा अन् त्या सभेत कोणतातरी विभाग टार्गेट होणे, हा काही कराडला नवीन प्रकार नाही. कधी शिक्षण, कधी कृषी, कधी पाणीपुरवठा, कधी बांधकाम, कधी वैद्यकीय असा कोणता ना कोणता विभाग टार्गेट होतो. सदस्य संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरतात. अधिकारी जमेल तशी उत्तरे देतात. माध्यमातून त्यांच्याबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध होतात, पण पुढे काय? त्यात सुधारणा होते का? सकारात्मक बदल झाले का? आपण विचारलेल्या प्रश्नाचं सार्थ झालं का? याचा आढावा सदस्यांनी स्वतःच्या मनामध्येच घेतला तर खऱ्या अर्थाने हे प्रश्न मार्गी लागतील.

परवाच्या सभेत पाणीटंचाईच्या आराखड्यावरही चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी आराखडा तयार असल्याचे सांगितले. एका 'दादा' सदस्यांनी आराखडा तयार असेल, पण मंजूर व्हायला पावसाळा उजाडतो. अशी टिप्पणीही आवर्जून केली, पण त्याबरोबरच पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात फिरून पाणीटंचाईविषयी धावता आढावा घेतला का, हासुद्धा प्रश्नच आहे.

कराड पंचायत समिती जिल्ह्यातील सर्वात मोठी पंचायत समिती आहे. त्यामुळे येथे कामाचा व्याप मोठा आहे. त्यासाठी लागणारा अधिकारी, कर्मचारीवर्ग इतरांच्या तुलनेमध्ये येथे जास्त आहे. मग तेवढा कर्मचारीवर्ग कराडला उपलब्ध आहे का? कमी असल्यास तो पूर्ण क्षमतेने मिळावा यासाठी पदाधिकाऱ्यांनी काय पाठपुरावा केला, हे पाहणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.

तालुक्यात ग्रामपंचायतींची संख्या मोठी आहे. तुलनेने ग्रामसेवकांची संख्या कमी आहे. एक ग्रामसेवक दोन-तीन ग्रामपंचायतींचा भार वाहतो आहे. त्यामुळे कामावर परिणाम तर होणारच. अशावेळी नुसती प्रश्नांची सरबत्ती करून चालेल का, हे लक्षात घेतले पाहिजे.

यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कराडला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. कराड पंचायत समितीला खूप मोठा इतिहास आहे. अनेक दिग्गजांनी येथे सदस्य, सभापती उपसभापती म्हणून पदे भूषविली आहेत. त्या सभागृहात लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्यांकडून लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे आणि ती प्रतिष्ठाही जपली पाहिजे. हीच सामान्य लोकांची अपेक्षा आहे. ती पूर्ण होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे एवढेच !

चौकट

वर्षानुवर्षे अधिकाऱ्यांची सभेकडे पाठ

कराड पंचायत समितीच्या सभेला एसटी महामंडळ, वनविभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, निबंधक सहकारी संस्था, जीवन प्राधिकरण, भूमिअभिलेख, सामाजिक वनीकरण, लघुसिंचन विभाग आदी विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी येणे अपेक्षित असते. मात्र,यातील बरेच अधिकारी कित्येक महिने, वर्षे बैठकीला येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. सभागृहात सदस्यांनीही अनेकदा याबाबत संताप व्यक्त केला आहे, पण त्याचा काही फायदा झालेला दिसत नाही. याबाबत सदस्य काही ठोस पावले उचलतील का हे पाहणेही उचित ठरणार आहे.