शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

यापूर्वी जिल्ह्यात आलेला विकासनिधी गेला कुठे? - पालकमंत्री शंभुराज देसाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2023 19:14 IST

शंभूराज देसाई यांनी करताना यापुढे सर्वांना समान निधी वाटप केले जाईल जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढू अशी ग्वाही दिली. 

नसीर शिकलगार

फलटण - मी पालकमंत्री नसताना जिल्ह्याचा विकासाचा निधी फलटण आणि कराडला वळविला जात असल्याचे समजत होतो. मात्र फलटणला पण निधीचा अनुशेष असल्याचे दिसत आहे हे पाहता जिल्ह्यासाठी मिळणारा निधी कोठे गेला असा सवाल जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी करताना अप्रत्यक्षरीत्या राष्टवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींना जबाबदार धरले आहे. 

फलटण येथील डेक्कन चौकामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबीर व  फलटण तालुका जनसंपर्क कार्यालयाचा उदघाटन सोहळा पालकमंत्री  शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्याचबरोबर शंभूराज देसाई  यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते, शंभुराज देसाई म्हणाले की, फलटण तालुक्याला गेल्या अडीच वर्षात निधी वाटपात अनुशेष राहिला आहे. आता पालकमंत्री आपण झाला आहात. आता हा अनुशेष भरुन काढा, अशी अपेक्षा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केल्यावर, आतापर्यंत जिल्ह्यातला सर्वाधिक निधी कराड आणि फलटणला गेला म्हणून आम्ही टाहो फोडत होतो. पण, फलटणला पण हा निधी आला नाही म्हणजे गेला कुठं? असा सवाल शंभूराज देसाई यांनी करताना यापुढे सर्वांना समान निधी वाटप केले जाईल जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढू अशी ग्वाही दिली. 

झिरपवाडी येथील बंद असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न लवकरच खा रणजितसिंह यांना सोबत घेत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सोडवू निधीची कमतरता पडू देणार नाही असे सांगतानाच बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांना भरभक्कम ताकत दिली जाईल त्यांनी सुचविलेली विकास कामे केली जाईल अशी ग्वाही शंभूराज देसाई यांनी दिली बाळासाहेबाची शिवसेना आणि भाजप यापुढे तालुक्यात सर्व निवडणुका एकत्रित लढणार असून फलटण तालुक्यातील झिरपवाडी रुग्णालयाचा प्रलंबित प्रश्न तातडीने  पालकमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात सोडवावा विकासाचा अनुशेष भरून काढावा अशी मागणी करतानाच नीरा देवघरच्या कालव्याच्या प्रश्न अंतिम टप्प्यात आला असून लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुढील कामांचा शुभारंभ होणार आहे तालुक्याचे विकासात आमचे सरकार कमी पडणार नाही असे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले प्रास्ताविक विराज खराडे यांनी केले तर आभार विजय मायने यांनी मानले. 

यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,  बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख शरद कणसे, ,सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव,जेष्ठ नेते प्रल्हादराव सांळुखे पाटील , समशेरसिंह नाईक निंबाळकर, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड.नरसिंह निकम, अशोकराव जाधव, महिला आघाडी प्रमुख शारदाताई जाधव,विश्वासराव भोसले, विराज खराडे,विजय मायणे,सचिन बिडवे उपस्थित होते

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाई