शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान, धन कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:41 IST

कर्मचाऱ्यांचे लागले डोळे : ग्रामविकास विभागाकडून अपुरा निधी येत असल्याने जिल्हा प्रशासन कोड्यात लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात ...

कर्मचाऱ्यांचे लागले डोळे : ग्रामविकास विभागाकडून अपुरा निधी येत असल्याने जिल्हा प्रशासन कोड्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये १५ हजार ६७३ शासकीय कर्मचारी तसेच निमशासकीय कर्मचारी राबले परंतु अद्याप त्यांना निवडणुकीतील भत्ता मिळालेला नाही, त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान, धन कधी मिळणार? असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यामध्ये २२३ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली उर्वरित ६५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, ए आर ओ, क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान कर्मचारी, शिपाई, पोलीस कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ग्रामपंचायतीवर नेण्याची सोय वाहनाद्वारे केली होती मात्र संपूर्ण दिवस या कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर काम केले तसेच रात्री उशिरापर्यंत मतदान पेट्या करून तयार करून मतमोजणी केंद्रापर्यंत आणण्याचे काम देखील या कर्मचाऱ्यांनी केले आणि दुसऱ्या दिवशी मतमोजणीचे काम देखील मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांवर होते. मात्र या निवडणुकीचा भत्ता त्यांना मिळाला नसल्याने नाराजी आहे.

पॉइंटर

जिल्ह्यात निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती : ६५२

निवडणुकीत कर्तव्य बजावलेले अधिकारी : ३१६१

निवडणुकीत कर्तव्य बजावलेले कर्मचारी : १२५१२

तालुकानिहाय आढावा

सातारा : ग्रामपंचायती ८९, कर्मचारी २४०३

जावली : ग्रामपंचायती ३७, कर्मचारी ५८७

कोरेगाव : ग्रामपंचायती ४९, कर्मचारी १११५

वाई : ग्रामपंचायती ५७, कर्मचारी ११८३

महाबळेश्वर : ग्रामपंचायती १४, कर्मचारी २३१

खंडाळा : ग्रामपंचायती ५०, कर्मचारी ९९६

फलटण : ग्रामपंचायती ७४, कर्मचारी १९३४

माण : ग्रामपंचायती ४७, कर्मचारी ११३०

खटाव : ग्रामपंचायती ७६, कर्मचारी २०२२

कऱ्हाड : ग्रामपंचायती ८७, कर्मचारी २५९७

पाटण : ग्रामपंचायती ७२, कर्मचारी : १४९५

निधीची अडचण काय

ग्रामपंचायतींचा कारभार ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून चालतो. ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया मात्र महसूल खात्याच्या माध्यमातून राबविण्यात येते. त्यासाठी ग्रामविकास विभागाकडून महसूल खात्याला जो निधी मिळतो, त्यातूनच निवडणुकीचा संपूर्ण खर्च करावा लागतो. हा निधी अत्यल्प असल्याने काटकसर करून महसूल विभाग निवडणुका पार पाडतो.