शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
2
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
3
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
5
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
6
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
7
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
8
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी
9
आता तरी एकता दाखवा; काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने एअर स्ट्राईकला म्हटले 'टुच्चेपणा'
10
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
11
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
12
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
13
Operation Sindoor : "जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
14
Operation Sindoor : "अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
15
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
16
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
17
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
18
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
19
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
20
Mumbai Rains: ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ

खटाव-माणमधील ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षारक्षकांचा पगार होणार कधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:39 IST

१५ महिन्यांचा पगार थकला! कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून करतायत काम! तारीख पे तारीख...१५ महिन्यांचा पगार थकला! कोरोनाच्या ...

१५ महिन्यांचा पगार थकला!

कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून करतायत काम!

तारीख पे तारीख...१५ महिन्यांचा पगार थकला! कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून करतायत काम!

लोकमत न्यूज नेटवर्क

रशिद शेख

औंध : औंधसह खटाव-माण तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या सुरक्षारक्षकांचा पगार गेली पंधरा महिने झाला नसून, त्यांनी नेमके घर कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. या महिन्यात नाही तर पुढील महिन्यात होईल, या आशेने गेली पंधरा महिने पगारच झाला नाही. या कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने संसार उघड्यावर पडण्याची व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे ''बिनपगारी फुल्ल अधिकारी'' अशी अवस्था ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षारक्षकांची झाली आहे.

औंध ग्रामीण रुग्णालयात औंध भागातील सुमारे २५ गावांमधील वाडया-वस्त्यांवरील रुग्णांची, नागरिकांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होत आहे. या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात वर्दळ असल्याने सुरक्षारक्षक आपले काम चोख बजावतात. आता तिथेच असणाऱ्या शेजारील नवीन इमारतीत ३० बेडचे कोरोना सेंटर उभे राहिले आहे. तिथेही तसेच लसीकरणास ते रूग्णालयाच्या कामातही प्रशासनाला मदत करत असतात, मात्र, प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभावून पगार वेळेवर होत नसेल, तर एवढा जीव धोक्यात घालून जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

औंध हे गाव परिसरातील अनेक गावांसाठी मध्यवर्ती केंद्र बनले आहे. त्याचबरोबर औंध हे धार्मिक व पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. याठिकाणी असणारे ग्रामीण रुग्णालय हा रुग्णांसाठी जिव्हाळयाचा विषय आहे. मुळातच रुग्णालयात अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णालयात कधी कधी वादावादीचे प्रसंग उदभवल्यास सुरक्षारक्षक येणाऱ्या पेशंटला योग्य मार्गदर्शन करत असतात. आता लसीकरणासाठी येणाऱ्या मोठ्या गर्दीला शिस्त लावण्याचे कामही तेच करतात.

सध्या कोरोनाच्या भयंकर साथीतही आपले कर्तव्य ते बजावत आहेत. सुरक्षारक्षकांना कामाची गरज असल्याने आजपर्यंत ते संयमाने काम करीत आहेत, मात्र, एवढ्या प्रामाणिकपणे काम करून केलेल्या कामाचे दाम मिळत नसल्याने रुग्णालयातील चार सुरक्षारक्षकांच्यात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. प्रशासनाने लक्ष घालून पगार लवकरात लवकर करावेत, अशी मागणी सुरक्षारक्षक करू लागले आहेत.

कोट

कामावरून घरी गेले की पहिला प्रश्न कुटुंबातील सदस्यांचा असतो की "काय कळाले का पगाराचे"कधी होणार आहे, तुम्हाला बोलता येत नाही का? अशा अनेक प्रसंगांना कुटुंब चालविताना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पगार व्हावा, हीच आमची मागणी आहे

सागर घार्गे,

सुरक्षारक्षक, ग्रामीण रुग्णालय, औंध.