शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

खटाव-माणमधील ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षारक्षकांचा पगार होणार कधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:39 IST

१५ महिन्यांचा पगार थकला! कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून करतायत काम! तारीख पे तारीख...१५ महिन्यांचा पगार थकला! कोरोनाच्या ...

१५ महिन्यांचा पगार थकला!

कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून करतायत काम!

तारीख पे तारीख...१५ महिन्यांचा पगार थकला! कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून करतायत काम!

लोकमत न्यूज नेटवर्क

रशिद शेख

औंध : औंधसह खटाव-माण तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या सुरक्षारक्षकांचा पगार गेली पंधरा महिने झाला नसून, त्यांनी नेमके घर कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. या महिन्यात नाही तर पुढील महिन्यात होईल, या आशेने गेली पंधरा महिने पगारच झाला नाही. या कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने संसार उघड्यावर पडण्याची व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे ''बिनपगारी फुल्ल अधिकारी'' अशी अवस्था ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षारक्षकांची झाली आहे.

औंध ग्रामीण रुग्णालयात औंध भागातील सुमारे २५ गावांमधील वाडया-वस्त्यांवरील रुग्णांची, नागरिकांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होत आहे. या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात वर्दळ असल्याने सुरक्षारक्षक आपले काम चोख बजावतात. आता तिथेच असणाऱ्या शेजारील नवीन इमारतीत ३० बेडचे कोरोना सेंटर उभे राहिले आहे. तिथेही तसेच लसीकरणास ते रूग्णालयाच्या कामातही प्रशासनाला मदत करत असतात, मात्र, प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभावून पगार वेळेवर होत नसेल, तर एवढा जीव धोक्यात घालून जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

औंध हे गाव परिसरातील अनेक गावांसाठी मध्यवर्ती केंद्र बनले आहे. त्याचबरोबर औंध हे धार्मिक व पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. याठिकाणी असणारे ग्रामीण रुग्णालय हा रुग्णांसाठी जिव्हाळयाचा विषय आहे. मुळातच रुग्णालयात अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णालयात कधी कधी वादावादीचे प्रसंग उदभवल्यास सुरक्षारक्षक येणाऱ्या पेशंटला योग्य मार्गदर्शन करत असतात. आता लसीकरणासाठी येणाऱ्या मोठ्या गर्दीला शिस्त लावण्याचे कामही तेच करतात.

सध्या कोरोनाच्या भयंकर साथीतही आपले कर्तव्य ते बजावत आहेत. सुरक्षारक्षकांना कामाची गरज असल्याने आजपर्यंत ते संयमाने काम करीत आहेत, मात्र, एवढ्या प्रामाणिकपणे काम करून केलेल्या कामाचे दाम मिळत नसल्याने रुग्णालयातील चार सुरक्षारक्षकांच्यात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. प्रशासनाने लक्ष घालून पगार लवकरात लवकर करावेत, अशी मागणी सुरक्षारक्षक करू लागले आहेत.

कोट

कामावरून घरी गेले की पहिला प्रश्न कुटुंबातील सदस्यांचा असतो की "काय कळाले का पगाराचे"कधी होणार आहे, तुम्हाला बोलता येत नाही का? अशा अनेक प्रसंगांना कुटुंब चालविताना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पगार व्हावा, हीच आमची मागणी आहे

सागर घार्गे,

सुरक्षारक्षक, ग्रामीण रुग्णालय, औंध.