शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

खटाव-माणमधील ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षारक्षकांचा पगार होणार कधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:39 IST

१५ महिन्यांचा पगार थकला! कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून करतायत काम! तारीख पे तारीख...१५ महिन्यांचा पगार थकला! कोरोनाच्या ...

१५ महिन्यांचा पगार थकला!

कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून करतायत काम!

तारीख पे तारीख...१५ महिन्यांचा पगार थकला! कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून करतायत काम!

लोकमत न्यूज नेटवर्क

रशिद शेख

औंध : औंधसह खटाव-माण तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या सुरक्षारक्षकांचा पगार गेली पंधरा महिने झाला नसून, त्यांनी नेमके घर कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. या महिन्यात नाही तर पुढील महिन्यात होईल, या आशेने गेली पंधरा महिने पगारच झाला नाही. या कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने संसार उघड्यावर पडण्याची व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे ''बिनपगारी फुल्ल अधिकारी'' अशी अवस्था ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षारक्षकांची झाली आहे.

औंध ग्रामीण रुग्णालयात औंध भागातील सुमारे २५ गावांमधील वाडया-वस्त्यांवरील रुग्णांची, नागरिकांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होत आहे. या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात वर्दळ असल्याने सुरक्षारक्षक आपले काम चोख बजावतात. आता तिथेच असणाऱ्या शेजारील नवीन इमारतीत ३० बेडचे कोरोना सेंटर उभे राहिले आहे. तिथेही तसेच लसीकरणास ते रूग्णालयाच्या कामातही प्रशासनाला मदत करत असतात, मात्र, प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभावून पगार वेळेवर होत नसेल, तर एवढा जीव धोक्यात घालून जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

औंध हे गाव परिसरातील अनेक गावांसाठी मध्यवर्ती केंद्र बनले आहे. त्याचबरोबर औंध हे धार्मिक व पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. याठिकाणी असणारे ग्रामीण रुग्णालय हा रुग्णांसाठी जिव्हाळयाचा विषय आहे. मुळातच रुग्णालयात अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णालयात कधी कधी वादावादीचे प्रसंग उदभवल्यास सुरक्षारक्षक येणाऱ्या पेशंटला योग्य मार्गदर्शन करत असतात. आता लसीकरणासाठी येणाऱ्या मोठ्या गर्दीला शिस्त लावण्याचे कामही तेच करतात.

सध्या कोरोनाच्या भयंकर साथीतही आपले कर्तव्य ते बजावत आहेत. सुरक्षारक्षकांना कामाची गरज असल्याने आजपर्यंत ते संयमाने काम करीत आहेत, मात्र, एवढ्या प्रामाणिकपणे काम करून केलेल्या कामाचे दाम मिळत नसल्याने रुग्णालयातील चार सुरक्षारक्षकांच्यात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. प्रशासनाने लक्ष घालून पगार लवकरात लवकर करावेत, अशी मागणी सुरक्षारक्षक करू लागले आहेत.

कोट

कामावरून घरी गेले की पहिला प्रश्न कुटुंबातील सदस्यांचा असतो की "काय कळाले का पगाराचे"कधी होणार आहे, तुम्हाला बोलता येत नाही का? अशा अनेक प्रसंगांना कुटुंब चालविताना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पगार व्हावा, हीच आमची मागणी आहे

सागर घार्गे,

सुरक्षारक्षक, ग्रामीण रुग्णालय, औंध.