शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

जेव्हा कुंपणच शेत खाते...कशी राखण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:38 IST

सातारा सातारा जिल्ह्यात दररोज कोविडबाधित रुग्णांचा उच्चांक सुरू आहे. प्रशासनाने घातलेले नियम पायदळी तुडविण्याचा हा प्रकार म्हणजे बंदी घातली ...

सातारा

सातारा जिल्ह्यात दररोज कोविडबाधित रुग्णांचा उच्चांक सुरू आहे. प्रशासनाने घातलेले नियम पायदळी तुडविण्याचा हा प्रकार म्हणजे बंदी घातली आहे, ती तोडण्यासाठीच, अशा अविर्भावात आहे. अत्यावश्यक नसलेल्या दुकानांमधूनही चोचले पुरविण्यासाठी काहीजण अर्जव करत आहेत. घरपोच सेवेसाठी प्रशासनाने सूट दिली असली, तरी काहीजण दुकानाच्या दारातच ठिय्या मांडत आहेत. चौका-चौकात पोलीस उभे असताना, गल्ल्यांमधून दुकाने उघडली जात आहेत. हे धाडस कशातून येते. कारण काही ठिकाणी तर पोलीसच लाभार्थी असल्याचे पाहायला मिळते. हे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्यासारखा प्रकार आहे.

जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येला जबाबदार कोण? असा प्रश्न एकदा स्वत:ला विचारून तर पाहा. एका बाजूला कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत नाही म्हणून खंत व्यक्त करायची आणि दुसरीकडे आपणच नियम तोडायचे. कोरोना हटवायचा ठेका काही फक्त प्रशासनाने घेतलेला नाही, त्याला सर्व सातारकरांचेही सहकार्य हवे आहे. पण, आपणच नियम पाळले नाहीत, तर बाधितांची संख्या कमी कशी होणार. याचेही भान सातारकरांना राहिलेले नाही. पोलिसांनी दंडुका उगारला की, अनेकांना राग येतो. वरिष्ठांचे फोन येतात; पण आपल्यामुळे कितीजण बाधित होत आहेत, याची जाणीव आपल्याला नाही का

लोकांनी बाहेर पडू नये यासाठी चौका-चौकात पोलीस आहेत. कोणीही दुकाने न उघडता लोकांना घरपोच सेवा द्यावयाची आहे. जिल्हाधिकारी यांनी असा नियम सांगितला आहे. पण, प्रत्यक्षात लोक दुकानदारांच्या दारातच येत आहेत. त्यामुळे शटर बंद असले, तरी या शटरआडून साहित्याचा पुरवठा होत आहे. हे सर्व पोलिसांच्या समक्ष होत आहे. पोलिसांची गाडी येते आणि मुख्य रस्त्यावरून फिरुन जाते. पण, गल्लीत काय सुरू आहे, याची कल्पनाच कोणाला नाही. कारण सर्वसामान्यांबरोबर यातील लाभार्थी काही पोलीस आणि शासकीय कर्मचारीही आहेत. त्यामुळे जर या सर्वांनीच अशापद्धतीने वागायचे ठरविले, तर चेन तोडणार कोण आणि बाधितांची संख्या कमी होणार कशी.

चौकट

व्यापाऱ्यांची घरपोच सेवेची अडचण

प्रशासनाने लोकांना सकाळी ७ ते ११ या वेळेत घरपोच सेवा द्या, असे सांगितले असले, तरी व्यापारी आणि किराणा माल दुकानदारांना ते शक्य होत नाही. काही दुकानांमध्ये एक ते दोन कामगार आहेत. काही दुकानात मालकच सर्व काम करतात. अशावेळी साहित्याची यादी काढायची कधी आणि घरपोच करायची कधी. त्यांना हे अशक्य असल्याने लोकांना दुकानापर्यंत येण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे व्यापारी घरी नाही आणि ग्राहक दुकानापर्यंत पोहोचतोय.

चौकट

प्रशासन कोणकोणत्या पातळीवर लढणार

कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिविर, व्हेंटिलेटर बेड वाढविणे, हॉस्पिटलची संख्या वाढविणे अशा पातळीवर काम करायचे का, नागरिकांवर लक्ष ठेवत नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करायची, अशा अवस्थेत प्रशासन आहे. सर्वांकडून सहकार्य झाले तरच कोरोना विरोधातील ही लढाई जिंकता येईल. गतवेळच्या अनुभवावर तरी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. कारण सध्याची स्थिती जास्त गंभीर झाली आहे. याचीही जाण ठेवावी लागेल.