शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जेव्हा कुंपणच शेत खाते...कशी राखण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:38 IST

सातारा सातारा जिल्ह्यात दररोज कोविडबाधित रुग्णांचा उच्चांक सुरू आहे. प्रशासनाने घातलेले नियम पायदळी तुडविण्याचा हा प्रकार म्हणजे बंदी घातली ...

सातारा

सातारा जिल्ह्यात दररोज कोविडबाधित रुग्णांचा उच्चांक सुरू आहे. प्रशासनाने घातलेले नियम पायदळी तुडविण्याचा हा प्रकार म्हणजे बंदी घातली आहे, ती तोडण्यासाठीच, अशा अविर्भावात आहे. अत्यावश्यक नसलेल्या दुकानांमधूनही चोचले पुरविण्यासाठी काहीजण अर्जव करत आहेत. घरपोच सेवेसाठी प्रशासनाने सूट दिली असली, तरी काहीजण दुकानाच्या दारातच ठिय्या मांडत आहेत. चौका-चौकात पोलीस उभे असताना, गल्ल्यांमधून दुकाने उघडली जात आहेत. हे धाडस कशातून येते. कारण काही ठिकाणी तर पोलीसच लाभार्थी असल्याचे पाहायला मिळते. हे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्यासारखा प्रकार आहे.

जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येला जबाबदार कोण? असा प्रश्न एकदा स्वत:ला विचारून तर पाहा. एका बाजूला कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत नाही म्हणून खंत व्यक्त करायची आणि दुसरीकडे आपणच नियम तोडायचे. कोरोना हटवायचा ठेका काही फक्त प्रशासनाने घेतलेला नाही, त्याला सर्व सातारकरांचेही सहकार्य हवे आहे. पण, आपणच नियम पाळले नाहीत, तर बाधितांची संख्या कमी कशी होणार. याचेही भान सातारकरांना राहिलेले नाही. पोलिसांनी दंडुका उगारला की, अनेकांना राग येतो. वरिष्ठांचे फोन येतात; पण आपल्यामुळे कितीजण बाधित होत आहेत, याची जाणीव आपल्याला नाही का

लोकांनी बाहेर पडू नये यासाठी चौका-चौकात पोलीस आहेत. कोणीही दुकाने न उघडता लोकांना घरपोच सेवा द्यावयाची आहे. जिल्हाधिकारी यांनी असा नियम सांगितला आहे. पण, प्रत्यक्षात लोक दुकानदारांच्या दारातच येत आहेत. त्यामुळे शटर बंद असले, तरी या शटरआडून साहित्याचा पुरवठा होत आहे. हे सर्व पोलिसांच्या समक्ष होत आहे. पोलिसांची गाडी येते आणि मुख्य रस्त्यावरून फिरुन जाते. पण, गल्लीत काय सुरू आहे, याची कल्पनाच कोणाला नाही. कारण सर्वसामान्यांबरोबर यातील लाभार्थी काही पोलीस आणि शासकीय कर्मचारीही आहेत. त्यामुळे जर या सर्वांनीच अशापद्धतीने वागायचे ठरविले, तर चेन तोडणार कोण आणि बाधितांची संख्या कमी होणार कशी.

चौकट

व्यापाऱ्यांची घरपोच सेवेची अडचण

प्रशासनाने लोकांना सकाळी ७ ते ११ या वेळेत घरपोच सेवा द्या, असे सांगितले असले, तरी व्यापारी आणि किराणा माल दुकानदारांना ते शक्य होत नाही. काही दुकानांमध्ये एक ते दोन कामगार आहेत. काही दुकानात मालकच सर्व काम करतात. अशावेळी साहित्याची यादी काढायची कधी आणि घरपोच करायची कधी. त्यांना हे अशक्य असल्याने लोकांना दुकानापर्यंत येण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे व्यापारी घरी नाही आणि ग्राहक दुकानापर्यंत पोहोचतोय.

चौकट

प्रशासन कोणकोणत्या पातळीवर लढणार

कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिविर, व्हेंटिलेटर बेड वाढविणे, हॉस्पिटलची संख्या वाढविणे अशा पातळीवर काम करायचे का, नागरिकांवर लक्ष ठेवत नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करायची, अशा अवस्थेत प्रशासन आहे. सर्वांकडून सहकार्य झाले तरच कोरोना विरोधातील ही लढाई जिंकता येईल. गतवेळच्या अनुभवावर तरी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. कारण सध्याची स्थिती जास्त गंभीर झाली आहे. याचीही जाण ठेवावी लागेल.