शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा कुंपणच शेत खाते...कशी राखण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:38 IST

सातारा सातारा जिल्ह्यात दररोज कोविडबाधित रुग्णांचा उच्चांक सुरू आहे. प्रशासनाने घातलेले नियम पायदळी तुडविण्याचा हा प्रकार म्हणजे बंदी घातली ...

सातारा

सातारा जिल्ह्यात दररोज कोविडबाधित रुग्णांचा उच्चांक सुरू आहे. प्रशासनाने घातलेले नियम पायदळी तुडविण्याचा हा प्रकार म्हणजे बंदी घातली आहे, ती तोडण्यासाठीच, अशा अविर्भावात आहे. अत्यावश्यक नसलेल्या दुकानांमधूनही चोचले पुरविण्यासाठी काहीजण अर्जव करत आहेत. घरपोच सेवेसाठी प्रशासनाने सूट दिली असली, तरी काहीजण दुकानाच्या दारातच ठिय्या मांडत आहेत. चौका-चौकात पोलीस उभे असताना, गल्ल्यांमधून दुकाने उघडली जात आहेत. हे धाडस कशातून येते. कारण काही ठिकाणी तर पोलीसच लाभार्थी असल्याचे पाहायला मिळते. हे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्यासारखा प्रकार आहे.

जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येला जबाबदार कोण? असा प्रश्न एकदा स्वत:ला विचारून तर पाहा. एका बाजूला कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत नाही म्हणून खंत व्यक्त करायची आणि दुसरीकडे आपणच नियम तोडायचे. कोरोना हटवायचा ठेका काही फक्त प्रशासनाने घेतलेला नाही, त्याला सर्व सातारकरांचेही सहकार्य हवे आहे. पण, आपणच नियम पाळले नाहीत, तर बाधितांची संख्या कमी कशी होणार. याचेही भान सातारकरांना राहिलेले नाही. पोलिसांनी दंडुका उगारला की, अनेकांना राग येतो. वरिष्ठांचे फोन येतात; पण आपल्यामुळे कितीजण बाधित होत आहेत, याची जाणीव आपल्याला नाही का

लोकांनी बाहेर पडू नये यासाठी चौका-चौकात पोलीस आहेत. कोणीही दुकाने न उघडता लोकांना घरपोच सेवा द्यावयाची आहे. जिल्हाधिकारी यांनी असा नियम सांगितला आहे. पण, प्रत्यक्षात लोक दुकानदारांच्या दारातच येत आहेत. त्यामुळे शटर बंद असले, तरी या शटरआडून साहित्याचा पुरवठा होत आहे. हे सर्व पोलिसांच्या समक्ष होत आहे. पोलिसांची गाडी येते आणि मुख्य रस्त्यावरून फिरुन जाते. पण, गल्लीत काय सुरू आहे, याची कल्पनाच कोणाला नाही. कारण सर्वसामान्यांबरोबर यातील लाभार्थी काही पोलीस आणि शासकीय कर्मचारीही आहेत. त्यामुळे जर या सर्वांनीच अशापद्धतीने वागायचे ठरविले, तर चेन तोडणार कोण आणि बाधितांची संख्या कमी होणार कशी.

चौकट

व्यापाऱ्यांची घरपोच सेवेची अडचण

प्रशासनाने लोकांना सकाळी ७ ते ११ या वेळेत घरपोच सेवा द्या, असे सांगितले असले, तरी व्यापारी आणि किराणा माल दुकानदारांना ते शक्य होत नाही. काही दुकानांमध्ये एक ते दोन कामगार आहेत. काही दुकानात मालकच सर्व काम करतात. अशावेळी साहित्याची यादी काढायची कधी आणि घरपोच करायची कधी. त्यांना हे अशक्य असल्याने लोकांना दुकानापर्यंत येण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे व्यापारी घरी नाही आणि ग्राहक दुकानापर्यंत पोहोचतोय.

चौकट

प्रशासन कोणकोणत्या पातळीवर लढणार

कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिविर, व्हेंटिलेटर बेड वाढविणे, हॉस्पिटलची संख्या वाढविणे अशा पातळीवर काम करायचे का, नागरिकांवर लक्ष ठेवत नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करायची, अशा अवस्थेत प्रशासन आहे. सर्वांकडून सहकार्य झाले तरच कोरोना विरोधातील ही लढाई जिंकता येईल. गतवेळच्या अनुभवावर तरी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. कारण सध्याची स्थिती जास्त गंभीर झाली आहे. याचीही जाण ठेवावी लागेल.