शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

सातारा जिल्ह्यातील दीड लाख बेरोजगारांना नोकऱ्या कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:40 IST

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये तब्बल दीड लाख युवक-युवती बेरोजगार आहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये तब्बल दीड लाख युवक-युवती बेरोजगार आहेत. त्यांच्या भविष्याबाबत काय धोरण आखणार आहे? असा प्रश्न भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्षाने उपस्थित केला असून, सरकारी नोकºया तत्काळ सुरु कराव्यात, या प्रमुख मागणीसह इतर १० मागण्यांसाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे विविध संघटनांच्या वतीने चक्री उपोषण करण्यात आले. जिल्ह्यामध्ये रोजगार निर्माण करणारे कार्यालय आहे, त्यात बेकारांची ८० हजार इतकी संख्या नोंदणीकृत आहे. नोंदकृत नसणारे बेकारांची संख्या मिळालेल्या माहितीनुसार ७० हजार इतकी आहे. या युवक-युवतींच्या भविष्याचे काय? याचे उत्तर मिळाले पाहिजे. सामाजिक परिस्थिती चिंताजनक आहे, अशी खंत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्यापुढे व्यक्त करण्यात आली.

सरकारी नोकरांच्या पेन्शन २००५ पासून सर्वांना सुरू करावी, भटके विमुक्त, धनगर, वंजारी व विशेष मागास प्रवर्ग यांचा समावेश अनुसूचित जमातीत करावा, कंत्राटी पद्धती बंद करावी, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी खासगीकरण केलेल्या सर्व उद्योगधंद्यांना, सेवा उद्योगांना लागू करावी, खासगी सेवा उद्योगातील कर्मचाºयांना कायद्याने संरक्षण द्या, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जमाती, विशेष प्रवर्ग सहकारी संस्थांचे खासगीकरण थांबवा व तिथे तत्काळ नोकर भरती सुरू करावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, त्या केल्या नाहीत तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष लक्ष्मण माने, दगडू सस्ते, नेताजी गुरव, बाळासाहेब शिरसाट, दादासाहेब ओव्हाळ, भालचंद्र माळी, मच्छिंद्र जाधव यांच्या सहीचे निवेदन देण्यात आले.नोटाबंदी निर्णयात जनता अंधारातनोटाबंदीचा निर्णय घेताना जनतेला विश्वासात घेतले नाही. बेकारी, बेरोजगारी, गरिबी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, शिक्षण मोफत नाही, कर्ज काढून शिक्षण घ्यायचे आणि बेरोजगार व्हायचे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.