शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

‘केव्हा तरी पहाटे’ने घेतला रसिकांच्या मनाचा ठाव

By admin | Updated: October 23, 2014 22:53 IST

रसिक चिंब: गांधी मैदानावर रंगली गीतांची अविट मैफिल

सातारा : दिवाळीची पहिली पहाट सुरमय करून सातारकरांना आनंद देणाऱ्या ‘केव्हा तरी पहाटे’ या कार्यक्रमाचा दहावा अध्याय गांधी मैदानावर गायला गेला. अवीट गाण्यांनी बुधवारी सातारकर रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. या कार्यक्रमाची सुरुवात गायक अमोल बावडेकर, नगराध्यक्ष सचिन सारस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी राज्य वाहतूकदार संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश गवळी, नगरसेवक निशांत पाटील, व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष गुरुप्रसाद सारडा, दिलीप गवळी, अ‍ॅड. मुकुंद सारडा, सलीम कच्छी, धनंजय कुलकर्णी यांची उपस्थिती होती.अमोल बावडेकर यांच्या ‘ओंकार स्वरुपा तुज नमो’ या गणेश स्तुतीने आरंभ झाला. जुन्या, नव्या मराठी गाण्यांचा हा नजराणा सादर होताना सातारकरांनी आपला पायात ठेका धरला होता. राजन घोणे, पूर्णिमा भावसार आंग्यले, साथीला सांगलीचे प्रसाद लिमये यांनी हा कार्यक्रम उंचीवर नेला. अलका सावंत यांच्या ‘केव्हा तरी पहाटे’ या शिर्षक गीतानंतर दिवाळीचे गाणे अर्थात ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’हे गीत पूर्णिमा यांनी सादर केले. पं. जितेंद्र अभिषेकींचा जादुई स्वर लाभलेले कैवल्याच्या चांदण्याला भूकेला चकोर हे गीत अमोल बावडेकर यांनी सादर केले. हा गाण्याचा प्रवास पुढे सुरू राहात राजन घोणे यांचे आकाशी झेप घेरे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा, शूर आम्ही सरदार, दूर किनारा राहिला सादर होऊन परिकथेतील राजकुमारा, घरकुल चित्रपटातील मलमली तारुण्य माझे, प्रेमाला उपमा नाही, धुंदी कळ्यांना, पाहिले न मी तुला, श्रीरंग गोडबोले यांचे मुंबई-पुणे मुंबई चित्रपटातील ‘नवे कधी तू’ हे गीत प्रसाद लिमये यांच्याकडून सादर झाले. त्यानंतर हा सागरी, येशील राणी या गीतांच्या सादरीकरणानंतर थोडी वेगळी वाट चोखाळत ढोलकीच्या ठेक्यावर लावणीचा रंग भरत ‘या रावजी बसा भावजी’ सादर झाली.कार्यक्रमात गायकांबरोबरच संगीत साथ करणारे दीपक सोनावणे, धनंजय कान्हेरे, शांताराम दयाळ, बासरीवादक रसुली मुलाणी, सचिन कवितके, केदार गुळवणी, किरण ठाणेदार, रमाकांत पालेकर, राजेश हेमंत, ध्वनी संयोजक नंदकुमार सव्वाशे यांचा सत्कार कंदी पेढे देऊन करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दलही अ‍ॅड. बाबर यांचा सातारकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम सातारचा एक पॅटर्न झाल्याचे गौरवोद्गार अ‍ॅड. मुकुंद सारडा यांनी काढले. (प्रतिनिधी)