शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

पाच ठिकाणच्या दगाबाजीचे राष्ट्रवादी नेते काय करणार ?

By admin | Updated: April 2, 2015 00:41 IST

‘प्रदेश’चा कानाडोळा : सर्वात लाजिरवाणे पराभव सांगलीत

अविनाश कोळी - सांगली विधानसभेच्या निवडणुकीत अधिकृत उमेदवाराविरोधात काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संघटनेतून बाहेर काढण्याचा निर्धार राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. मात्र पश्चिम महाराष्ट्रात सर्वात लाजिरवाणे पराभव झालेल्या सांगली जिल्ह्यातील कुरघोड्यांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. या बैठकीत केवळ शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी याठिकाणच्या पराभवाची जबाबदारी निश्चित करण्याचे ठरले. सांगली जिल्ह्यातील तब्बल पाच मतदारसंघात पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या दगाबाजीचे काय होणार?, याचे उत्तर फटका बसलेल्या उमेदवारांना अजूनही मिळालेले नाही. केवळ शिरोळ, हातकणंगले आणि इचलकरंजी येथील पक्षविरोधी कामाचा गाजावाजा करताना सांगली जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील पराभवाकडे प्रदेश कार्यकारिणीने दुर्लक्ष कसे केले?, असा सवाल आज सांगली जिल्ह्यातील राजकीय गोटात चर्चेत होता. सांगली, मिरज, खानापूर-आटपाडी, पलूस-कडेगाव आणि शिराळा या पाच मतदारसंघात पक्षाची ताकद असूनही, त्याप्रमाणात मतदान होऊ शकले नाही. यातील सांगली, मिरज आणि पलूस-कडेगाव येथील पराभव सर्वात लाजीरवाणे म्हणून गणले गेले. याठिकाणी पक्षीय ताकदीच्या दहा टक्केही मते अधिकृत उमेदवारांना मिळू शकली नाहीत. विधानसभा निवडणूक संपल्यानंतरही पक्षाने या निकालांबाबत आणि झालेल्या पक्षविरोधी राजकारणाबाबत गांभीर्याने घेतले नाही. सांगलीतील राष्ट्रवादीचे सुरेश पाटील आणि पलूस-कडेगाव मतदारसंघातील सुरेखा लाड यांना मिळालेली मते धक्कादायक होती. महापालिका निवडणुकीवेळी पक्षाच्या पदरात सांगली, मिरजेतून तब्बल ६0 हजार मते मिळाली होती. ही मते विधानसभा निवडणुकीत गेली कुठे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता. राष्ट्रवादीचे अनेकजण छुप्या पद्धतीने भाजपच्या प्रचारात गुंतले होते. भाजपवर त्यांनी एकतर्फी प्रेम का केले? कोणाच्या सांगण्यावरून केले? असे अनेक प्रश्न अजूनही उपस्थित केले जात आहेत. मदन पाटील यांच्या पराभवासाठी राष्ट्रवादी नेत्यांनी अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी न राहता भाजपला सहकार्य करणे पसंत केले. त्यामुळे पक्षाची नामुष्की झाली. पक्षसंघटनेतून अशा दगाबाजी करणाऱ्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना हटवायचे झाले, तर संपूर्ण पक्षच रिकामा करावा लागेल, अशीही स्थिती आहे. तरीही अशा दगाबाजीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न पक्षीय स्तरावर नक्कीच झाल्याचा संशय बळावत आहे. म्हणूनच सांगली जिल्ह्यातील पराभवांबाबत अद्याप कोणाला विचारणाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे पक्षांतर्गत निवडीवेळी अशा दगाबाजीत गुंतलेल्यांना पुन्हा मानाचे पद मिळाले तरी आश्चर्य वाटणार नाही. गेल्या काही वर्षांपासून पक्षीय हितापेक्षा व्यक्तिगत द्वेष महत्त्वाचा मानून राजकारण झाल्याने पक्षवाढीला खीळ बसली आहे.नगरसेवकांचे काय?या नगरसेवकांनी सर्वाधिक मते मिळवून महापालिकेत प्रवेश केला, त्यांच्या प्रभागातील पक्षाची मते विधानसभेच्या निवडणुकीवेळी गेली कुठे, असा सवाल विधानसभेनंतर वारंवार उपस्थित होत आहे. पक्षाच्या एकाही नेत्याला याचे उत्तर देता आले नाही. मोदी लाटेचे कारण सांगून ते नामानिराळे होताना दिसतात. दिनकरतात्यांचा गाजावाजादिनकर पाटील यांनी लोकसभेला उघडपणे भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यावेळी पक्षातील अन्य पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर उघड आणि छुप्या पद्धतीने टीका केली. प्रदेश कार्यकारिणीकडेही तक्रारी केल्या. ज्यांनी लेखी आणि तोंडी स्वरुपात तक्रारी केल्या त्याच नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विधानसभेला छुप्या पद्धतीने पुन्हा दिनकर पाटील यांच्यासारखाच भाजपला पाठिंबा दिला. त्यांच्या कृतीचा गाजावाजा मात्र झाला नाही.