शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

पाच ठिकाणच्या दगाबाजीचे राष्ट्रवादी नेते काय करणार ?

By admin | Updated: April 2, 2015 00:41 IST

‘प्रदेश’चा कानाडोळा : सर्वात लाजिरवाणे पराभव सांगलीत

अविनाश कोळी - सांगली विधानसभेच्या निवडणुकीत अधिकृत उमेदवाराविरोधात काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संघटनेतून बाहेर काढण्याचा निर्धार राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. मात्र पश्चिम महाराष्ट्रात सर्वात लाजिरवाणे पराभव झालेल्या सांगली जिल्ह्यातील कुरघोड्यांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. या बैठकीत केवळ शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी याठिकाणच्या पराभवाची जबाबदारी निश्चित करण्याचे ठरले. सांगली जिल्ह्यातील तब्बल पाच मतदारसंघात पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या दगाबाजीचे काय होणार?, याचे उत्तर फटका बसलेल्या उमेदवारांना अजूनही मिळालेले नाही. केवळ शिरोळ, हातकणंगले आणि इचलकरंजी येथील पक्षविरोधी कामाचा गाजावाजा करताना सांगली जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील पराभवाकडे प्रदेश कार्यकारिणीने दुर्लक्ष कसे केले?, असा सवाल आज सांगली जिल्ह्यातील राजकीय गोटात चर्चेत होता. सांगली, मिरज, खानापूर-आटपाडी, पलूस-कडेगाव आणि शिराळा या पाच मतदारसंघात पक्षाची ताकद असूनही, त्याप्रमाणात मतदान होऊ शकले नाही. यातील सांगली, मिरज आणि पलूस-कडेगाव येथील पराभव सर्वात लाजीरवाणे म्हणून गणले गेले. याठिकाणी पक्षीय ताकदीच्या दहा टक्केही मते अधिकृत उमेदवारांना मिळू शकली नाहीत. विधानसभा निवडणूक संपल्यानंतरही पक्षाने या निकालांबाबत आणि झालेल्या पक्षविरोधी राजकारणाबाबत गांभीर्याने घेतले नाही. सांगलीतील राष्ट्रवादीचे सुरेश पाटील आणि पलूस-कडेगाव मतदारसंघातील सुरेखा लाड यांना मिळालेली मते धक्कादायक होती. महापालिका निवडणुकीवेळी पक्षाच्या पदरात सांगली, मिरजेतून तब्बल ६0 हजार मते मिळाली होती. ही मते विधानसभा निवडणुकीत गेली कुठे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता. राष्ट्रवादीचे अनेकजण छुप्या पद्धतीने भाजपच्या प्रचारात गुंतले होते. भाजपवर त्यांनी एकतर्फी प्रेम का केले? कोणाच्या सांगण्यावरून केले? असे अनेक प्रश्न अजूनही उपस्थित केले जात आहेत. मदन पाटील यांच्या पराभवासाठी राष्ट्रवादी नेत्यांनी अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी न राहता भाजपला सहकार्य करणे पसंत केले. त्यामुळे पक्षाची नामुष्की झाली. पक्षसंघटनेतून अशा दगाबाजी करणाऱ्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना हटवायचे झाले, तर संपूर्ण पक्षच रिकामा करावा लागेल, अशीही स्थिती आहे. तरीही अशा दगाबाजीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न पक्षीय स्तरावर नक्कीच झाल्याचा संशय बळावत आहे. म्हणूनच सांगली जिल्ह्यातील पराभवांबाबत अद्याप कोणाला विचारणाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे पक्षांतर्गत निवडीवेळी अशा दगाबाजीत गुंतलेल्यांना पुन्हा मानाचे पद मिळाले तरी आश्चर्य वाटणार नाही. गेल्या काही वर्षांपासून पक्षीय हितापेक्षा व्यक्तिगत द्वेष महत्त्वाचा मानून राजकारण झाल्याने पक्षवाढीला खीळ बसली आहे.नगरसेवकांचे काय?या नगरसेवकांनी सर्वाधिक मते मिळवून महापालिकेत प्रवेश केला, त्यांच्या प्रभागातील पक्षाची मते विधानसभेच्या निवडणुकीवेळी गेली कुठे, असा सवाल विधानसभेनंतर वारंवार उपस्थित होत आहे. पक्षाच्या एकाही नेत्याला याचे उत्तर देता आले नाही. मोदी लाटेचे कारण सांगून ते नामानिराळे होताना दिसतात. दिनकरतात्यांचा गाजावाजादिनकर पाटील यांनी लोकसभेला उघडपणे भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यावेळी पक्षातील अन्य पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर उघड आणि छुप्या पद्धतीने टीका केली. प्रदेश कार्यकारिणीकडेही तक्रारी केल्या. ज्यांनी लेखी आणि तोंडी स्वरुपात तक्रारी केल्या त्याच नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विधानसभेला छुप्या पद्धतीने पुन्हा दिनकर पाटील यांच्यासारखाच भाजपला पाठिंबा दिला. त्यांच्या कृतीचा गाजावाजा मात्र झाला नाही.