शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

राधामोहनना पदावर राहण्याचा अधिकार काय?

By admin | Updated: July 26, 2015 00:01 IST

अनिल देसाई यांची टीका : शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत मंत्र्यांचे वक्तव्य असंवेदनशील

सातारा : ‘केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी ‘प्रेम प्रकरणांमुळे शेतकरी आत्महत्या करतात,’ असे असंवेदनशील वक्तव्य केले असून, अशा व्यक्तीला पदावर राहण्याचा अधिकार काय?,’ असा सवाल शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी शनिवारी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केला. सातारा येथील पोवई नाक्यावर शिवसेनेचे जिल्हा कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे उपनेते आदेश बांदेकर, नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, नंदकुमार घाडगे उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्यावरून नवीन वाद उफाळला आहे. शिवसेना हा पक्ष राज्यामध्ये भाजपसोबत असला, तरी सरकार म्हणून एकत्र काम करतानाही भाजप नेत्यांवर शिवसेना नेते टीका करायला मागे-पुढे पाहत नाही. खा. अनिल देसाई यांनीही राधामोहन सिंग यांच्या वक्तव्याबाबत कोरडे ओढले. ते म्हणाले,‘राधामोहन सिंग यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत जी काय मुक्ताफळे उधळली आहेत, त्यावरून शेतकऱ्यांच्याबाबतीत त्यांच्या संवेदना काय आहेत, ते समजते. अशा असंवेदनशील व्यक्तीला पदावर राहण्याचा अधिकार काय? त्यांच्या पक्षाने त्यांच्याबाबत कठोर निर्णय घ्यावा. दरम्यान, शिवसेना स्वबळावर लढली आहे. शिवसेना सरकारसोबत असली, तरी आमची बांधीलकी लोकांसोबत आहे. लोकांना आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी शिवसेनेकडे एकहाती सत्ता हवी आहे. येथून पुढच्या काळात ते सर्वांना दिसून येईल.’ (प्रतिनिधी) आम्ही सरकारमध्ये आहोत, सरकारजमा नाही ‘शिवसेनेत कुठलाही कृत्रिमपणा नाही. लोकांच्या हितासाठी लढणारी संघटना म्हणूनच शिवसेनेकडे सामान्य जनतेने विश्वासाने कायमच पाहिले असून, आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकारजमा नाही,’ असे स्पष्टीकरण खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना कार्यकर्त्यांच्या शिबिरात केले.