शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

राधामोहनना पदावर राहण्याचा अधिकार काय?

By admin | Updated: July 26, 2015 00:01 IST

अनिल देसाई यांची टीका : शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत मंत्र्यांचे वक्तव्य असंवेदनशील

सातारा : ‘केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी ‘प्रेम प्रकरणांमुळे शेतकरी आत्महत्या करतात,’ असे असंवेदनशील वक्तव्य केले असून, अशा व्यक्तीला पदावर राहण्याचा अधिकार काय?,’ असा सवाल शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी शनिवारी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केला. सातारा येथील पोवई नाक्यावर शिवसेनेचे जिल्हा कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे उपनेते आदेश बांदेकर, नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, नंदकुमार घाडगे उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्यावरून नवीन वाद उफाळला आहे. शिवसेना हा पक्ष राज्यामध्ये भाजपसोबत असला, तरी सरकार म्हणून एकत्र काम करतानाही भाजप नेत्यांवर शिवसेना नेते टीका करायला मागे-पुढे पाहत नाही. खा. अनिल देसाई यांनीही राधामोहन सिंग यांच्या वक्तव्याबाबत कोरडे ओढले. ते म्हणाले,‘राधामोहन सिंग यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत जी काय मुक्ताफळे उधळली आहेत, त्यावरून शेतकऱ्यांच्याबाबतीत त्यांच्या संवेदना काय आहेत, ते समजते. अशा असंवेदनशील व्यक्तीला पदावर राहण्याचा अधिकार काय? त्यांच्या पक्षाने त्यांच्याबाबत कठोर निर्णय घ्यावा. दरम्यान, शिवसेना स्वबळावर लढली आहे. शिवसेना सरकारसोबत असली, तरी आमची बांधीलकी लोकांसोबत आहे. लोकांना आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी शिवसेनेकडे एकहाती सत्ता हवी आहे. येथून पुढच्या काळात ते सर्वांना दिसून येईल.’ (प्रतिनिधी) आम्ही सरकारमध्ये आहोत, सरकारजमा नाही ‘शिवसेनेत कुठलाही कृत्रिमपणा नाही. लोकांच्या हितासाठी लढणारी संघटना म्हणूनच शिवसेनेकडे सामान्य जनतेने विश्वासाने कायमच पाहिले असून, आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकारजमा नाही,’ असे स्पष्टीकरण खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना कार्यकर्त्यांच्या शिबिरात केले.