शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

राधामोहनना पदावर राहण्याचा अधिकार काय?

By admin | Updated: July 26, 2015 00:01 IST

अनिल देसाई यांची टीका : शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत मंत्र्यांचे वक्तव्य असंवेदनशील

सातारा : ‘केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी ‘प्रेम प्रकरणांमुळे शेतकरी आत्महत्या करतात,’ असे असंवेदनशील वक्तव्य केले असून, अशा व्यक्तीला पदावर राहण्याचा अधिकार काय?,’ असा सवाल शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी शनिवारी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केला. सातारा येथील पोवई नाक्यावर शिवसेनेचे जिल्हा कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे उपनेते आदेश बांदेकर, नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, नंदकुमार घाडगे उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्यावरून नवीन वाद उफाळला आहे. शिवसेना हा पक्ष राज्यामध्ये भाजपसोबत असला, तरी सरकार म्हणून एकत्र काम करतानाही भाजप नेत्यांवर शिवसेना नेते टीका करायला मागे-पुढे पाहत नाही. खा. अनिल देसाई यांनीही राधामोहन सिंग यांच्या वक्तव्याबाबत कोरडे ओढले. ते म्हणाले,‘राधामोहन सिंग यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत जी काय मुक्ताफळे उधळली आहेत, त्यावरून शेतकऱ्यांच्याबाबतीत त्यांच्या संवेदना काय आहेत, ते समजते. अशा असंवेदनशील व्यक्तीला पदावर राहण्याचा अधिकार काय? त्यांच्या पक्षाने त्यांच्याबाबत कठोर निर्णय घ्यावा. दरम्यान, शिवसेना स्वबळावर लढली आहे. शिवसेना सरकारसोबत असली, तरी आमची बांधीलकी लोकांसोबत आहे. लोकांना आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी शिवसेनेकडे एकहाती सत्ता हवी आहे. येथून पुढच्या काळात ते सर्वांना दिसून येईल.’ (प्रतिनिधी) आम्ही सरकारमध्ये आहोत, सरकारजमा नाही ‘शिवसेनेत कुठलाही कृत्रिमपणा नाही. लोकांच्या हितासाठी लढणारी संघटना म्हणूनच शिवसेनेकडे सामान्य जनतेने विश्वासाने कायमच पाहिले असून, आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकारजमा नाही,’ असे स्पष्टीकरण खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना कार्यकर्त्यांच्या शिबिरात केले.