शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

'लोकशाही'च्या चुप्पीमागे दडलंय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:35 IST

कऱ्हाड : अर्थसंकल्पाच्या विशेष सभेनंतर कऱ्हाड नगरपालिकेत राजकीय वातावरण भलतेच तापले आहे. सभेत झालेल्या गदारोळानंतर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, ...

कऱ्हाड : अर्थसंकल्पाच्या विशेष सभेनंतर कऱ्हाड नगरपालिकेत राजकीय वातावरण भलतेच तापले आहे. सभेत झालेल्या गदारोळानंतर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, आदींनी पत्रकार परिषद घेऊन जलशक्ती व लोकशाही आघाडीवर टीका करीत खरपूस समाचार घेतला. ‘जनशक्ती’चे गटनेते राजेंद्र यादव यांनीही पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले. मात्र ‘लोकशाही’चे गटनेते सौरभ पाटील यांनी यावर कोणतेच भाष्य केलेले नाही. लोकशाहीच्या या चुप्पीमागे नेमकं दडलंय तरी काय? अशी चर्चा शहरात सुरू आहे.

कऱ्हाड नगरपरिषदेची अर्थसंकल्पीय सभा नुकतीच झाली. भाजप नगरसेवकाने सूचना वाचल्यानंतर लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे कऱ्हाडकरांच्या डोळ्यात धूळफेक असल्याची टीका केली. शहराच्या विकासासाठी गट तट न पाहता निधी आणला पाहिजे; पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे कऱ्हाडचेच आहेत. त्यांच्याकडेही आपण निधीसाठी पाठपुरावा केला पाहिजे; असे सांगत त्यांनी काही प्रश्नही सत्ताधाऱ्यांसमोर उपस्थित केले. मात्र, उत्तर कोणी द्यायचे हा प्रश्न समोर आल्यावर ज्यांनी सूचना वाचली, तेच उत्तर देतील, असा पवित्रा जनशक्ती आघाडीने घेतला. सभागृहात बहुमताचा आदर व्हायला हवा; भाजप वेगळा पायंडा पाडत आहे, अशी टीका राजेंद्र यादव यांनी केली आणि गदारोळास सुरुवात झाली.

सूचना की उपसूचना मंजूर यावरून सध्या कऱ्हाडचा अर्थसंकल्प कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. मात्र, दुसरीकडे नगरसेवक एकमेकांवर टीका करण्यात ‘मेहरबान’ होत आहेत. नगराध्यक्ष शिंदे व ज्येष्ठ नगरसेवक पावस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन जनशक्तीने आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी सभागृहांमध्ये गदारोळ केल्याची टीका केली. अर्थसंकल्पातील विषय थेट विशेष सभेत येत नाहीत? स्थायी समितीतच त्यावर चर्चा होते. तेथे जनशक्तीचेच बहुमत आहे; आणि लोकशाही आघाडीलाही प्रतिनिधित्व आहे. मग हे लोक तेथे का बोलत नाहीत? असा सवाल करीत स्थायीच्या बैठकीला फक्त चहा प्यायला जाता का? असे पावसकर म्हणाले. तर पालकमंत्र्यांचे बालक आताच विकासकामांसाठी जागे कसे झाले, अशी टीका नगराध्यक्षा शिंदे यांनी सौरभ पाटील यांच्यावर केली. त्यामुळे पालिकेतील वातावरण आणखी तापले आहे.

प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी पत्रकार परिषद घेत नगराध्यक्षांसह त्यांच्या चमूवर हल्ला चढविला. यांना शहराच्या विकासाशी काहीही देणेघेणे नाही. यांचे लक्ष फक्त टक्केवारीवर असल्याची टीका त्यांनी केली. परिणामी या आरोप-प्रत्यारोपांची उलटसुलट चर्चा शहरात सुरू आहे.

भाजप व जनशक्ती आघाडीत हा कलगीतुरा सुरू असताना लोकशाही आघाडी मात्र चुप्पी बाळगून आहे. तेही आरोपांचे खंडन करतील किंवा टीका करणाऱ्यांवर सडेतोड हल्ला चढवतील असे वाटत होते; मात्र त्यांनी मौनच राखले आहे. नजीकच्या काळातही ते काही बोलतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळे नगराध्यक्षा व त्यांच्या चमूने लोकशाही आघाडीवर केलेली टीका त्यांना मान्य आहे म्हणायचं की ते त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत हे समजायला सध्यातरी मार्ग नाही; पण लोकशाहीच्या चुप्पीमागे नेमकं दडलंय काय? याचीही चर्चा शहरभर सुरू आहे.

चौकट :

ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांनी कऱ्हाड पालिकेचे नगराध्यक्ष म्हणून चाळीस वर्षे कारभार पाहिला आहे. त्यांचे राजकीय वारसदार म्हणून मंत्री बाळासाहेब पाटील काम करीत आहेत. या दोघांनी राजकारणात नेहमीच संयम ठेवल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या कुटुंबातील सौरभ पाटील हे सध्या पालिकेत लोकशाही आघाडीचे नेतृत्व करतात. त्यामुळे तेही टीका होऊनही संयम राखून आहेत असेच म्हणावे लागेल.

फोटो :

6 सौरभ पाटील 01