शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन काय असते रे भाऊ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST

सातारा : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जे अधिकारी व कर्मचारी नेमले जातात, त्यांना मानधनच मिळत नसल्याचे चित्र आहे. ग्रामविकास विभागाने दिलेल्या ...

सातारा : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जे अधिकारी व कर्मचारी नेमले जातात, त्यांना मानधनच मिळत नसल्याचे चित्र आहे. ग्रामविकास विभागाने दिलेल्या अल्प निधीमध्येच काटकसर करुन महसूल विभागाला खर्च करावा लागतो, त्यात कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन काय असते रे भाऊ! असा प्रश्न पडतोय.

सातारा जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. यासाठी जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व शिक्षक असे कर्मचारी यांना सेवेत घेण्यात आले होते. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत निवडणुकीसाठी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने तत्काळ मानधनाचे वाटप केले जाते, त्या पद्धतीने ग्रामपंचायत निवडणुकीत होत नाही. कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा लागते.

ग्रामविकास विभागाने सातारा जिल्ह्यातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींसाठी प्रत्येकी १0 हजार रुपये निधी खर्चासाठी महसूल विभागाला दिला. निवडणुकीत खर्च करताना प्राधान्य ठरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वाहतूक, स्टेशनरी, मतदान साहित्य, यासाठी खर्च करण्यावर भर दिला जातो. आता कोविडमुळे ऑक्सिमिटर, सॅनिटायझर, मास्क याचा खर्च वाढलेला आहे. मिळालेल्या निधीतूनच महसूल विभागाने काटकसर करुन हा खर्च भागवला आहे. मात्र निवडणुकीतील कर्मचाऱ्यांना कोणतेही मानधन मिळालेले नाही. एवढंच काय तर यापूर्वी झालेल्या निवडणुकीतील मानधनही कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही.

जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती : ८७८

किती केंद्रांवर झाली निवडणूक

२०३८

अधिकारी किती

२७६०

कर्मचारी किती

१७४२९

मानधनच ठरलेले नाही

ग्रामपंचायत निवडणुकीत कर्मचाऱ्यांना किती मानधन द्यायचे, याबाबतचा निर्णय तहसील स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार असले तरी मानधन मिळेलच याची या कर्मचाऱ्यांना खात्री नाही.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा कोट

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामविकास विभागाकडून जो निधी मिळतो. त्यातून प्राधान्याने वाहतूक, प्रिंटिंंग, स्टेशनरी, मतदान साहित्य यासाठी खर्च करण्यावर प्राधान्य दिले जाते. उपलब्ध निधीव्यतिरिक्त आणखी निधी मिळाला तरच कर्मचाऱ्यांना मानधन देता येईल.

- कीर्ती नलावडे, निवडणूक निर्णय अधिकारी

चौकट..

मागील निवडणुकीतील मानधनच नाही

मागील ग्रामपंचायत निवडणुकीत शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षकांना सामावून घेण्यात आले होते. मात्र त्यांना कुठल्याही पद्धतीचे मानधन देण्यात आलेले नाही.

चौकट..

केवळ विधानसभा, लोकसभेलाच मिळाले

ग्रामपंचायत निवडणुकीत अधिकारी कर्मचाऱ्यांना मानधन मिळाले नसले तरी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधासभा व लोकसभा निवडणुकीत मानधन दिले जाते. मतदान अथवा मतमोजणी झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना तत्काळ मानधनाचे वाटप केले जाते.

फोटो सेव आहेत.

25 रेम्युनरेशन इलेक्शन वर्क