शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

‘बाबां’च्या मनात काय?

By admin | Updated: July 7, 2014 23:06 IST

होणार का स्वारी ‘दक्षिणे’वरी ! : होमपिचवर सुरू राजकीय खलबते

कऱ्हाड : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय. या आखाड्यात उतरण्याची अनेकांनी तयारी चालविलीय. कऱ्हाड दक्षिणेवर तर अनेकांच्या जोर बैठका सुरू आहेत; पण यंदा दक्षिणेत ‘पृथ्वीराज’ अवतरणार का? याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र याबाबत कोणतेच भाष्य न केल्याने या बाबांच्या मनात नक्की काय चाललंय काय? असाच प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडलाय !दिल्लीत रमलेल्या पृथ्वीराज चव्हाणांवर तीन वर्षांपर्वी अनपेक्षितपणे राज्याची जबाबदारी पडली. महाराष्ट्रात सहा महिनेही ते टिकणार नाहीत, अशा वल्गना सुरुवातीला होत होत्या; पण त्यांनी त्या खोट्या ठरविल्या. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चव्हाणांची खुर्ची अस्थिर झाली खरी; पण दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने त्याला पुन्हा बळकटी आली. त्यांच्याविरोधात बंड करणारेही आज थंडोबा झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार, असे मानले जाते. विधानसभा निवडणुकीचा आजवरचा इतिहास पाहता ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या आहेत, त्यांनी स्वत: विधानसभेची निवडणूक लढविली आहे. तसा तो अलिखित नियमच मानला जातो. हाच नियम पृथ्वीराज चव्हाणांना लागू धरला तर त्यांनी कुठल्यातरी मतदार संघातून लढणे अपेक्षित आहे. मग ते आपल्या ‘होमपिच’ला प्राधान्य देणार का? हा चर्चेचाच विषय बनलाय. कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला! पण मुख्यमंत्र्यांचे पक्षाअंतर्गत विरोधक असणाऱ्या उंडाळकरांकडे या गडाच्या चाव्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर मात्र त्यांनी मतदारसंघाची विकासकामांच्या माध्यमातून चांगलीच राजकीय ‘डागडुजी’ केली आहे. त्यांची ही डागडुजी पाहता ते दक्षिणेतून लढतील, अशी अटकळ बांधली जात आहे. मध्यंतरी मुंबईत पत्रकारांनी चव्हाणांना याबाबत छेडले होते. ‘तुम्ही विधानसभा लढणार का?’ असा सवाल पत्रकारांनी केला होता. त्यावर केवळ ‘बघू’ असे संदिग्ध उत्तर त्यांनी दिले होते. तर साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना ‘मी दक्षिणेतून लढणार असल्याचे म्हटले नाही,’ असही त्यांनी स्पष्ट केले होते; पण ‘मी दक्षिणेतून लढणारच किंवा लढणारच नाही,’ असे कुठलेही अधिकृत भाष्य त्यांनी आजअखेर केलेले नसल्याने ‘बाबांच्या मनात काय चाललंय काय?’ असा संभ्रम कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तो संभ्रम लवकरच दूर करतील, अशी साऱ्यांची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)