शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

‘बाबां’च्या मनात काय?

By admin | Updated: July 7, 2014 23:06 IST

होणार का स्वारी ‘दक्षिणे’वरी ! : होमपिचवर सुरू राजकीय खलबते

कऱ्हाड : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय. या आखाड्यात उतरण्याची अनेकांनी तयारी चालविलीय. कऱ्हाड दक्षिणेवर तर अनेकांच्या जोर बैठका सुरू आहेत; पण यंदा दक्षिणेत ‘पृथ्वीराज’ अवतरणार का? याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र याबाबत कोणतेच भाष्य न केल्याने या बाबांच्या मनात नक्की काय चाललंय काय? असाच प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडलाय !दिल्लीत रमलेल्या पृथ्वीराज चव्हाणांवर तीन वर्षांपर्वी अनपेक्षितपणे राज्याची जबाबदारी पडली. महाराष्ट्रात सहा महिनेही ते टिकणार नाहीत, अशा वल्गना सुरुवातीला होत होत्या; पण त्यांनी त्या खोट्या ठरविल्या. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर चव्हाणांची खुर्ची अस्थिर झाली खरी; पण दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने त्याला पुन्हा बळकटी आली. त्यांच्याविरोधात बंड करणारेही आज थंडोबा झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार, असे मानले जाते. विधानसभा निवडणुकीचा आजवरचा इतिहास पाहता ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या आहेत, त्यांनी स्वत: विधानसभेची निवडणूक लढविली आहे. तसा तो अलिखित नियमच मानला जातो. हाच नियम पृथ्वीराज चव्हाणांना लागू धरला तर त्यांनी कुठल्यातरी मतदार संघातून लढणे अपेक्षित आहे. मग ते आपल्या ‘होमपिच’ला प्राधान्य देणार का? हा चर्चेचाच विषय बनलाय. कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला! पण मुख्यमंत्र्यांचे पक्षाअंतर्गत विरोधक असणाऱ्या उंडाळकरांकडे या गडाच्या चाव्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर मात्र त्यांनी मतदारसंघाची विकासकामांच्या माध्यमातून चांगलीच राजकीय ‘डागडुजी’ केली आहे. त्यांची ही डागडुजी पाहता ते दक्षिणेतून लढतील, अशी अटकळ बांधली जात आहे. मध्यंतरी मुंबईत पत्रकारांनी चव्हाणांना याबाबत छेडले होते. ‘तुम्ही विधानसभा लढणार का?’ असा सवाल पत्रकारांनी केला होता. त्यावर केवळ ‘बघू’ असे संदिग्ध उत्तर त्यांनी दिले होते. तर साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना ‘मी दक्षिणेतून लढणार असल्याचे म्हटले नाही,’ असही त्यांनी स्पष्ट केले होते; पण ‘मी दक्षिणेतून लढणारच किंवा लढणारच नाही,’ असे कुठलेही अधिकृत भाष्य त्यांनी आजअखेर केलेले नसल्याने ‘बाबांच्या मनात काय चाललंय काय?’ असा संभ्रम कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तो संभ्रम लवकरच दूर करतील, अशी साऱ्यांची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)