शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

अडीच वर्षात कऱ्हाडचा काय विकास झाला?

By admin | Updated: January 29, 2017 22:42 IST

रावसाहेब दानवे : कार्वेतील भाजपच्या सभेत पृथ्वीराज चव्हाणांवर टीका; पक्षावर आरोप करण्याचा अधिकार नाही

कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिणेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडून आल्यापासून काय विकास केला? या भागातील जनतेचे अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत. ज्या लोकांनी निवडून दिले त्यांना भेटण्यासाठीही साधा यांच्याकडे वेळ नाही. सत्ता असूनही या भागाचा विकास करता आला नाही. राज्यात आघाडी सरकारमध्ये असताना त्यांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला. त्यामुळे त्यांना जनतेने नाकारले,’ असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची कार्वे, ता. कऱ्हाड येथे रविवारी दुपारी प्रचार प्रारंभ सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपच्या उपाध्यक्षा नीता केळकर, कृष्णा सहकारी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम माळी, स्वप्नील भिंगारदेवे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, प्रांतिक सदस्य अ‍ॅड. भरत पाटील, राजाभाऊ देशपांडे, पै. आनंदराव मोहिते, जगदीश जगताप, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, बाजार समिती माजी सभापती पै. शिवाजीराव जाधव, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले, ‘राज्यात नगरपालिका निवडणुकातील यशानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडणूक आणण्यासाठी पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कऱ्हाडसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या तालुक्यात आजवर काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. त्याकाळी पृथ्वीराज चव्हाण यांनी या भागाचा काय विकास केला, हे दाखवून द्यावे. मुख्यमंत्री पदावर असताना त्यांना सत्तर हजार कोटी रुपये खर्च करूनही राज्यातील शेती भिजविता आली नाही. चोवीस टीएमसी पाणी अडविण्यासाठी काँगे्रस-राष्ट्रवादीला आठ वर्षे लागली. ते पाणी भाजपने एका वर्षात अडवून दाखवले. भाजपला शेतीतले कळत नाही. हा जातीयवादी पक्ष आहे, असा राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने सगळीकडे अपप्रचार पसरविला जातोय. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ सबका विकास’च्या माध्यमातून सर्व धर्मातील लोकांचा विकास केला आहे. सर्वच क्षेत्रात विकासाच्या कामांना सुरुवात केली आहे. उलट ६८ वर्षांत जे काँगे्रस राष्ट्रवादीला जमले नाही ते दोन वर्षांत भाजपाने करून दाखवले. त्यामुळे भाजपावर जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही.’ असेही यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले.डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘साडेतीन वर्षे येथील लोक अन्याय सहन करत आले आहेत. मात्र, आता हे सहन केले जाणार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी आमच्याकडे पुन्हा बघणार नाहीत, असे मतदान करा. पूर्वीच्या राजकारणाला आता लोक कंटाळले आहेत.’यावेळी डॉ. अतुल भोसले, पै. शिवाजीराव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. निवासराव थोरात यांनी प्रास्ताविक केले. जगदीश जगताप यांनी आभार मानले. सभेस कार्वे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुनील जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)