शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

अडीच वर्षात कऱ्हाडचा काय विकास झाला?

By admin | Updated: January 29, 2017 22:42 IST

रावसाहेब दानवे : कार्वेतील भाजपच्या सभेत पृथ्वीराज चव्हाणांवर टीका; पक्षावर आरोप करण्याचा अधिकार नाही

कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिणेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडून आल्यापासून काय विकास केला? या भागातील जनतेचे अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत. ज्या लोकांनी निवडून दिले त्यांना भेटण्यासाठीही साधा यांच्याकडे वेळ नाही. सत्ता असूनही या भागाचा विकास करता आला नाही. राज्यात आघाडी सरकारमध्ये असताना त्यांनी सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला. त्यामुळे त्यांना जनतेने नाकारले,’ असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची कार्वे, ता. कऱ्हाड येथे रविवारी दुपारी प्रचार प्रारंभ सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपच्या उपाध्यक्षा नीता केळकर, कृष्णा सहकारी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम माळी, स्वप्नील भिंगारदेवे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, प्रांतिक सदस्य अ‍ॅड. भरत पाटील, राजाभाऊ देशपांडे, पै. आनंदराव मोहिते, जगदीश जगताप, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, बाजार समिती माजी सभापती पै. शिवाजीराव जाधव, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले, ‘राज्यात नगरपालिका निवडणुकातील यशानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडणूक आणण्यासाठी पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कऱ्हाडसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या तालुक्यात आजवर काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. त्याकाळी पृथ्वीराज चव्हाण यांनी या भागाचा काय विकास केला, हे दाखवून द्यावे. मुख्यमंत्री पदावर असताना त्यांना सत्तर हजार कोटी रुपये खर्च करूनही राज्यातील शेती भिजविता आली नाही. चोवीस टीएमसी पाणी अडविण्यासाठी काँगे्रस-राष्ट्रवादीला आठ वर्षे लागली. ते पाणी भाजपने एका वर्षात अडवून दाखवले. भाजपला शेतीतले कळत नाही. हा जातीयवादी पक्ष आहे, असा राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने सगळीकडे अपप्रचार पसरविला जातोय. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ सबका विकास’च्या माध्यमातून सर्व धर्मातील लोकांचा विकास केला आहे. सर्वच क्षेत्रात विकासाच्या कामांना सुरुवात केली आहे. उलट ६८ वर्षांत जे काँगे्रस राष्ट्रवादीला जमले नाही ते दोन वर्षांत भाजपाने करून दाखवले. त्यामुळे भाजपावर जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही.’ असेही यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले.डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘साडेतीन वर्षे येथील लोक अन्याय सहन करत आले आहेत. मात्र, आता हे सहन केले जाणार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी आमच्याकडे पुन्हा बघणार नाहीत, असे मतदान करा. पूर्वीच्या राजकारणाला आता लोक कंटाळले आहेत.’यावेळी डॉ. अतुल भोसले, पै. शिवाजीराव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. निवासराव थोरात यांनी प्रास्ताविक केले. जगदीश जगताप यांनी आभार मानले. सभेस कार्वे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुनील जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)