शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

नियुक्त आमदारांवर काय कारवाई केली?

By admin | Updated: October 25, 2014 23:45 IST

राष्ट्रपतींकडून विचारणा : याचिकाकर्त्याला तत्काळ माहिती देण्याचे मुख्य सचिवांना आदेश

सातारा : राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या निवडी रद्द करण्याच्या मागणीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आत्तापर्यंत राज्य शासन म्हणून आपण काय कारवाई केली, त्याची माहिती सातारा येथील याचिकाकर्त्याला तत्काळ देण्याचे आदेश राष्ट्रपती कार्यालयाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. ‘भारतीय राज्यघटनेच्या कलम १७१ अन्वये महाराष्ट्र विधानपरिषदेत बारा आमदारांची नियुक्ती राज्यपाल करतात. मात्र, या निवडी करताना घटनेतील तरतुदींचे उल्लंघन झाले असून, त्या रद्द कराव्यात,’ अशा आशयाची याचिका सातारा येथील सुशांत मोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत म्हटले होते की, ‘घटनेतील तरतुदीप्रमाणे साहित्य, कला, विज्ञान, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या योग्य व्यक्तींची निवड राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून केली जाते. मात्र, तत्कालीन राज्यपालांनी संबंधित नियुक्त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या लेखी पत्राच्या आधारे केल्या आहेत. सुशांत मोरे यांनी या याचिकेची एक प्रत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही पाठविली होती. ‘आपण त्यावर योग्य ती कारवाई करावी,’ अशी विनंतीही केली होती. त्यानुसार राष्ट्रपतींच्या कार्यालयातून महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना लेखी पत्र गेले असून, या कारवाईची माहिती तत्काळ राष्ट्रपती आणि याचिकाकर्त्याला देण्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुढील सुनावणीवेळी राष्ट्रपतींच्या आदेशाची प्रत न्यायालयात सादर करणार असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. मोरे यांच्या वतीने अ‍ॅड. एस. आर. बुरलकर, अ‍ॅड. विनायक पाटील, अ‍ॅड. रणजित आडे, अ‍ॅड. राजेश तोडकर काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)याचिकाकर्त्याशी संपर्क साधामुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची एक प्रत सुशांत मोरे यांनी दि. २ जून २0१४ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठविली होती. त्यानुसार ‘या याचिकेवर राज्य सरकारच्या मुख्य सचिवांनी काय कारवाई केली, याची माहिती याचिकाकर्ता आणि राष्ट्रपतींना कळविण्यात यावी. त्याचबरोबर या प्रकरणाबाबत आपणास अन्य काही माहिती हवी असल्यास याचिकाकर्ता मोरे यांच्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधावा,’ असेही राष्ट्रपतींच्या कार्यालयीन आदेशात म्हटले आहे.‘त्या’ आमदारांचे कार्य घटनेतील तरतुदीप्रमाणे नाही !‘राहुल नार्वेकर, रामराव वरकुडे, प्रकाश गजभिये, श्रीमती ख्वाजा बेग, विद्या चव्हाण, जगन्नाथ शिंदे, हुस्न बानू खलिफे, रामहरी रूपनवर, आनंदराव पाटील, जनार्दन चांदूरकर, अनंत गाडगीळ, जोगेंद्र कवाडे ही सर्व मंडळी राजकीय स्वरूपाच्या व्यक्ती आहेत आणि घटनेतील तरतुदीप्रमाणे त्यांचे भरीव कार्यदेखील नाही,’ असा आक्षेप मोरे यांनी घेतला आहे.