शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

नियुक्त आमदारांवर काय कारवाई केली?

By admin | Updated: October 25, 2014 23:45 IST

राष्ट्रपतींकडून विचारणा : याचिकाकर्त्याला तत्काळ माहिती देण्याचे मुख्य सचिवांना आदेश

सातारा : राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या निवडी रद्द करण्याच्या मागणीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आत्तापर्यंत राज्य शासन म्हणून आपण काय कारवाई केली, त्याची माहिती सातारा येथील याचिकाकर्त्याला तत्काळ देण्याचे आदेश राष्ट्रपती कार्यालयाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. ‘भारतीय राज्यघटनेच्या कलम १७१ अन्वये महाराष्ट्र विधानपरिषदेत बारा आमदारांची नियुक्ती राज्यपाल करतात. मात्र, या निवडी करताना घटनेतील तरतुदींचे उल्लंघन झाले असून, त्या रद्द कराव्यात,’ अशा आशयाची याचिका सातारा येथील सुशांत मोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत म्हटले होते की, ‘घटनेतील तरतुदीप्रमाणे साहित्य, कला, विज्ञान, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या योग्य व्यक्तींची निवड राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून केली जाते. मात्र, तत्कालीन राज्यपालांनी संबंधित नियुक्त्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या लेखी पत्राच्या आधारे केल्या आहेत. सुशांत मोरे यांनी या याचिकेची एक प्रत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही पाठविली होती. ‘आपण त्यावर योग्य ती कारवाई करावी,’ अशी विनंतीही केली होती. त्यानुसार राष्ट्रपतींच्या कार्यालयातून महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना लेखी पत्र गेले असून, या कारवाईची माहिती तत्काळ राष्ट्रपती आणि याचिकाकर्त्याला देण्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुढील सुनावणीवेळी राष्ट्रपतींच्या आदेशाची प्रत न्यायालयात सादर करणार असल्याचे मोरे यांनी म्हटले आहे. मोरे यांच्या वतीने अ‍ॅड. एस. आर. बुरलकर, अ‍ॅड. विनायक पाटील, अ‍ॅड. रणजित आडे, अ‍ॅड. राजेश तोडकर काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)याचिकाकर्त्याशी संपर्क साधामुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेची एक प्रत सुशांत मोरे यांनी दि. २ जून २0१४ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठविली होती. त्यानुसार ‘या याचिकेवर राज्य सरकारच्या मुख्य सचिवांनी काय कारवाई केली, याची माहिती याचिकाकर्ता आणि राष्ट्रपतींना कळविण्यात यावी. त्याचबरोबर या प्रकरणाबाबत आपणास अन्य काही माहिती हवी असल्यास याचिकाकर्ता मोरे यांच्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधावा,’ असेही राष्ट्रपतींच्या कार्यालयीन आदेशात म्हटले आहे.‘त्या’ आमदारांचे कार्य घटनेतील तरतुदीप्रमाणे नाही !‘राहुल नार्वेकर, रामराव वरकुडे, प्रकाश गजभिये, श्रीमती ख्वाजा बेग, विद्या चव्हाण, जगन्नाथ शिंदे, हुस्न बानू खलिफे, रामहरी रूपनवर, आनंदराव पाटील, जनार्दन चांदूरकर, अनंत गाडगीळ, जोगेंद्र कवाडे ही सर्व मंडळी राजकीय स्वरूपाच्या व्यक्ती आहेत आणि घटनेतील तरतुदीप्रमाणे त्यांचे भरीव कार्यदेखील नाही,’ असा आक्षेप मोरे यांनी घेतला आहे.