शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील वेशींवर खड्डे करताहेत स्वागत!

By admin | Updated: July 18, 2016 00:28 IST

प्रशासनाची लक्तरे टांगणीला : साध्या पावसानंच डांबर गेलं वाहून; पाठदुखीनं वाहनचालक बेजार

सातारा : कोणत्याही गावाची भव्यता, आदर्श प्रशासन, गुणवंत लोकप्रतिनिधींची चुणूक वेशीवरच घडत असते. सातारकर मात्र याबाबतीत दुर्दैवी आहेत. महामार्गावरून कोणत्याही चौकातून शहरात प्रवेश केले तरी भले मोठे खड्डे स्वागतला आहेत. त्यामुळे एसटी परजिल्ह्यातील लोकांच्या तोंडून रस्त्याची लायकी काढताना ऐकावे लागत आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा हे मध्यवर्ती ठिकाणाचे महत्त्वाचे शहर आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर, बारामती, मराठवाड्यात जाण्यासाठी सातारा शहरातूनच जावे लागते. सातारा हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या एसटी व खासगी वाहने शहरात येतात. त्यामुळे मोठ्या शहरातील लोकांची साताऱ्याशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. कोल्हापूरहून आलेल्या गाड्या अजंठा चौकातून, रहिमतपूर, विटा येथून येणारे कोडोली, बारामती, सोलापूर, कोरेगावकडून येणारी वाहने बॉम्बे रेस्टॉरंट, लोणंदकडून येणारी वाहने वाढे फाटा, तसेच पुण्याकडून येणारे सैदापूर येथून सातारा शहरात प्रवेश करतात. या चौकांमधील बहुतांश ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. एक खड्डा चुकवला तर दुसऱ्या खड्ड्यांमधून जावे लागत आहे. त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. साहजिकच या परिसरात वाहने आल्यावर वाहन चालकांमधून असंतोष व्यक्त होत असतो. वाहनांचे नुकसान झाल्यास आर्थिक झळ बसतो. मात्र, एसटीत पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशांचे कंबरडे मोडून निघते. त्यातून पाठीमागे ज्येष्ठ नागरिक बसलेले असतील तर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न किती गंभीर होत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. उखडलेल्या रस्त्यांकडे प्रशासनाने लक्ष देऊन खड्डे तत्काळ मुजवून घ्यावेत, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)