शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

हत्तीवरून साखर वाटून मुलीच्या जन्माचे स्वागत

By admin | Updated: March 10, 2017 21:47 IST

बागणीतील ग्रामस्थांचा सलाम : कदम-सुखटणकर कुटुंबियांकडून मुलींना नाकारणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन

 बागणी : माणुसकीला काळीमा फासणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूण हत्याकांडामुळे एकीकडे सांगली जिल्हा हादरला असताना, बागणी (ता. वाळवा) येथे मुलीच्या जन्माचे स्वागत हत्तीवरून साखर वाटून करण्यात आले. याद्वारे मुलीचा जन्म नाकारणाऱ्यांच्या डोळ्यात येथील कदम-सुखटणकर कुटुंबियांनी झणझणीत अंजनच घातले आहे. वाळवा तालुक्यातील बागणी हे वारणा नदीकाठावरील पुरोगामी विचारसरणीचे गाव आहे. येथील सुनील सुखटणकर यांची कन्या रूपाली यांचा विवाह सांगलीतील अवधूत कदम यांच्याशी झाला असून, अवधूत सांगलीतील खासगी कंपनीत नोकरी करतात. अवधूत-रूपाली या दाम्पत्याला २२ जानेवारीरोजी कन्यारत्न झाले. तिच्या जन्माच्या आनंदाने सर्व कु टुंबीय भारावले. तिच्या नामकरणाचा (बारशाचा) कार्यक्रम बागणी येथे रूपाली यांच्या माहेरी गुरुवारी (९ मार्च) आयोजित केला होता. कन्येचे नाव ‘दुर्वा’ ठेवण्यात आले. बारशावेळी कदम आणि सुखटणकर कुटुंबियांनी संपूर्ण गावात हत्तीवरून साखर वाटून ‘दुर्वा’च्या जन्माचे स्वागत केले. कोल्हापूर जिल्'ातील उदगाव (ता. शिरोळ) येथील जैन बस्तीमधील हत्ती मागविण्यात आला होता. या हत्तीवरून संपूर्ण गावात ५१ किलो साखरेचे वाटप करण्यात आले. म्हैसाळ येथील भ्रूण हत्याकांडामुळे जिल्हा हादरला असताना, मुलीच्या जन्माचे स्वागत हत्तीवरून साखर वाटून करून कदम-सुखटणकर कुटुंबीयांनी मुलीचा जन्म नाकारणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजनच घातले आहे. याबाबत अवधूत कदम ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, गावात मुलीच्या बारशावेळी हत्तीवरून साखर वाटून प्रबोधनाचा थोडासा प्रयत्न केला आहे. मुलीचा जन्म नाकारणे, स्त्री भ्रूणहत्या करणे ही निषेधार्ह गोष्ट आहे. ती करणाऱ्या सर्वांना कायद्याप्रमाणे शिक्षा झालीच पाहिजे. गर्भलिंग परीक्षण करणाऱ्या डॉक्टरांवर सरकारने केलेल्या कारवाया केवळ सोपस्कार वाटतात. यामध्ये लिंगनिदान करणारा व भ्रूणहत्या करणारा वैद्यकीय व्यावसायिक दोषी आहेतच, परंतु मुलगाच पाहिजे, असा हट्ट धरणारा पती, तथाकथित वंशावळीची शृंखला पुढे चालूच राहावी यासाठी वंशाच्या दिव्याचा आग्रह धरणारे विवाहितेचे सासू-सासरे आणि इतर नातलग हे सारेच कायद्यापुढे आणि माणुसकीच्यादृष्टीने अपराधी आहेत. त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. (वार्ताहर) पेढ्यांना फाटा बागणी परिसरात आजवर मुलाच्या जन्माच्या निमित्ताने पेढे वाटले जायचे.

पेढ्यांना फाटा देत मुबलक ऊस पिकवणाऱ्या या गावात कदम-सुखटणकर परिवाराने ‘दुर्वा’च्या स्वागतानिमित्त पहिल्यांदाच हत्तीवरून साखर वाटली.