शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीवरून साखर वाटून मुलीच्या जन्माचे स्वागत

By admin | Updated: March 10, 2017 21:47 IST

बागणीतील ग्रामस्थांचा सलाम : कदम-सुखटणकर कुटुंबियांकडून मुलींना नाकारणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन

 बागणी : माणुसकीला काळीमा फासणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूण हत्याकांडामुळे एकीकडे सांगली जिल्हा हादरला असताना, बागणी (ता. वाळवा) येथे मुलीच्या जन्माचे स्वागत हत्तीवरून साखर वाटून करण्यात आले. याद्वारे मुलीचा जन्म नाकारणाऱ्यांच्या डोळ्यात येथील कदम-सुखटणकर कुटुंबियांनी झणझणीत अंजनच घातले आहे. वाळवा तालुक्यातील बागणी हे वारणा नदीकाठावरील पुरोगामी विचारसरणीचे गाव आहे. येथील सुनील सुखटणकर यांची कन्या रूपाली यांचा विवाह सांगलीतील अवधूत कदम यांच्याशी झाला असून, अवधूत सांगलीतील खासगी कंपनीत नोकरी करतात. अवधूत-रूपाली या दाम्पत्याला २२ जानेवारीरोजी कन्यारत्न झाले. तिच्या जन्माच्या आनंदाने सर्व कु टुंबीय भारावले. तिच्या नामकरणाचा (बारशाचा) कार्यक्रम बागणी येथे रूपाली यांच्या माहेरी गुरुवारी (९ मार्च) आयोजित केला होता. कन्येचे नाव ‘दुर्वा’ ठेवण्यात आले. बारशावेळी कदम आणि सुखटणकर कुटुंबियांनी संपूर्ण गावात हत्तीवरून साखर वाटून ‘दुर्वा’च्या जन्माचे स्वागत केले. कोल्हापूर जिल्'ातील उदगाव (ता. शिरोळ) येथील जैन बस्तीमधील हत्ती मागविण्यात आला होता. या हत्तीवरून संपूर्ण गावात ५१ किलो साखरेचे वाटप करण्यात आले. म्हैसाळ येथील भ्रूण हत्याकांडामुळे जिल्हा हादरला असताना, मुलीच्या जन्माचे स्वागत हत्तीवरून साखर वाटून करून कदम-सुखटणकर कुटुंबीयांनी मुलीचा जन्म नाकारणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजनच घातले आहे. याबाबत अवधूत कदम ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, गावात मुलीच्या बारशावेळी हत्तीवरून साखर वाटून प्रबोधनाचा थोडासा प्रयत्न केला आहे. मुलीचा जन्म नाकारणे, स्त्री भ्रूणहत्या करणे ही निषेधार्ह गोष्ट आहे. ती करणाऱ्या सर्वांना कायद्याप्रमाणे शिक्षा झालीच पाहिजे. गर्भलिंग परीक्षण करणाऱ्या डॉक्टरांवर सरकारने केलेल्या कारवाया केवळ सोपस्कार वाटतात. यामध्ये लिंगनिदान करणारा व भ्रूणहत्या करणारा वैद्यकीय व्यावसायिक दोषी आहेतच, परंतु मुलगाच पाहिजे, असा हट्ट धरणारा पती, तथाकथित वंशावळीची शृंखला पुढे चालूच राहावी यासाठी वंशाच्या दिव्याचा आग्रह धरणारे विवाहितेचे सासू-सासरे आणि इतर नातलग हे सारेच कायद्यापुढे आणि माणुसकीच्यादृष्टीने अपराधी आहेत. त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. (वार्ताहर) पेढ्यांना फाटा बागणी परिसरात आजवर मुलाच्या जन्माच्या निमित्ताने पेढे वाटले जायचे.

पेढ्यांना फाटा देत मुबलक ऊस पिकवणाऱ्या या गावात कदम-सुखटणकर परिवाराने ‘दुर्वा’च्या स्वागतानिमित्त पहिल्यांदाच हत्तीवरून साखर वाटली.