शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पर्यावरण दिनाच्या आठवड्यातच जावळीत बेसुमार वृक्षतोड

By admin | Updated: June 10, 2017 13:41 IST

जिल्हा परिषद सदस्यांच्या गावातील घटना: संबंधितांवर कारवाई ची रिपाइं ची मागणी

आॅनलाईन लोकमतसायगाव (जि. सातारा), दि. १0 : एकीकडे सर्वत्र जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शासकीय पातळीवर अधिकारी-पदाधिकाऱ्यांना घेऊन वृक्षलागवडीचा कार्यक्रम करीत आहेत. तर दुसरीकडे जावळी तालुक्यात कुसुंबी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे यांच्या आंबेघर गावातच पर्यावरण दिनाच्या आठवड्यातच बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. ही बाब गंभीर असून संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी रिपाइं श्रमिक बिग्रेड ने निवेदनाद्वारे केली आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जूनच्या पहिल्या आठवड्यात जावळीत ठिकठिकाणी अधिकारी-पदाधिकारी यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात वृक्षलगवाडीचे कार्यक्रम पार पडले.तर ज्या पदाधिक?्यांकडून वृक्ष लागवड होतेय अशाच जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे यांच्या गावात पाणंद रस्त्याच्या नावाखाली ३0 ते ३५ झाडांची बिनदिक्कत कत्तल केली जात आहे.यासाठी कोणतीही परवानगी घेतली गेली नाही तर तोडलेल्या झाडांमध्ये ज्या झाडांना वनविभाग परवानगीच देऊ शकत नाही अशा झाडांचा समावेश आहे.असा आरोप रिपाईने केला आहे.वनविभागाच्या निदर्शनास हि बाब आणून दिली असता वनविभागाचे अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषद सदस्यांच्या पतीराजानकडून दबाव आणला जात आहे.असा आरोप रिपाईचे श्रमिक बिग्रेड जिल्हा उपाध्यक्ष संजय गाडे यांनी केला आहे.त्यामुळे अखेर रिपाई श्रमिक बिग्रेड चे संजय गाडे, सिद्धार्थ गायकवाड यांनी जिल्हापरिषद सदस्या रांजणे यांना पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच संभधितांवर योग्य ती कारवाई करावी यासाठी सोमवारी अनोखे आंदोलन करणार असल्याचा इशारा रिपाई श्रमिक बिग्रेड च्या वतीने देण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांच्या गावात बिनदिक्कत बेसुमार वृक्षतोड सुरु आहे. कुसुंबी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे यांच्याच गावात बेसुमार वृक्षतोड सुरु आहे. याबाबत रिपाई श्रमिक बिग्रेडने आंदोलनाचा इशारा दिला आहे. संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी सोमवारी रिपाईच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा निवेदनाद्वारे रिपाई च्या वतीने देण्यात आला आहे.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून कारवाईस टाळाटाळ

जावळीचे सक्षम वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून सचिन डोंबाळे यांची ओळख आहे.एरव्ही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील एक जरी झाड तोडले तर वन अधिकारी त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारतात. मात्र आंबेघर मध्ये एवढी झाडे दिवसाढवळ्या तोडून व ही बाब निदर्शनास आणून देऊन ही वन परिक्षेत्र अधिकारी डोंबाळे कारवाईस टाळाटाळ करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या पारदर्शक कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तरी संबंधितांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.