शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

पर्यावरण दिनाच्या आठवड्यातच जावळीत बेसुमार वृक्षतोड

By admin | Updated: June 10, 2017 13:41 IST

जिल्हा परिषद सदस्यांच्या गावातील घटना: संबंधितांवर कारवाई ची रिपाइं ची मागणी

आॅनलाईन लोकमतसायगाव (जि. सातारा), दि. १0 : एकीकडे सर्वत्र जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शासकीय पातळीवर अधिकारी-पदाधिकाऱ्यांना घेऊन वृक्षलागवडीचा कार्यक्रम करीत आहेत. तर दुसरीकडे जावळी तालुक्यात कुसुंबी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे यांच्या आंबेघर गावातच पर्यावरण दिनाच्या आठवड्यातच बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. ही बाब गंभीर असून संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी रिपाइं श्रमिक बिग्रेड ने निवेदनाद्वारे केली आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जूनच्या पहिल्या आठवड्यात जावळीत ठिकठिकाणी अधिकारी-पदाधिकारी यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात वृक्षलगवाडीचे कार्यक्रम पार पडले.तर ज्या पदाधिक?्यांकडून वृक्ष लागवड होतेय अशाच जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे यांच्या गावात पाणंद रस्त्याच्या नावाखाली ३0 ते ३५ झाडांची बिनदिक्कत कत्तल केली जात आहे.यासाठी कोणतीही परवानगी घेतली गेली नाही तर तोडलेल्या झाडांमध्ये ज्या झाडांना वनविभाग परवानगीच देऊ शकत नाही अशा झाडांचा समावेश आहे.असा आरोप रिपाईने केला आहे.वनविभागाच्या निदर्शनास हि बाब आणून दिली असता वनविभागाचे अधिकाऱ्यांवर जिल्हा परिषद सदस्यांच्या पतीराजानकडून दबाव आणला जात आहे.असा आरोप रिपाईचे श्रमिक बिग्रेड जिल्हा उपाध्यक्ष संजय गाडे यांनी केला आहे.त्यामुळे अखेर रिपाई श्रमिक बिग्रेड चे संजय गाडे, सिद्धार्थ गायकवाड यांनी जिल्हापरिषद सदस्या रांजणे यांना पर्यावरणाचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच संभधितांवर योग्य ती कारवाई करावी यासाठी सोमवारी अनोखे आंदोलन करणार असल्याचा इशारा रिपाई श्रमिक बिग्रेड च्या वतीने देण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांच्या गावात बिनदिक्कत बेसुमार वृक्षतोड सुरु आहे. कुसुंबी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे यांच्याच गावात बेसुमार वृक्षतोड सुरु आहे. याबाबत रिपाई श्रमिक बिग्रेडने आंदोलनाचा इशारा दिला आहे. संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी सोमवारी रिपाईच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा निवेदनाद्वारे रिपाई च्या वतीने देण्यात आला आहे.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून कारवाईस टाळाटाळ

जावळीचे सक्षम वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून सचिन डोंबाळे यांची ओळख आहे.एरव्ही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील एक जरी झाड तोडले तर वन अधिकारी त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारतात. मात्र आंबेघर मध्ये एवढी झाडे दिवसाढवळ्या तोडून व ही बाब निदर्शनास आणून देऊन ही वन परिक्षेत्र अधिकारी डोंबाळे कारवाईस टाळाटाळ करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या पारदर्शक कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तरी संबंधितांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.