शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

केंद्र शासनाच्या विविध विभागांशी समन्वय करून सोडविण्याचा प्रयत्न करू :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:35 IST

सातारा : केंद्र शासनाच्या विविध विकास योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी. खास करून ग्रामविकासाच्या योजनांवर भर ...

सातारा : केंद्र शासनाच्या विविध विकास योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी. खास करून ग्रामविकासाच्या योजनांवर भर द्यावा; जेथे विकासाच्या योजना राबविण्यात अडचणी येतील, त्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाच्या विभागांशी समन्वय करून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) अध्यक्ष तथा खासदार श्रीनिवास पाटील व सहअध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली.

केंद्र शासनाच्या योजनांचा सर्वसामान्यांना लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ज्ञानाचा व अनुभवाचा वापर करून समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सभेचे अध्यक्ष तथा खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष तथा खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला समितीचे सहअध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे यांच्यासह समितीचे सदस्य व विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत विकासकामांना येणाऱ्या अडचणी समजून घ्या. त्या अडचणी पुढील बैठकीत सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यावर सातारा जिल्हा नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. प्रत्येकाने आपल्या ज्ञानाचा वापर करून केंद्र शासनाच्या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी व योजना राबविण्यात आपला देशात प्रथम क्रमांक राहावा यासाठी प्रयत्न करावेत, असेही अध्यक्ष तथा खासदार श्रीनिवास पाटील यांनी या बैठकीत सांगितले.

केंद्र शासनाच्या योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा. विकासाबाबत काही नवीन कल्पना असतील त्या सांगा. त्या कल्पना केंद्र शासनाकडे मांडल्या जातील, असे सहअध्यक्ष तथा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी या बैठकीत सांगितले.

या बैठकीच्या प्रारंभी प्रत्येक विभागनिहाय कामांचा आढावा घेण्यात आला.