शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

आम्ही चाव्या देतो... तुम्हीच शाळा चालवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST

राजेंद्र चोरगे : पालकांकडून शाळेवर होणाºया आरोपांमुळे बालमनावर होतोय परिणाम प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ज्या शाळांमध्ये ...

राजेंद्र चोरगे : पालकांकडून शाळेवर होणाºया आरोपांमुळे बालमनावर होतोय परिणाम

प्रगती जाधव-पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : ज्या शाळांमध्ये प्रवेश मिळवायला वशिले लावले त्याच शाळांबाबत पालकांची मने कलुशित झाली. पालक आणि शिक्षण संस्था चालक यांच्या वादात खरी कोंडी झाली ती विद्यार्थ्यांची! शिक्षकांविषयी मानहानीकारक बोलणी कानावर पडली तर गुरू शिष्य नातं समृध्द होणार नाही, ही भिती आहेच. गेल्या सप्ताहात शाळांच्या फीबाबत अनेक खलबते झाले, याच पार्श्वभूमीवर ‘इन्डीपेन्टेंड इंग्लिश स्कुल असोसिएशन’चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोरगे यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : पालकांमध्ये शाळाविरोधी मत कशामुळे झाले?

उत्तर : पाल्याला शाळेत घालताना चाळीस पन्नास शाळांच्या तुलनेत ज्या शाळा पालकांना अव्वल वाटल्या त्याच शााळा कोविड काळात पालकविरोधी वाटू लागल्यात. मुठभर पालक नाराज असतील, कोविडच्या आडून पैसे वाचविण्यासाठी शाळांवर आरोपही होतायत. खाजगी शिक्षण संस्था चालक त्यांच्या शाळा सरकारला चालवायला द्यायला तयार आहेत. आमच्या शिक्षकांना शासकीय पगार आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्या आमचं काहीच म्हणणं नाही.

प्रश्न : आर्थिक संक्रमणातून जाणाºया पालकांना दिलासा कधी?

उत्तर : कोविडने सगळ्यांवरच आर्थिक संकट आणलं आहे. अचानक आलेल्या या परिस्थितीतून पालकांबरोबर शाळाही होरपळली गेली. ज्या पालकांची खरचंच अडचण त्या पालकांना खाजगी शाळांनी फी मध्ये सवलत दिली. काही शाळांनी तर फी माफ करण्याचाही निर्णय घेतला. एकाचवेळी सर्वांचे समाधान करणं संस्था चालकांना शक्य नाही. शाळांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला तर फीही घेणारच ना?

प्रश्न : जी सेवा घेतली नाही त्याचे शुल्क पालकांनी का भरावे?

उत्तर : सातारा जिल्ह्यातील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा बजेट स्कुल आहेत. विद्यार्थी वर्गात येत नसले तरीही वर्गांची स्वच्छता, क्रिडांगणांची देखरेख, प्रयोगशाळांतील उपकरणांची देखभाल, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाºयांचे पगार, इमारत देखभालीचा खर्च शाळेला करावाच लागतो. त्यामुळे आॅनलाईन शाळेत सेवा घेतली नसली तरीही यापूर्वी आणि यापुढेही विद्यार्थी ही सेवा ते घेणार आहेतच.

चौकट :

गुणवत्तेवर कोणीच बोलेनात!

कोरोनामुळे पालकांसह शाळाही आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. या काळात परस्परांना साथ देऊन पुढं जाण्याची भूमिका आम्ही संघटना म्हणून घेतली आहे. आॅनलाईन शाळा सुरू झाल्यापासून बहुतांश पालकांनी निव्वळ फीच्या भोवतीच शाळेला घेरले. बोटावर मोजण्या इतकेच पालक शिक्षणाच्या गुणवत्तेवर बोलले. पाल्याला गुणवत्तापूर्ण आॅनलाईन शिक्षण मिळावं यासाठी अमुक बदल करा यासाठी पालक भांडले, तर आम्ही त्यांचे स्वागतच केले असते.

‘आरटीई’ चा परतावा तीन वर्षे नाही

खाजगी शाळांची निर्मिती, वाढ ही शासन शिक्षण देण्यास कमी पडल्याचे द्योतक आहे. मोफत शिक्षण ही संपूर्ण जबाबदारी शासनाची आहे. पण शासनाच्या स्तरावर शिक्षणाला दुय्यम दर्जा दिला गेल्याने खाजगी शाळांचे महत्व आणि अस्तित्व वाढलं. खाजगी शाळांमध्ये शिक्षण अधिकारांतर्गत २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. सर्व अटींची पुर्तता केल्यानंतरही तीन वर्षे आरटीईचा परतावा मिळाला नसेल तर शिक्षण संस्थाचालकांनी काय करावं?

कोट :

आर्थिक परिस्थितीचं सोंग ना पालकांना करता येत ना शिक्षण संस्थांना. त्यामळे संवाद साधून मार्ग काढणं आणि पालकांबरोबरच शिक्षण संस्थाही टिकणं महत्वाचं आहे. शिक्षण संस्था हे कोणाच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत नाही. देशाचं रक्षण करायला सैन्याला अर्थसंकल्पात तरतुद असते. युध्द होत नाही म्हणून खर्च कशाला करता असं म्हणणं जसं गैर आहे, तसंच सेवेचा वापर केला नाही म्हणून फी कमी म्हणणं चुकीचं आहे.

- राजेंद्र चोरगे, जिल्हाध्यक्ष ईसा