शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसी दंडूक्याशिवाय आम्हाला जमतच नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:15 IST

रस्त्यावर रहदारी कमी; गरजेपुरते सिग्नल होताहेत सुरू; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शहरामध्ये अनेक महिन्यांपासून सर्व ...

रस्त्यावर रहदारी कमी; गरजेपुरते सिग्नल होताहेत सुरू; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शहरामध्ये अनेक महिन्यांपासून सर्व सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करताना पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी पोलीस नसल्याने वाहनचालकांची मनमानी सुरू असून, नियमांना सातारकर जुमानत नाहीत, अशीच परिस्थिती दिसून येत आहे.

सातारा शहरामध्ये इनमीन दोन सिग्नल असून, तेही बंद अवस्थेत आहेत. ते कधी सुरू होतात तर कधी बंद पडतात. त्यामुळे अनेकदा वाहनचालकही संभ्रमात पडतात. परंतु, हे सिग्नल बंद असले तरी वाहतूक पोलीस मात्र प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतु, जेवणाची सुट्टी अथवा क्वचित सिग्ललजवळ पोलीस नसले की, वाहनचालक आडवी-तिडवी वाहने चालवतात. काहींना तर सिग्नलवर नियम काय असतो, हेही माहिती नाही. त्यामुळे असे वाहनचालक चौकात कुठून कसेही वळण घेऊन अपघाताला निमंत्रण देत आहेत. विशेषत: शहरातील जिल्हा परिषदेचा चौक याठिकाणी नेहमीच वर्दळ असते. वाहतूक पोलीस हाताने वाहनांना सूचना देऊन अक्षरश: थकून जात आहेत. सिग्नल यंत्रणा सुरू असती तर पोलिसांचे काम हलके झाले असते. हीच परिस्थिती बसस्थानकाशेजारील राधिका रस्त्यावरही पाहायला मिळते. वाहनधारक आज्ञाधारक बनताहेत मात्र पोलीस निघून गेले की, नियमांची ऐसी की तैसी करत आहेत.

४८ हजार रुपये दंड

गत वर्षभरात अनेक वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे. अशा वाहनचालकांकडून वाहतूक शाखेने ४८ हजारांचा दंडही वसूल केला आहे. यामध्ये अनेकजण सिग्नलवर चुकीच्या दिशेने वळण घेऊन अपघाताला कारणीभूत ठरले. शहरात सध्या फारशी वाहतूक नाही. पूर्वी जशी वाहतूक कोंडी होती तशी आता होत नाही. मोठे रस्ते आणि ग्रेड सेपरेटरमुळे वाहतूक कोंडी होत नाही. मात्र, ज्यावेळी गर्दी होते, तेव्हा सिग्नल सुरू करतो.

विठ्ठल शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक

शहरामध्ये सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे चौकात नेहमी गर्दी होते. त्यामुळे सिग्नल सुरू केले तर वाहनचालक संभ्रमात पडणार नाहीत. सर्वजण नियमांचे पालन करतील.

- नीलेश काटर, सातारा

पोलीस सिग्नलवर असल्यानंतर अनेक वाहनचालक नियम पाळतात. परंतु, पोलीस गेल्यानंतर नियम पाळत नाहीत. त्यामुळे अपघात होतात.

- सलीम मुल्ला, युवक, सातारा

सातारा बसस्थानकासमोर असलेला सिग्नल बंद आहे. हा सिग्नल खरंतर सुरू व्हायला हवा. याठिकाणी प्रचंड गर्दी असते. त्यातच सकाळच्या सुमारास याठिकाणी मंडई भरते.

- प्रदीप रजपूत, सातारा