शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पोलिसी दंडूक्याशिवाय आम्हाला जमतच नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:15 IST

रस्त्यावर रहदारी कमी; गरजेपुरते सिग्नल होताहेत सुरू; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शहरामध्ये अनेक महिन्यांपासून सर्व ...

रस्त्यावर रहदारी कमी; गरजेपुरते सिग्नल होताहेत सुरू; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शहरामध्ये अनेक महिन्यांपासून सर्व सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे अनेक वाहनचालक नियमांचे उल्लंघन करताना पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी पोलीस नसल्याने वाहनचालकांची मनमानी सुरू असून, नियमांना सातारकर जुमानत नाहीत, अशीच परिस्थिती दिसून येत आहे.

सातारा शहरामध्ये इनमीन दोन सिग्नल असून, तेही बंद अवस्थेत आहेत. ते कधी सुरू होतात तर कधी बंद पडतात. त्यामुळे अनेकदा वाहनचालकही संभ्रमात पडतात. परंतु, हे सिग्नल बंद असले तरी वाहतूक पोलीस मात्र प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतु, जेवणाची सुट्टी अथवा क्वचित सिग्ललजवळ पोलीस नसले की, वाहनचालक आडवी-तिडवी वाहने चालवतात. काहींना तर सिग्नलवर नियम काय असतो, हेही माहिती नाही. त्यामुळे असे वाहनचालक चौकात कुठून कसेही वळण घेऊन अपघाताला निमंत्रण देत आहेत. विशेषत: शहरातील जिल्हा परिषदेचा चौक याठिकाणी नेहमीच वर्दळ असते. वाहतूक पोलीस हाताने वाहनांना सूचना देऊन अक्षरश: थकून जात आहेत. सिग्नल यंत्रणा सुरू असती तर पोलिसांचे काम हलके झाले असते. हीच परिस्थिती बसस्थानकाशेजारील राधिका रस्त्यावरही पाहायला मिळते. वाहनधारक आज्ञाधारक बनताहेत मात्र पोलीस निघून गेले की, नियमांची ऐसी की तैसी करत आहेत.

४८ हजार रुपये दंड

गत वर्षभरात अनेक वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे. अशा वाहनचालकांकडून वाहतूक शाखेने ४८ हजारांचा दंडही वसूल केला आहे. यामध्ये अनेकजण सिग्नलवर चुकीच्या दिशेने वळण घेऊन अपघाताला कारणीभूत ठरले. शहरात सध्या फारशी वाहतूक नाही. पूर्वी जशी वाहतूक कोंडी होती तशी आता होत नाही. मोठे रस्ते आणि ग्रेड सेपरेटरमुळे वाहतूक कोंडी होत नाही. मात्र, ज्यावेळी गर्दी होते, तेव्हा सिग्नल सुरू करतो.

विठ्ठल शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक

शहरामध्ये सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे चौकात नेहमी गर्दी होते. त्यामुळे सिग्नल सुरू केले तर वाहनचालक संभ्रमात पडणार नाहीत. सर्वजण नियमांचे पालन करतील.

- नीलेश काटर, सातारा

पोलीस सिग्नलवर असल्यानंतर अनेक वाहनचालक नियम पाळतात. परंतु, पोलीस गेल्यानंतर नियम पाळत नाहीत. त्यामुळे अपघात होतात.

- सलीम मुल्ला, युवक, सातारा

सातारा बसस्थानकासमोर असलेला सिग्नल बंद आहे. हा सिग्नल खरंतर सुरू व्हायला हवा. याठिकाणी प्रचंड गर्दी असते. त्यातच सकाळच्या सुमारास याठिकाणी मंडई भरते.

- प्रदीप रजपूत, सातारा