शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आगामी पाच महिने पाणीबाणी!

By admin | Updated: December 31, 2015 00:26 IST

पहिले पाढे पंचावन्न : कोयना धरणातील पाण्याचे नवे नियोजन बारगळले; ५९ टक्के साठा शिल्लक

पाटण : राज्यातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प म्हणून कोयना धरणाकडे पाहिले जाते. याच कोयना धरणातील पाणीसाठ्यावर गेली ५० वर्षे महाराष्ट्र व इतर राज्याची तहान भागविली जाते. त्याच बरोबर भरवशाचे पॉवर स्टेशन म्हणूनही कोयनाने अखंडित ऊर्जा पुरविली आहे. त्याच कोयना धरणातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती नाजूक असून, धरणात आजमितीस ५९.२२ टक्के म्हणजेच ६२.३३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.हा पाणीसाठा आगामी पाच महिन्यांसाठी विजनिर्मिती आणि पूर्वेकडील सिंचन, पिण्याचे पाणी यासाठी पुरणार कसा याची चिंता लागून राहिली आहे. दरम्यान, कोयनेतील पाणीसाठ्याचे नवे नियोजन बारगळले आहे. आजपर्यंत जुन्याच नियोजन पद्धतीवर धरणातील पाणीवापर सुरू असून, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नव्या पाणीवाटप नियोजनाचे आदेश मंत्रालयातून देण्याचे विसरले की काय अशी टिप्पणी जनतेतून व्यक्त होत आहे. कोयना धरणाची पाणीक्षमता १०५.२५ टीएमसी असून त्यापैकी जून ते मे अशा वार्षिक करारानुसार ६७.५० टीएमसी पाणी विजनिर्मितीला वापरायचे तर २२ ते ३० टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी वापरावयाचा असा करार आहे. या वर्षातील धरणाची स्थिती लक्षात घेतली पाहिजे. यावर्षी फक्त ८० टीएमसी पाणीसाठा झाला. धरण पूर्णक्षमतेने भरले नाही. त्यापैकी १ जूनपासून विजनिर्मितीसाठी २८.७७ टीएमसी पाणी वापरले गेले. तर पूर्वेकडील सांगलीसाठी १३.७४ टीएमसी पाणी आजअखेर विजानिर्मिती करून पायथा विजगृहातून सोडले गेले. आता प्रश्न उरतो तो आगामी पाच महिन्यांसाठीचा. विजनिर्मितीसाठी आणि सिंचन, पिण्याचे पाणी यासाठी धरणातील पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे. दुष्काळ, उन्हाळ्याची तीव्रता यांचा सामना कसा करायचा. मग ५० टक्के पाणीसाठा काटेकोरपणे वापरावा लागेल. याचे नियोजन जलसंपदा विभागाला नाही, त्यामुळेच आजअखेर नवीन पाणी नियोजन लागू करण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी) पायथा विजगृहातून सतत पाणी वापर सांगली पाटबंधारे विभागाने आपली पाणी मागणी सतत सुरू ठेवल्याने कोयना धरणाच्या पायथा विजगृहातून सतत पाणी सोडणे सुरू आहे. पश्चिमेकडील पहिला, दुसरा आणि चौथा टप्पा यासाठी दिवसाकाठी ०.१८ टीएमसी पाणीवापर होत आहे. अद्याप तरी पाणी टंचाईच्या झळा जाणवत नसल्यामुळे कोयनेचे गांभीर्य वाटत नसावे. कोयना धरणातील अपुरा वाटणारा पाणीसाठा याबाबत कोयना धरण व्यवस्थापन गंभीर आहे. मात्र सांगली पाटबंधारे आणि जलसंपदा विभाग यांच्या आदेशाशी आम्ही बांधील आहोत. त्यांनी ठरविल्या नुसारच आम्हाला काम करावे लागते. - ज्ञानेश्वर बागडे, कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन