शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

आगामी पाच महिने पाणीबाणी!

By admin | Updated: December 31, 2015 00:26 IST

पहिले पाढे पंचावन्न : कोयना धरणातील पाण्याचे नवे नियोजन बारगळले; ५९ टक्के साठा शिल्लक

पाटण : राज्यातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प म्हणून कोयना धरणाकडे पाहिले जाते. याच कोयना धरणातील पाणीसाठ्यावर गेली ५० वर्षे महाराष्ट्र व इतर राज्याची तहान भागविली जाते. त्याच बरोबर भरवशाचे पॉवर स्टेशन म्हणूनही कोयनाने अखंडित ऊर्जा पुरविली आहे. त्याच कोयना धरणातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती नाजूक असून, धरणात आजमितीस ५९.२२ टक्के म्हणजेच ६२.३३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.हा पाणीसाठा आगामी पाच महिन्यांसाठी विजनिर्मिती आणि पूर्वेकडील सिंचन, पिण्याचे पाणी यासाठी पुरणार कसा याची चिंता लागून राहिली आहे. दरम्यान, कोयनेतील पाणीसाठ्याचे नवे नियोजन बारगळले आहे. आजपर्यंत जुन्याच नियोजन पद्धतीवर धरणातील पाणीवापर सुरू असून, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नव्या पाणीवाटप नियोजनाचे आदेश मंत्रालयातून देण्याचे विसरले की काय अशी टिप्पणी जनतेतून व्यक्त होत आहे. कोयना धरणाची पाणीक्षमता १०५.२५ टीएमसी असून त्यापैकी जून ते मे अशा वार्षिक करारानुसार ६७.५० टीएमसी पाणी विजनिर्मितीला वापरायचे तर २२ ते ३० टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी वापरावयाचा असा करार आहे. या वर्षातील धरणाची स्थिती लक्षात घेतली पाहिजे. यावर्षी फक्त ८० टीएमसी पाणीसाठा झाला. धरण पूर्णक्षमतेने भरले नाही. त्यापैकी १ जूनपासून विजनिर्मितीसाठी २८.७७ टीएमसी पाणी वापरले गेले. तर पूर्वेकडील सांगलीसाठी १३.७४ टीएमसी पाणी आजअखेर विजानिर्मिती करून पायथा विजगृहातून सोडले गेले. आता प्रश्न उरतो तो आगामी पाच महिन्यांसाठीचा. विजनिर्मितीसाठी आणि सिंचन, पिण्याचे पाणी यासाठी धरणातील पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे. दुष्काळ, उन्हाळ्याची तीव्रता यांचा सामना कसा करायचा. मग ५० टक्के पाणीसाठा काटेकोरपणे वापरावा लागेल. याचे नियोजन जलसंपदा विभागाला नाही, त्यामुळेच आजअखेर नवीन पाणी नियोजन लागू करण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी) पायथा विजगृहातून सतत पाणी वापर सांगली पाटबंधारे विभागाने आपली पाणी मागणी सतत सुरू ठेवल्याने कोयना धरणाच्या पायथा विजगृहातून सतत पाणी सोडणे सुरू आहे. पश्चिमेकडील पहिला, दुसरा आणि चौथा टप्पा यासाठी दिवसाकाठी ०.१८ टीएमसी पाणीवापर होत आहे. अद्याप तरी पाणी टंचाईच्या झळा जाणवत नसल्यामुळे कोयनेचे गांभीर्य वाटत नसावे. कोयना धरणातील अपुरा वाटणारा पाणीसाठा याबाबत कोयना धरण व्यवस्थापन गंभीर आहे. मात्र सांगली पाटबंधारे आणि जलसंपदा विभाग यांच्या आदेशाशी आम्ही बांधील आहोत. त्यांनी ठरविल्या नुसारच आम्हाला काम करावे लागते. - ज्ञानेश्वर बागडे, कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन