शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आगामी पाच महिने पाणीबाणी!

By admin | Updated: December 31, 2015 00:26 IST

पहिले पाढे पंचावन्न : कोयना धरणातील पाण्याचे नवे नियोजन बारगळले; ५९ टक्के साठा शिल्लक

पाटण : राज्यातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प म्हणून कोयना धरणाकडे पाहिले जाते. याच कोयना धरणातील पाणीसाठ्यावर गेली ५० वर्षे महाराष्ट्र व इतर राज्याची तहान भागविली जाते. त्याच बरोबर भरवशाचे पॉवर स्टेशन म्हणूनही कोयनाने अखंडित ऊर्जा पुरविली आहे. त्याच कोयना धरणातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती नाजूक असून, धरणात आजमितीस ५९.२२ टक्के म्हणजेच ६२.३३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.हा पाणीसाठा आगामी पाच महिन्यांसाठी विजनिर्मिती आणि पूर्वेकडील सिंचन, पिण्याचे पाणी यासाठी पुरणार कसा याची चिंता लागून राहिली आहे. दरम्यान, कोयनेतील पाणीसाठ्याचे नवे नियोजन बारगळले आहे. आजपर्यंत जुन्याच नियोजन पद्धतीवर धरणातील पाणीवापर सुरू असून, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नव्या पाणीवाटप नियोजनाचे आदेश मंत्रालयातून देण्याचे विसरले की काय अशी टिप्पणी जनतेतून व्यक्त होत आहे. कोयना धरणाची पाणीक्षमता १०५.२५ टीएमसी असून त्यापैकी जून ते मे अशा वार्षिक करारानुसार ६७.५० टीएमसी पाणी विजनिर्मितीला वापरायचे तर २२ ते ३० टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी वापरावयाचा असा करार आहे. या वर्षातील धरणाची स्थिती लक्षात घेतली पाहिजे. यावर्षी फक्त ८० टीएमसी पाणीसाठा झाला. धरण पूर्णक्षमतेने भरले नाही. त्यापैकी १ जूनपासून विजनिर्मितीसाठी २८.७७ टीएमसी पाणी वापरले गेले. तर पूर्वेकडील सांगलीसाठी १३.७४ टीएमसी पाणी आजअखेर विजानिर्मिती करून पायथा विजगृहातून सोडले गेले. आता प्रश्न उरतो तो आगामी पाच महिन्यांसाठीचा. विजनिर्मितीसाठी आणि सिंचन, पिण्याचे पाणी यासाठी धरणातील पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे. दुष्काळ, उन्हाळ्याची तीव्रता यांचा सामना कसा करायचा. मग ५० टक्के पाणीसाठा काटेकोरपणे वापरावा लागेल. याचे नियोजन जलसंपदा विभागाला नाही, त्यामुळेच आजअखेर नवीन पाणी नियोजन लागू करण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी) पायथा विजगृहातून सतत पाणी वापर सांगली पाटबंधारे विभागाने आपली पाणी मागणी सतत सुरू ठेवल्याने कोयना धरणाच्या पायथा विजगृहातून सतत पाणी सोडणे सुरू आहे. पश्चिमेकडील पहिला, दुसरा आणि चौथा टप्पा यासाठी दिवसाकाठी ०.१८ टीएमसी पाणीवापर होत आहे. अद्याप तरी पाणी टंचाईच्या झळा जाणवत नसल्यामुळे कोयनेचे गांभीर्य वाटत नसावे. कोयना धरणातील अपुरा वाटणारा पाणीसाठा याबाबत कोयना धरण व्यवस्थापन गंभीर आहे. मात्र सांगली पाटबंधारे आणि जलसंपदा विभाग यांच्या आदेशाशी आम्ही बांधील आहोत. त्यांनी ठरविल्या नुसारच आम्हाला काम करावे लागते. - ज्ञानेश्वर बागडे, कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन