शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

आगामी पाच महिने पाणीबाणी!

By admin | Updated: December 31, 2015 00:26 IST

पहिले पाढे पंचावन्न : कोयना धरणातील पाण्याचे नवे नियोजन बारगळले; ५९ टक्के साठा शिल्लक

पाटण : राज्यातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प म्हणून कोयना धरणाकडे पाहिले जाते. याच कोयना धरणातील पाणीसाठ्यावर गेली ५० वर्षे महाराष्ट्र व इतर राज्याची तहान भागविली जाते. त्याच बरोबर भरवशाचे पॉवर स्टेशन म्हणूनही कोयनाने अखंडित ऊर्जा पुरविली आहे. त्याच कोयना धरणातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती नाजूक असून, धरणात आजमितीस ५९.२२ टक्के म्हणजेच ६२.३३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.हा पाणीसाठा आगामी पाच महिन्यांसाठी विजनिर्मिती आणि पूर्वेकडील सिंचन, पिण्याचे पाणी यासाठी पुरणार कसा याची चिंता लागून राहिली आहे. दरम्यान, कोयनेतील पाणीसाठ्याचे नवे नियोजन बारगळले आहे. आजपर्यंत जुन्याच नियोजन पद्धतीवर धरणातील पाणीवापर सुरू असून, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नव्या पाणीवाटप नियोजनाचे आदेश मंत्रालयातून देण्याचे विसरले की काय अशी टिप्पणी जनतेतून व्यक्त होत आहे. कोयना धरणाची पाणीक्षमता १०५.२५ टीएमसी असून त्यापैकी जून ते मे अशा वार्षिक करारानुसार ६७.५० टीएमसी पाणी विजनिर्मितीला वापरायचे तर २२ ते ३० टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी वापरावयाचा असा करार आहे. या वर्षातील धरणाची स्थिती लक्षात घेतली पाहिजे. यावर्षी फक्त ८० टीएमसी पाणीसाठा झाला. धरण पूर्णक्षमतेने भरले नाही. त्यापैकी १ जूनपासून विजनिर्मितीसाठी २८.७७ टीएमसी पाणी वापरले गेले. तर पूर्वेकडील सांगलीसाठी १३.७४ टीएमसी पाणी आजअखेर विजानिर्मिती करून पायथा विजगृहातून सोडले गेले. आता प्रश्न उरतो तो आगामी पाच महिन्यांसाठीचा. विजनिर्मितीसाठी आणि सिंचन, पिण्याचे पाणी यासाठी धरणातील पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे. दुष्काळ, उन्हाळ्याची तीव्रता यांचा सामना कसा करायचा. मग ५० टक्के पाणीसाठा काटेकोरपणे वापरावा लागेल. याचे नियोजन जलसंपदा विभागाला नाही, त्यामुळेच आजअखेर नवीन पाणी नियोजन लागू करण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी) पायथा विजगृहातून सतत पाणी वापर सांगली पाटबंधारे विभागाने आपली पाणी मागणी सतत सुरू ठेवल्याने कोयना धरणाच्या पायथा विजगृहातून सतत पाणी सोडणे सुरू आहे. पश्चिमेकडील पहिला, दुसरा आणि चौथा टप्पा यासाठी दिवसाकाठी ०.१८ टीएमसी पाणीवापर होत आहे. अद्याप तरी पाणी टंचाईच्या झळा जाणवत नसल्यामुळे कोयनेचे गांभीर्य वाटत नसावे. कोयना धरणातील अपुरा वाटणारा पाणीसाठा याबाबत कोयना धरण व्यवस्थापन गंभीर आहे. मात्र सांगली पाटबंधारे आणि जलसंपदा विभाग यांच्या आदेशाशी आम्ही बांधील आहोत. त्यांनी ठरविल्या नुसारच आम्हाला काम करावे लागते. - ज्ञानेश्वर बागडे, कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन