शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाण्यासाठी सोडलं दुश्मनीवर पाणी वॉटर कप स्पर्धेत भाग : दुरावलेल्या मित्रांकडून वाठार स्टेशन गावी पाणी फाउंडेशनचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 21:56 IST

वाठार स्टेशन (जि. सातारा) : पंचवीस वर्षांच्या राजकारणात एकमेकांपासून दुरावलेली मने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पुन्हा जुळून आली.

संजय कदम।वाठार स्टेशन (जि. सातारा) : पंचवीस वर्षांच्या राजकारणात एकमेकांपासून दुरावलेली मने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पुन्हा जुळून आली. ‘गावाला लागलेला दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊ,’ ही भूमिका घेऊन कोरेगाव तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या वाठार स्टेशनचे दोन दिग्गज विरोधक सात वर्षांनंतर पुन्हा एक झाले. ही सर्व किमया पाणी फाउंडेशनमुळेच शक्य झाल्याची भावना दोन्ही मित्रांनी व्यक्त केली.

शालेय जीवनापासून ते राजकारणापर्यंत शोले चित्रपटातील ‘जय-वीरू’सारखी मैत्री असलेले वाठार स्टेशनचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नागेश जाधव आणि ‘रिपाइं’चे जिल्हा उपाध्यक्ष अमोल आवळे हे दोन मित्र सात वर्षांपूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुकीपासून एकमेकांचे कट्टर विरोधक झाले. या काळात वाढलेल्या शत्रुत्वामुळे गावच्या विकासाला कुठंतरी खीळ घालत होती. हे दोन्ही चांगले मित्र पुन्हा एकत्र व्हावेत, यासाठी अनेकांनी प्रयत्नही केले होते. मात्र, या प्रयत्नांना यश मिळत नव्हते.

पाणी फाउंडेशनच्या तालुका समन्वयक मोनाली शेळके आणि राहुल भोसले यांनी दोन महिन्यांपूर्वी या दोघांनाही फोनवरून जलयुक्त शिवारबाबत माहिती दिली. यासाठी आपण प्रशिक्षण घ्या, असे आवाहनही केले. अनपटवाडीत प्रशिक्षण घेण्यासाठी दोन मित्रांनी एकत्रित हजेरी लावली. गावाला आलेला दुष्काळी कलंक आता पुसायचा, हा निर्धार मित्रांनी करत राजकारणातील वैमनस्य संपवून हातात हात घालून काम करण्याचा निर्णय केला.वाठार स्टेशनमध्ये राष्ट्रवादीचे नागेश जाधव आणि माजी पंचायत समिती सदस्य अंकुशराव जाधव हे दोन नेते एकत्रित काम करत आहेत.बस्स झालं बारमाही टँकरवाठार स्टेशन हे आठ ते दहा हजार लोकसंख्या असलेले या भागातील प्रमुख बाजारपेठेचे गाव आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच लोकांची गर्दी असते. त्यातच गावाची गरज भागेल एवढेही पाणी उपलब्ध नसल्याने कायमस्वरूपी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करावे लागते. त्यामुळे बारमाही टँकर असलेले गाव म्हणूनही गावची वेगळी ओळख आहे. ५ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या वॉटर कपमध्ये आता या गावानेही सहभाग घेऊन एक आदर्श प्रस्थापित करण्याचे काम केले आहे.