शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

गावाचं पाणी कारभाऱ्याच्या शेताला!

By admin | Updated: March 27, 2016 00:15 IST

सवादेच्या विहिरीवर उपसरपंचांचा प्रताप : ग्रामस्थांचे तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; मोर्चाचा इशारा

कऱ्हाड : यंदा उन्हाळ््याच्या झळा खूपच जाणवू लागल्या आहेत. त्याला कऱ्हाड तालुकाही अपवाद नाही. तालुक्यातील ५९ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. नजीकच्या काळात आणखी टंचाई वाढू शकते. या कारणाने प्रशासन हतबल असताना सवादेत मात्र सार्वजनिक विहिरीतून वैयक्तिक शेतीस पाणीउपसा सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. विशेष म्हणजे हा प्रताप विद्यमान उपसरपंच करीत असल्याने कुंपणच शेत खात असल्याची भावना ग्रामस्थांनी निवेदनातून व्यक्त केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यमान उपसरपंच संजय बाबूराव शेवाळे यांनी पदाचा गैरवापर करून ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीमधून स्वत:च्या क्षेत्रातील ऊस पिकासाठी पाणीउपसा पंधरा दिवसांपासून सुरू केला आहे. यासाठी उपसरपंच शेवाळे हे गावविहिरीपासून २0 फूट अंतरावर असणाऱ्या अंतू नाना शेवाळे यांच्या मालकीच्या पाईपलाईनचा वापर करीत आहेत. दरम्यान, २३ मार्च रोजी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सदस्या रंजना उत्तम थोरात यांनी उपसरपंच संजय शेवाळे यांना पाणीटंचाई भासत असताना तुम्ही कोणत्या अधिकाराने गावविहिरीचे पाणी शेतीसाठी वापरत आहात, अशी विचारणा केली. मात्र, उपसरपंच शेवाळे यांनी ‘मी १0 वर्षे ग्रामपंचायतीमध्ये कारभार करीत असून, तुम्ही मला काही शिकवू नका, कोणाकडे तक्रार करायची ती करा,’ असे उत्तर दिल्याचे रंजना थोरात यांनी म्हटले आहे. गावाला पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असताना दुष्काळाच्या झळांमुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना एका बाजूला शासन परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या विहिरींचे अधिग्रहन करत आहे. याउलट सवादेचे उपसरपंच मात्र खुद्द गावविहिरीच्या पाण्याचा वापर गैरमार्गाने शेतीसाठी करत आहेत, ही बाब गंभीर आहे. याबाबत योग्य ती दखल त्वरित घ्यावी, अन्यथा उपोषण, मोर्चा किंवा इतर मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर रंजना उत्तम थोरात, बाबूराव थोरात, नितीन थोरात, विलास थोरात, बाबासाहेब थोरात, सुनील थोरात, रंगराव सुतार, दिगंबर चव्हाण, रघुनाथ पाटील, शंकर गुरव आदी वीस जणांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)