शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

लोणंदमधील १९ विहिरींच्या पाण्याची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:24 IST

लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. २ जुलै रोजी लोणंद मुक्कामी येत असून, मुक्कामाच्या वेळी लाखो ...

लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. २ जुलै रोजी लोणंद मुक्कामी येत असून, मुक्कामाच्या वेळी लाखो वारकरी लोणंदमध्ये दाखल होत असतात. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी आरोग्य विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. परिसरातील १९ विहिरींच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे.दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंद यांच्यामार्फत भाविकांना सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा तत्काळ उपलब्ध होणार आहेत. तसेच आपत्कालीन सेवेसाठी खासगी दवाखान्यांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे प्रसिद्धी करण्यात आलीआहे.पालखी सोहळ्यात भाविकांना २४ तास आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी चार वैद्यकीय पथकामध्ये ३३ वैद्यकीय अधिकारी, १३ औषध निर्माण अधिकारी, १७ आरोग्य सहायक, २ आरोग्य सहायिका, ४२ आरोग्यसेवक, ३० आरोग्य सेविका, ८ शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी पुरेशा प्रमाणात लागणारा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. भाविकांना स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी परिसरातील १९ विहिरींच्या पाण्याची तपासणी सातारा येथील जिल्हा प्रयोगशाळेमध्ये करण्यात आली आहे. त्याचबरोबर टीसीएलची तपासणीही करण्यात आली आहे. भाविकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी १० ठिकाणी ३४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा देण्यासाठी पालखी तळावर, प्राथमिक आरोग्य केंद्र व घाटावर प्रत्येकी एक रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे.खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या हॉस्पिटलमधील उपलब्ध खाटांच्या संख्येपैकी १० टक्के खाटा भाविकांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. पालखी काळात शहरातील सर्व हॉटेल्स, फळविक्रेते, चहा व खाद्यपदार्थ विक्री करणाºया टपरीधारकांच्या तपासणीसाठी खास पथके नेमण्यात आली आहेत. त्यांना पाणी तपासणीचे अधिकार देण्यात आले आहेत. वरील सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र लोणंदचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत बागडे व त्यांचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये १०८ व १०२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या हॉस्पिटलमधील उपलब्ध खाटांच्या संख्येपैकी १० टक्के खाटा भाविकांसाठी आरक्षित आहेत.वारकºयांना लोणंदमध्ये आल्यानंतर आरोग्यविषयक गैरसोयीचा सामना करावा लागू नये. दूषित पाणी पिण्यास आल्यास साथीचे रोग पसरण्याची भीती असते. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने विशेष मोहीम राबविली आहे.वीज जोडणीसाठी स्वतंत्र व्यवस्थाआषाढी वारीकरिता वीज वितरण विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात सर्व पालखी व मुक्कामाच्या ठिकाणी वीज जोडणी देण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. याबाबत तालुका स्तरावरील अधिकाºयांशी संपर्क साधावा. अधिकृतपणे वीज जोडणी घेऊन संभाव्य धोका टाळावा व हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.